शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

आठवलेंमुळे ढालेवाडीचे नाव दिल्ली तख्तावर

By admin | Updated: July 7, 2016 00:20 IST

मंत्रीपदाने आनंद : कवठेमहांकाळला जल्लोष

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्याचे नाव देशाच्या नकाशात सुवर्णअक्षरांनी कोरले असून, खासदार रामदास आठवले या ढालेवाडीच्या सुपुत्रामुळे हे शक्य झाले आहे. मंगळवारी रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आणि कवठेमहांकाळ तालुक्यात जल्लोषाला सुरुवात झाली. ढालेवाडी या त्यांच्या जन्मगावी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कवठेमहांकाळ तालुका म्हटले की, डोळ्यासमोर येतो तो पाचवीला पूजलेला दुष्काळ आणि उजाड माळरान. परंतु या उजाड माळरानातूनच रामदास आठवले यांच्यासारखे समाजकारणातील व राजकारणातील एक चौफेर व्यक्तिमत्त्व राज्याला व देशाला मिळाले आहे. केवळ सहा महिन्यांचे असताना वडिलांचे छत्र हरपलेल्या रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. सततचा दुष्काळ आणि दारिद्र्य यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहही होत नव्हता. त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण आगळगाव येथे घेतले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण वडिलांच्या मामाच्या गावी सावळज येथे घेतले, तर महाविद्यालयीन शिक्षण चुलते दादू आठवले व चुलती आक्काताई यांच्या सहकार्याने मुंबई येथे घेतले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दलित पँथरची चळवळ नुकतीच जन्मास आली होती. त्यावेळचे दलित पँथरचे नेते प्रा. अरुण कांबळे यांच्याबरोबर रामदास आठवले यांचा परिचय झाला. तेथूनच त्यांच्या सामाजिक, राजकीय कार्याला सुरुवात झाली. दलित पँथरच्या माध्यमातून रामदास आठवले महाराष्ट्रातील घरा-घरात दलितांचे पँथर म्हणून परिचित झाले. मागासवर्गीयांचे ‘मास लीडर’ म्हणून त्यांची क्रेझ आजही टिकून आहे. १९९0 मध्ये ते शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट झाले आणि ढालेवाडीचे नाव संपूर्ण राज्याला समजले. राज्यामध्ये दलित पँथर व रिपब्लिकन पक्ष बळकट करीत असताना, जन्मभूमी असलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातही दलित पँथरची चळवळ मोठ्या जोमात आठवलेंच्या मार्गदर्शनाखाली उभी राहिली व वाढली. तालुक्यातून आठवले यांना मोलाचे सहकार्य व ताकद देण्याचे काम प्रा. दादासाहेब ढेरे, प्रा. मुकुंद माने, प्रा. अरविंद माने, भगवान वाघमारे, महादेव वाघमारे (गुरुजी), संजय कमलेकर यांनी केले. आता केंद्रीय मंत्रिमंडळात रामदास आठवले यांना सामाजिक न्यायमंत्रीपद मिळाले असून, कवठेमहांकाळसारख्या दुष्काळी तालुक्याचे नाव दिल्लीदरबारी पोहोचले आहे. आठवले यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने ढालेवाडीत व तालुक्यातील आगळगाव, ढालगाव, कोकळे, कवठेमहांकाळ, कुची आदी ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (वार्ताहर) अपेक्षा वाढल्या... कवठेमहांकाळसारख्या दुष्काळी भागाला केंद्रीय मंत्रीपद पहिल्यांदाच मिळाल्याने ढालेवाडी व कवठेमहांकाळ तालुका चर्चेत आला आहे. आठवले यांच्या मंत्रीपदामुळे तालुक्यातील पाणीप्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न मिटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा येथील जनतेतून व्यक्त केली जात आहे.