शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

जत तालुक्यात लॉकडाऊनमुळे शेतकरी, व्यावसायिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:26 IST

जत : राज्यातील वाढता कोरोना लक्षात घेऊन राज्य सरकारने वीकेंड लाॅकडाऊन व इतर दिवशीही काही दुकाने बंद करण्याचे जाहीर ...

जत : राज्यातील वाढता कोरोना लक्षात घेऊन राज्य सरकारने वीकेंड लाॅकडाऊन व इतर दिवशीही काही दुकाने बंद करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जत तालुक्यातील शेतकरी व लहान मोठे व्यवसाय करणारे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे लाॅकडाऊनचे नियम शिथिल करावेत, अशी मागणी विविध सामाजिक संघटनेतर्फे केली आहे.

सध्या सुरू असलेला लॉकडाऊन शेतकऱ्यांना व छोट्या व्यवसाय करणाऱ्यांना अडचणींचा ठरत आहे. लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे दर दलाल व व्यापाऱ्यांकडून पाडले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिक व ज्यांचे हातावरचे पोट आहे, अशा लोकांना लॉकडाऊन परवडत नाही. लॉकडाऊन सुरू करण्यापूर्वी शेतमजूर व गोर गरिबांच्या बँक खात्यात सरकारने प्रत्येकी पाच हजार रुपये मदत जमा करावी किंवा लॉकडाऊनच्या जाचक अटी रद्द करून नियम कडक करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. सरकारने शेतकरी वर्गाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. हे शक्य होत नसेल तर शेतकरी व सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला जात आहे. आठवडा बाजार बंद केल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत दर कमी मिळत आहेत. दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा माल शेतात पडून आहे. नाशवंत फळे, भाजीपाला, आदी शेतीमाल उन्हाळ्यात रानात जास्त दिवस तग धरून राहू शकत नाही. बाजारात माल कसा घेऊन जाणार हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. बाजार बंद असल्यामुळे लिलाव बंद झाले आहेत, शेतकऱ्यांच्या शेतात येऊन माल कोण विकत घेणार आहे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. लॉकडाऊनच्या जाचक अटीने शेतीमाल बाजारात येणे अशक्य आहे. शेतकऱ्यांना न्याय कोण देणार असा प्रश्न जत तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.