शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

अवकाळी पावसामुळे ज्वारी महागण्याची शक्यता

By admin | Updated: April 3, 2015 00:37 IST

जत तालुक्यातील चित्र : कडबा मोठ्याप्रमाणात काळा पडल्यामुळे वैरणीची टंचाई निर्माण होणार

गजानन पाटील - संख -जत तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे ज्वारी काळी पडली आहे. कडबा भिजल्यामुळे तोही काळा पडला आहे. तो जास्त दिवस टिकून राहणार नसल्याने कुजका वास येत असल्यामुळे वैरणीची टंचाई निर्माण होणार आहे. अवकाळी पावसामुळे ज्वारीच्या उत्पादनातही घट होणार आहे. उतारा कमी निघाल्यामुळे बाजारात ज्वारीच्या दरात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कडबा कमी निघाल्यामुळे वैरणीची टंचाई निर्माण होणार असून दरात वाढ होणार आहे.अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान यामुळे ज्वारी पिकावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. थंडीचे प्रमाण कमी व ढगाळ हवामानामुळे गव्हाला लोंब्या कमी सुटल्या असून तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे ज्वारी व गव्हाच्या उत्पादनात घट होणार आहे.रब्बी हंगाम हा तालुक्यातील शेतीचा मुख्य हंगाम आहे. या हंगामात ९४ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पिके घेतली जातात. त्यापैकी ७८ हजार ९०० हेक्टर क्षेत्रात ज्वारी पीक घेतले जाते. परतीच्या मान्सूनची दमदार हजेरी लाभल्यामुळे पेरणी वेळेवर झाली. अनुकूल हवामानामुळे रब्बीची पेरणी चांगली झाली. आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शिवारभर पिके बहरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. परंतु ऐन काढणीवेळी मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारीची कणसे काळी पडली आहेत. टपोरे दाणे काळे पडल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे. वैरणही काळी पडली आहे. यावर्षी ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे.बहुतेक ठिकाणी सध्या ज्वारी पिकाची काढणी, कणसे तोडणी-मळणी चालू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शेतातील खळ्यावर ज्वारीची कणसे बडवून मळणी करण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. सध्या सर्वत्र शेतकरी वर्ग ज्वारीच्या कणसांची मळणी यंत्रावर करताना दिसत आहे. यंत्रावर मळणीचा दर पोत्याला १०० ते १२० रुपये असा आहे. काही ठिकाणी पोत्याला ४ ते ५ शेर ज्वारी घेतली जाते. यंत्रावर १० ते १२ पोती सहज निघतात, अशी माहिती मळणी यंत्र चालक बिराप्पा करपे यांनी दिली. मळणी यंत्रे बहुतेक रॉकेल किंवा डिझेलवर चालतात.ज्वारीचा कडबा एकरी २००० ते २५०० पेंड्या निघत आहेत. शेतकरी आपल्या शेतातील कडबा न विकता जनावरांसाठी कडब्याच्या मोठ्या गंजी लावून ठेवत आहेत. पण झालेल्या अवकाळी पावसामुळे वैरण रानात भिजली आहे. शेतात असलेले ज्वारी पीकही भिजल्याने कडबा काळा पडला आहे. त्याचा कुजका कुबट वास येत आहे. त्यामुळे वैरणीची गंजी जास्त काळ टिकणार नाही. जनावरे थोड्या दिवसांनी ही वैरण खाणार नाहीत. वैरणीच्या दरात वाढ होणार आहे. सध्या ६ रुपये २५ पैसे पेंडीस, इतका दर आहे. तालुक्यामध्ये २ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर गहू पिके घेतले जाते. यावर्षी परतीच्या समाधानकारक पावसामुळे गहू क्षेत्रात वाढ झाली आहे. कमी थंडी सुटल्यामुळे गव्हाला लोंब्या कमी उरलेल्या असून टपोरे दाणे भरलेले नाहीत. ढगाळ हवामानामुळे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अवकाळी पावसाने गहूही भिजला आहे. लोंब्या गळून पडल्या आहेत. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे.मजुराची टंचाई जाणवत आहे. मजुरीच्या दरात वाढ झाली आहे. ९ ते २ वाजेपर्यंत पुरूषाला २०० रुपये, तर महिलेस १५० रुपये, मजुरी द्यावी लागत आहे. गावात दुपारच्यावेळी माणसांची वर्दळ कमी झाली आहे.