शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

वाढत्या तापमानामुळे पानवेली कोमेजू लागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:13 IST

दिलीप कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कनरवाड : लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांच्या पानवेली वाढत्या उन्हाच्या झळांमुळे होरपळू लागल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचल्याने पानवेलींचे शेंडे व पाने काळी पडून करपू लागली आहेत. दरम्यान, पान उत्पादनात घट आल्याने पान उत्पादक, वाहतूकदार, हमाल आणि विक्रेते ...

दिलीप कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कनरवाड : लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांच्या पानवेली वाढत्या उन्हाच्या झळांमुळे होरपळू लागल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचल्याने पानवेलींचे शेंडे व पाने काळी पडून करपू लागली आहेत. दरम्यान, पान उत्पादनात घट आल्याने पान उत्पादक, वाहतूकदार, हमाल आणि विक्रेते यांच्या जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे.पानवेल ही नाजूक वनस्पती असून, पानवेलीच्या जोमदार वाढीसाठी सततचे ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस आणि निचऱ्याची जमीन असावी लागते. पानवेली किमान २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानाला तग धरतात. मात्र वाढणाºया तापमानाचा घातक परिणाम पानवेलींवर दिसू लागतो. अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील काही भागातून पाहावयास मिळते. यामध्ये सांगली जिल्ह्याचाही समावेश आहे.सांगली जिल्ह्यात २२४ हेक्टर क्षेत्रावर खाऊच्या पानमळ्यांची लागण केली आहे. यापैकी मिरज तालुक्यातील १९८ हेक्टर क्षेत्रात पानवेलींची लागवड केली आहे. केवळ नरवाडला १०० हेक्टर क्षेत्रावर पानमळ्याची लागण झाली आहे. म्हणून या क्षेत्राला पानमळ्यांचे आगार समजले जाते. येथूनच संपूर्ण राज्यात पाने विक्रीसाठी पाठविली जातात. मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, राजकोट (गुजरात), लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर आदी प्रमुख पान बाजारपेठांना खाऊची पाने एजंटाकडून मागवून वाहतूक केली जाते. तसेच यावर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या हातालाही काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.उन्हाचा पारा आणखी वाढल्यास पानवेलींच्या बुंध्याशी असलेले पानवेलीचे वेटोळे करपून पानवेली वाळून जाण्याची भीती पान उत्पादकांतून व्यक्त होत आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊन आर्थिक फटका बसणार आहे.उत्पादकांसाठी उपाययोजनामिरज तालुक्याचे कृषी अधिकारी एच. एस. मेडीदार यांनी पानवेलींचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काही उपाययोजना सुचविल्या आहेत.पानमळ्याला उन्हाळ्याच्या कालावधित तुषार सिंचनाचा वापर करावा.पाणी उपलब्ध असल्यास वाफ्याने पाणी द्यावे.पानमळ्याची तटबंदी सेडनेटऐवजी उसाच्या पाल्याने करावी.रसायनांचा वापर पूर्णपणे टाळून सेंद्रीय खतांचा वापर करावा.उन्हाळ्याच्या कालावधित पानमळ्यातील सावली कमी करू नये.