शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका-प्राधिकरणात जुंपली

By admin | Updated: April 27, 2016 00:45 IST

जिल्हाधिकाऱ्यांसमोरच वाद : शेरीनाला योजना ताब्यात घेण्यास नकार

सांगली : शेरीनाला योजनेवरून मंगळवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्यासमोरच महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यातत वाद झाला. ही योजना महापालिकेने ताब्यात घ्यावी, असा आग्रह जीवन प्राधिकरणने धरला होता, तर महापालिकेने अजून योजनेचे काम पूर्ण झालेले नाही, त्यामुळे ती ताब्यात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा पवित्रा घेतला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन त्यावर तोडगा काढावा, अथवा राज्य शासनाकडे हा विषय घेऊन जावे, असा सबुरीचा सल्ला दिला. सांगलीतील शेरीनाल्याचे पाणी धुळगावला देण्याचा प्रकल्प पंधरा वर्षांपूर्वी हाती घेतला होता. ही योजना जीवन प्राधिकरणच्या देखरेखेखाली राबविली जात आहे. मंगळवारी महापालिकेत आयोजित आढावा बैठकीत धुळगाव येथील शेतकऱ्यांनी शेरीनाला योजनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणी मांडली. धुळगाव येथील आॅक्सिडेशन पाँडला गळती लागली आहे. त्यामुळे वीस एकर क्षेत्र पडिक झाले आहे. ही गळती काढावी, तसेच वितरण व्यवस्थेबाबत निर्णय व्हावा, अशी मागणी धुळगावचे सुनील डुबल यांनी केली. जीवन प्राधिकरणचे अधिकारी ताटे यांनी शेरीनाला योजना पूर्ण झाली असून, ती महापालिकेने ताब्यात घ्यावी, असे मत मांडले. त्याला महापौर हारुण शिकलगार, स्थायी सभापती संतोष पाटील यांनी विरोध दर्शविला. अजून योजनाच पूर्ण नाही, तर ती कशी ताब्यात घेणार, असा सवाल केला. पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनीही त्याला दुजोरा दिला. उपमहापौर विजय घाडगे यांनी तर, शेरीनाला योजना पांढरा हत्ती असून, तो चालविणे महापालिकेला शक्य नाही, अशी भूमिका मांडली. त्यावर ताटे यांनी, महापालिकेने ठराव करून दिला आहे. त्यामुळे त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही, असा पवित्रा घेतला. शेरीनाला योजना पूर्ण झाल्याचा दावा चुकीचा आहे. अजून बरीच कामे अपूर्ण आहेत. जीवन प्राधिकरणने पाच पंपांपैकी तीनच पंप बसविले आहेत. त्यातील एक पंप उखडला होता. एक कोटीची यंत्रणा अजून कार्यान्वित नाही, असे संतोष पाटील यांनी स्पष्ट केले. बैठकीतील वाद वाढत गेल्याने अखेर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी हस्तक्षेप केला. (प्रतिनिधी)शेरीनाला योजनेबाबत महापालिका व जीवन प्राधिकरणाने एकत्र बैठक घेऊन कोणती कामे झाली, कोणती झाली नाहीत, याची शहानिशा करावी. योजना चालविण्यास जमत नसेल, तर महापालिकेने ती बंद करावी, असे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले. दोन्ही बाजूने वाद वाढत जाणार आहे. प्रसंगी लवाद नियुक्त करून त्यातून मार्ग काढावा. शेरीनाल्याच्या उर्वरित निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा कारावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.