शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

महापालिका-प्राधिकरणात जुंपली

By admin | Updated: April 27, 2016 00:45 IST

जिल्हाधिकाऱ्यांसमोरच वाद : शेरीनाला योजना ताब्यात घेण्यास नकार

सांगली : शेरीनाला योजनेवरून मंगळवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्यासमोरच महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यातत वाद झाला. ही योजना महापालिकेने ताब्यात घ्यावी, असा आग्रह जीवन प्राधिकरणने धरला होता, तर महापालिकेने अजून योजनेचे काम पूर्ण झालेले नाही, त्यामुळे ती ताब्यात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा पवित्रा घेतला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन त्यावर तोडगा काढावा, अथवा राज्य शासनाकडे हा विषय घेऊन जावे, असा सबुरीचा सल्ला दिला. सांगलीतील शेरीनाल्याचे पाणी धुळगावला देण्याचा प्रकल्प पंधरा वर्षांपूर्वी हाती घेतला होता. ही योजना जीवन प्राधिकरणच्या देखरेखेखाली राबविली जात आहे. मंगळवारी महापालिकेत आयोजित आढावा बैठकीत धुळगाव येथील शेतकऱ्यांनी शेरीनाला योजनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणी मांडली. धुळगाव येथील आॅक्सिडेशन पाँडला गळती लागली आहे. त्यामुळे वीस एकर क्षेत्र पडिक झाले आहे. ही गळती काढावी, तसेच वितरण व्यवस्थेबाबत निर्णय व्हावा, अशी मागणी धुळगावचे सुनील डुबल यांनी केली. जीवन प्राधिकरणचे अधिकारी ताटे यांनी शेरीनाला योजना पूर्ण झाली असून, ती महापालिकेने ताब्यात घ्यावी, असे मत मांडले. त्याला महापौर हारुण शिकलगार, स्थायी सभापती संतोष पाटील यांनी विरोध दर्शविला. अजून योजनाच पूर्ण नाही, तर ती कशी ताब्यात घेणार, असा सवाल केला. पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनीही त्याला दुजोरा दिला. उपमहापौर विजय घाडगे यांनी तर, शेरीनाला योजना पांढरा हत्ती असून, तो चालविणे महापालिकेला शक्य नाही, अशी भूमिका मांडली. त्यावर ताटे यांनी, महापालिकेने ठराव करून दिला आहे. त्यामुळे त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही, असा पवित्रा घेतला. शेरीनाला योजना पूर्ण झाल्याचा दावा चुकीचा आहे. अजून बरीच कामे अपूर्ण आहेत. जीवन प्राधिकरणने पाच पंपांपैकी तीनच पंप बसविले आहेत. त्यातील एक पंप उखडला होता. एक कोटीची यंत्रणा अजून कार्यान्वित नाही, असे संतोष पाटील यांनी स्पष्ट केले. बैठकीतील वाद वाढत गेल्याने अखेर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी हस्तक्षेप केला. (प्रतिनिधी)शेरीनाला योजनेबाबत महापालिका व जीवन प्राधिकरणाने एकत्र बैठक घेऊन कोणती कामे झाली, कोणती झाली नाहीत, याची शहानिशा करावी. योजना चालविण्यास जमत नसेल, तर महापालिकेने ती बंद करावी, असे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले. दोन्ही बाजूने वाद वाढत जाणार आहे. प्रसंगी लवाद नियुक्त करून त्यातून मार्ग काढावा. शेरीनाल्याच्या उर्वरित निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा कारावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.