शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या गहिवराने आबांचे स्मरण

By admin | Updated: February 16, 2016 00:17 IST

तासगाव शहरातील चित्र : डिजिटल फलकांतून उमटल्या कार्यकर्त्यांच्या भावना

दत्ता पाटील -- तासगाव --माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाला आज, मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यकर्त्यांनी तासगाव शहरासह गावोगावी डिजिटल फलक उभे केले आहेत. आबांच्या पश्चात तालुक्यातील पाणी योजना ठप्प असल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या दुष्काळाच्या गहिवरानेच कार्यकर्त्यांनी आबांचे स्मरण केल्याचे दिसून येत आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे गेल्यावर्षी १६ फेब्रुवारीला निधन झाले. त्यांच्या निधनानंतर तालुक्यासह जिल्ह्यात आणि राज्यावरही शोककळा पसरली. मात्र आबांच्या राजकारणाच्या सुरुवातीपासून आबांवर प्रेम करणारा सामान्य कार्यकर्ता आजही आबांच्या जाण्याचा धक्का पचवू शकलेला नाही. गेल्या वर्षभरात तालुक्यातील राजकारणासह सर्वच क्षेत्रात अनेक बदल झाले. काही कार्यकर्ते सोडून गेले. काही सत्तास्थाने ताब्यातून गेली, तर काही सत्तास्थाने आणखी भक्कम झाली. आबांच्या निधनाचे दु:ख पचवून त्यांच्या कुटुंबियांनीही हळूहळू तालुक्याची सूत्रे ताब्यात घेतली. मात्र आबांच्या जाण्याने तालुक्याचे आणि कार्यकर्त्यांचे झालेले नुकसान स्पष्टपणे जाणवत आहे.आबांच्या पश्चात तालुक्याच्या वाट्याला वनवास आल्याची भावना सामान्य कार्यकर्त्यांच्या तोंडातून उमटत आहे. आबा असते, तर दुष्काळी परिस्थितीत तालुक्यालाच नव्हे, तर जिल्ह्यालाही भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला नसता. ‘आबा तुम्ही गेलात, पाणी गेलं...’ अशी स्पष्ट भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. आबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गावोगावी आणि तालुकाभर उभारलेल्या डिजिटल फलकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. ‘ओसाड माळरानावर जेव्हा पाणी खळखळत जाईल... गावा-गावातील भांडण गावातच सोडवले जाईल... स्वच्छतेसाठी जेव्हा गाव हातात खराटा घेईल... आबा तुमची आठवण येईल’ अशा शब्दांत जागोजागी लावण्यात आलेल्या फलकांवर कार्यकर्त्यांनी भावनांना वाट मोकळी केली आहे.आबांच्या पश्चात राष्ट्रवादी पक्ष सोडून काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ‘फितूर झाले लाख तरी... झुंज आम्ही देणार. .. गद्दारांना गाडून... आबासाहेबांचे विचार पुढे नेणार...’ अशा शब्दांत पक्ष सोडून जाणाऱ्यांवर डिजिटल फलकांच्या माध्यमातून टीकास्त्र सोडण्यात आले आहे.आबांच्या लोकाभिमुख अभियानांना तडे ‘पाणी गेले... तंटामुक्तीला मुक्ती मिळाली, डान्स बारबाला नाचू लागल्या, मटका सुरू झाला, स्वच्छता अभियान बंद झाले म्हणून आबा परत या... अशाप्रकारे भावनिक साद घालणारे आणि भाजप सरकारच्या कारभारावर आसूड ओढणारे काही डिजिटल फलकही शहरात लावण्यात आले आहेत.