शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाढत्या तापमानामुळे पानवेली कोमेजू लागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:13 IST

दिलीप कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कनरवाड : लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांच्या पानवेली वाढत्या उन्हाच्या झळांमुळे होरपळू लागल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचल्याने पानवेलींचे शेंडे व पाने काळी पडून करपू लागली आहेत. दरम्यान, पान उत्पादनात घट आल्याने पान उत्पादक, वाहतूकदार, हमाल आणि विक्रेते ...

दिलीप कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कनरवाड : लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांच्या पानवेली वाढत्या उन्हाच्या झळांमुळे होरपळू लागल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचल्याने पानवेलींचे शेंडे व पाने काळी पडून करपू लागली आहेत. दरम्यान, पान उत्पादनात घट आल्याने पान उत्पादक, वाहतूकदार, हमाल आणि विक्रेते यांच्या जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे.पानवेल ही नाजूक वनस्पती असून, पानवेलीच्या जोमदार वाढीसाठी सततचे ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस आणि निचऱ्याची जमीन असावी लागते. पानवेली किमान २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानाला तग धरतात. मात्र वाढणाºया तापमानाचा घातक परिणाम पानवेलींवर दिसू लागतो. अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील काही भागातून पाहावयास मिळते. यामध्ये सांगली जिल्ह्याचाही समावेश आहे.सांगली जिल्ह्यात २२४ हेक्टर क्षेत्रावर खाऊच्या पानमळ्यांची लागण केली आहे. यापैकी मिरज तालुक्यातील १९८ हेक्टर क्षेत्रात पानवेलींची लागवड केली आहे. केवळ नरवाडला १०० हेक्टर क्षेत्रावर पानमळ्याची लागण झाली आहे. म्हणून या क्षेत्राला पानमळ्यांचे आगार समजले जाते. येथूनच संपूर्ण राज्यात पाने विक्रीसाठी पाठविली जातात. मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, राजकोट (गुजरात), लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर आदी प्रमुख पान बाजारपेठांना खाऊची पाने एजंटाकडून मागवून वाहतूक केली जाते. तसेच यावर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या हातालाही काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.उन्हाचा पारा आणखी वाढल्यास पानवेलींच्या बुंध्याशी असलेले पानवेलीचे वेटोळे करपून पानवेली वाळून जाण्याची भीती पान उत्पादकांतून व्यक्त होत आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊन आर्थिक फटका बसणार आहे.उत्पादकांसाठी उपाययोजनामिरज तालुक्याचे कृषी अधिकारी एच. एस. मेडीदार यांनी पानवेलींचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काही उपाययोजना सुचविल्या आहेत.पानमळ्याला उन्हाळ्याच्या कालावधित तुषार सिंचनाचा वापर करावा.पाणी उपलब्ध असल्यास वाफ्याने पाणी द्यावे.पानमळ्याची तटबंदी सेडनेटऐवजी उसाच्या पाल्याने करावी.रसायनांचा वापर पूर्णपणे टाळून सेंद्रीय खतांचा वापर करावा.उन्हाळ्याच्या कालावधित पानमळ्यातील सावली कमी करू नये.