शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

पाणवठे आटल्याने वाघांचे जीवन धोक्यात

By admin | Updated: July 13, 2014 01:05 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक पाणवठे संपल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे वाघ पाण्याच्या शोधात भटकू लागले असल्याने त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. पावसाचा महिनाभरापासून पत्ता नाही;

सांगली : दारूच्या नशेत ट्रक चालवताना दुचाकीस्वारास धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालकावर आज, शनिवार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. साहेबराव नामदेव कांबळे (वय ३०, रा. गुळवंची, ता. जत) असे चालकाचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. येथील आपटा पोलीस चौकीजवळ काल, शुक्रवारी रात्री हा अपघात झाला होता. यामध्ये समडोळी (ता. मिरज) येथील सतीश अण्णासाहेब बेले (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला होता.बेले कुपवाड एमआयडीसीत एका कारखान्यात कामास होते. ते रात्री कामावरून समडोळीला दुचाकीवरून (एमएच १० एए ३९०३) निघाले होते. येथील पुष्पराज चौकातून काळी खणमार्गे ते येत होते. त्यावेळी ट्रक (एमएच १० झेड २११७) मिरजेला निघाला होता. चालक कांबळे दारूच्या नशेत होता. त्याने बेले यांना समोरून जोराची धडक दिली. त्यानंतर त्याने बेले यांना दुचाकीसह दीडशे फूट फरफटत नेले होते. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर कांबळेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. नागरिकांनी ट्रकही पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने अनर्थ टळला. दारूच्या नशेत वाहन चालवून अपघात होऊ शकतो, हे माहीत असूनही कांबळेने बेदरकारपणे ट्रक चालवून भीषण अपघात केला. यामुळे त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब बुधावले तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)