शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
2
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
3
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
4
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
5
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
6
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
7
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
8
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
9
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
10
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
11
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
12
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
13
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
14
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
15
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
16
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
17
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
18
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
19
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
20
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन

ताकारीचे आवर्तन लांबल्याने पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:31 IST

देवराष्टे : ताकारी उपसा जलसिंचन योजनेतून सोडण्यात आलेले यंदाचे पहिले पाणी बंद होऊन महिना उलटल्याने जमिनीतील पाणीपातळी खालावली असून, ...

देवराष्टे : ताकारी उपसा जलसिंचन योजनेतून सोडण्यात आलेले यंदाचे पहिले पाणी बंद होऊन महिना उलटल्याने जमिनीतील पाणीपातळी खालावली असून, विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी बारमाही बागायतीसह रब्बी पिकांना पाणी कमी पडू लागले आहे. ताकारी योजनेचे पाणी तत्काळ सोडून पिकांना वाचविण्याची मागणी कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांमधून होत आहे.

ताकारी योजनेचे यावर्षीचे पहिले पाणी डिसेंबरला सुरु झाले होते. कालव्याच्या एकूण १३० किलोमीटर(विसापूर-शिरगाव ता. तासगाव)पर्यंतच्या लाभक्षेत्राला पाणी पुरविले होते. शिवाय टप्पा तीनमधून सोनहिरा खोऱ्यातील शेतीसाठी पाणी सोडले होते. तिसऱ्या टप्प्याचे हे पहिले आवर्तन जानेवारीमध्ये बंद करण्यात आले. परंतु, मुख्य कालव्यातून वाहणारे पाणी बंद होऊन महिना उलटला आहे. कडाक्याचा उन्हाळा आणि लाभक्षेत्रात वाढलेल्या सिंचन क्षेत्रासाठी जमिनीतून प्रचंड पाणीउपसा होत आहे. परिणामी लाभक्षेत्रात पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवू लागले आहे. पाणीपातळी प्रचंड खालावली आहे. विहिरींनीही तळ गाठल्याने पिके वाळू लागली आहेत.

नियमित बारमाही पिकांसह रब्बी हंगामातील पिकांसाठी जमिनीतून दैनंदिन भरमसाठ पाणीउपसा होऊ लागला आहे. महिनाभरापूर्वीच ओढे आटले आहेत. सततच्या उपशामुळे विहिरींतील पाणी निघू लागले आहे. उथळ भागातील विहिरी सांगळ्यावर आल्या असून, बहुतांश बोअरवेलचे पाणीही गायब झाले आहे. पाटबंधारेने दुसऱ्या पाणी आवर्तनाचे नियोजन तत्काळ करुन चार दिवसात पाणी सोडल्यास पिकांची होरपळ आणि होणारे संभाव्य नुकसान टळणार आहे. याबाबत पाटबंधारेने गांभीर्याने घेऊन तत्काळ पाणी चालू करावे, अशी मागणी होत आहे.