शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

दुष्काळामुळे वारणेचे पाणी मोरणेत सोडा

By admin | Updated: November 5, 2015 23:55 IST

शिवाजीराव नाईक : शिराळा तालुका समन्वय समितीची बैठक

कोकरूड : गेल्यावर्षी वाकुर्डे (बु) योजनेतून शेतीला पाणी देऊनही शेतीपंपांची वीज बिले मोठ्या शेतकऱ्यांनी जाणूनबुजून थकित ठेवली आहेत. त्यांना पंधरा दिवसांची मुदत द्या. त्या कालावधित पैसे आले नाहीत, तर ही कनेक्शन्स ताबडतोब तोडा. मात्र दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी वारणा नदीचे पाणी त्वरित मोरणा नदीत सोडावे, असे आदेश आ. शिवाजीराव नाईक यांनी दिले. ते तालुका समन्वय समितीच्या बैठकीत बोलत होते.आ. नाईक म्हणाले, गेल्यावर्षी अनेक प्रकारचे प्रयत्न व आंदोलनानंतर वाकुर्डे योजनेसाठी पाणी मोरणा नदीला पाटबंधारे विभागाने सोडले होते. चालूवर्षी अत्यंत अपुरा पाऊस झाल्याने तालुक्याच्या मेणी, येळापूर, गुढे, पाचगणी, उत्तर विभाग व मोरणा धरणाच्या लाभक्षेत्रातील पिके हातची गेली आहेत. परतीचा पाऊस न झाल्याने रब्बीदेखील अडचणीत आहे. वाकुर्डे योजनेतून शेतीला पाणी मिळणे गरजेचे आहे. गेल्यावर्षी मोरणा नदीत वारणा नदीचे पाणी सोडल्याने उत्पादनात दुप्पट वाढ झाली होती. छोट्या शेतकऱ्यांनी वीजबिले भरली; मात्र अद्याप २ लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी थकवले आहेत. आता मोठ्या ठगांचीच कनेक्शन तोडावीत. मात्र कोणत्याही परिस्थितीत या विभागाच्या दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी त्वरित वारणा नदीचे पाणी मोरणेत सोडावे.नाईक म्हणाले, विद्युत महामंडळाने हातेगाव व खिरवडे पंप हाऊस भगीरथ योजनेतून दोन्ही ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करून त्वरित विद्युत कनेक्शन द्यावीत. यावेळी १ डिसेंबरला वारणेचे आवर्तन सुरू होणार असून, त्यामधून वाकुर्डेला पाणी देणार असल्याची माहिती वारणा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी दीपक चव्हाण, सुखदेव पाटील, संग्राम पाटील, आनंदराव पाटील, दगडू सावंत, दीपक पाटील, संदीप तडाखे, कृषी अधिकारी भगवान माने, प्रादेशिक परिवहन विभागाचे रा. आ. काटकर उपस्थित होते. (वार्ताहर)