शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

जत तालुक्यात लॉकडाऊनमुळे शेतकरी, व्यावसायिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:26 IST

जत : राज्यातील वाढता कोरोना लक्षात घेऊन राज्य सरकारने वीकेंड लाॅकडाऊन व इतर दिवशीही काही दुकाने बंद करण्याचे जाहीर ...

जत : राज्यातील वाढता कोरोना लक्षात घेऊन राज्य सरकारने वीकेंड लाॅकडाऊन व इतर दिवशीही काही दुकाने बंद करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जत तालुक्यातील शेतकरी व लहान मोठे व्यवसाय करणारे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे लाॅकडाऊनचे नियम शिथिल करावेत, अशी मागणी विविध सामाजिक संघटनेतर्फे केली आहे.

सध्या सुरू असलेला लॉकडाऊन शेतकऱ्यांना व छोट्या व्यवसाय करणाऱ्यांना अडचणींचा ठरत आहे. लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे दर दलाल व व्यापाऱ्यांकडून पाडले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिक व ज्यांचे हातावरचे पोट आहे, अशा लोकांना लॉकडाऊन परवडत नाही. लॉकडाऊन सुरू करण्यापूर्वी शेतमजूर व गोर गरिबांच्या बँक खात्यात सरकारने प्रत्येकी पाच हजार रुपये मदत जमा करावी किंवा लॉकडाऊनच्या जाचक अटी रद्द करून नियम कडक करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. सरकारने शेतकरी वर्गाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. हे शक्य होत नसेल तर शेतकरी व सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला जात आहे. आठवडा बाजार बंद केल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत दर कमी मिळत आहेत. दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा माल शेतात पडून आहे. नाशवंत फळे, भाजीपाला, आदी शेतीमाल उन्हाळ्यात रानात जास्त दिवस तग धरून राहू शकत नाही. बाजारात माल कसा घेऊन जाणार हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. बाजार बंद असल्यामुळे लिलाव बंद झाले आहेत, शेतकऱ्यांच्या शेतात येऊन माल कोण विकत घेणार आहे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. लॉकडाऊनच्या जाचक अटीने शेतीमाल बाजारात येणे अशक्य आहे. शेतकऱ्यांना न्याय कोण देणार असा प्रश्न जत तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.