शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यात लॉकडाऊनमुळे शेतकरी, व्यावसायिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:26 IST

जत : राज्यातील वाढता कोरोना लक्षात घेऊन राज्य सरकारने वीकेंड लाॅकडाऊन व इतर दिवशीही काही दुकाने बंद करण्याचे जाहीर ...

जत : राज्यातील वाढता कोरोना लक्षात घेऊन राज्य सरकारने वीकेंड लाॅकडाऊन व इतर दिवशीही काही दुकाने बंद करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जत तालुक्यातील शेतकरी व लहान मोठे व्यवसाय करणारे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे लाॅकडाऊनचे नियम शिथिल करावेत, अशी मागणी विविध सामाजिक संघटनेतर्फे केली आहे.

सध्या सुरू असलेला लॉकडाऊन शेतकऱ्यांना व छोट्या व्यवसाय करणाऱ्यांना अडचणींचा ठरत आहे. लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे दर दलाल व व्यापाऱ्यांकडून पाडले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिक व ज्यांचे हातावरचे पोट आहे, अशा लोकांना लॉकडाऊन परवडत नाही. लॉकडाऊन सुरू करण्यापूर्वी शेतमजूर व गोर गरिबांच्या बँक खात्यात सरकारने प्रत्येकी पाच हजार रुपये मदत जमा करावी किंवा लॉकडाऊनच्या जाचक अटी रद्द करून नियम कडक करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. सरकारने शेतकरी वर्गाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. हे शक्य होत नसेल तर शेतकरी व सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला जात आहे. आठवडा बाजार बंद केल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत दर कमी मिळत आहेत. दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा माल शेतात पडून आहे. नाशवंत फळे, भाजीपाला, आदी शेतीमाल उन्हाळ्यात रानात जास्त दिवस तग धरून राहू शकत नाही. बाजारात माल कसा घेऊन जाणार हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. बाजार बंद असल्यामुळे लिलाव बंद झाले आहेत, शेतकऱ्यांच्या शेतात येऊन माल कोण विकत घेणार आहे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. लॉकडाऊनच्या जाचक अटीने शेतीमाल बाजारात येणे अशक्य आहे. शेतकऱ्यांना न्याय कोण देणार असा प्रश्न जत तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.