शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

ताकारीचे आवर्तन लांबल्याने पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:31 IST

देवराष्टे : ताकारी उपसा जलसिंचन योजनेतून सोडण्यात आलेले यंदाचे पहिले पाणी बंद होऊन महिना उलटल्याने जमिनीतील पाणीपातळी खालावली असून, ...

देवराष्टे : ताकारी उपसा जलसिंचन योजनेतून सोडण्यात आलेले यंदाचे पहिले पाणी बंद होऊन महिना उलटल्याने जमिनीतील पाणीपातळी खालावली असून, विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी बारमाही बागायतीसह रब्बी पिकांना पाणी कमी पडू लागले आहे. ताकारी योजनेचे पाणी तत्काळ सोडून पिकांना वाचविण्याची मागणी कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांमधून होत आहे.

ताकारी योजनेचे यावर्षीचे पहिले पाणी डिसेंबरला सुरु झाले होते. कालव्याच्या एकूण १३० किलोमीटर(विसापूर-शिरगाव ता. तासगाव)पर्यंतच्या लाभक्षेत्राला पाणी पुरविले होते. शिवाय टप्पा तीनमधून सोनहिरा खोऱ्यातील शेतीसाठी पाणी सोडले होते. तिसऱ्या टप्प्याचे हे पहिले आवर्तन जानेवारीमध्ये बंद करण्यात आले. परंतु, मुख्य कालव्यातून वाहणारे पाणी बंद होऊन महिना उलटला आहे. कडाक्याचा उन्हाळा आणि लाभक्षेत्रात वाढलेल्या सिंचन क्षेत्रासाठी जमिनीतून प्रचंड पाणीउपसा होत आहे. परिणामी लाभक्षेत्रात पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवू लागले आहे. पाणीपातळी प्रचंड खालावली आहे. विहिरींनीही तळ गाठल्याने पिके वाळू लागली आहेत.

नियमित बारमाही पिकांसह रब्बी हंगामातील पिकांसाठी जमिनीतून दैनंदिन भरमसाठ पाणीउपसा होऊ लागला आहे. महिनाभरापूर्वीच ओढे आटले आहेत. सततच्या उपशामुळे विहिरींतील पाणी निघू लागले आहे. उथळ भागातील विहिरी सांगळ्यावर आल्या असून, बहुतांश बोअरवेलचे पाणीही गायब झाले आहे. पाटबंधारेने दुसऱ्या पाणी आवर्तनाचे नियोजन तत्काळ करुन चार दिवसात पाणी सोडल्यास पिकांची होरपळ आणि होणारे संभाव्य नुकसान टळणार आहे. याबाबत पाटबंधारेने गांभीर्याने घेऊन तत्काळ पाणी चालू करावे, अशी मागणी होत आहे.