शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दुष्काळामुळे वारणेचे पाणी मोरणेत सोडा

By admin | Updated: November 5, 2015 23:55 IST

शिवाजीराव नाईक : शिराळा तालुका समन्वय समितीची बैठक

कोकरूड : गेल्यावर्षी वाकुर्डे (बु) योजनेतून शेतीला पाणी देऊनही शेतीपंपांची वीज बिले मोठ्या शेतकऱ्यांनी जाणूनबुजून थकित ठेवली आहेत. त्यांना पंधरा दिवसांची मुदत द्या. त्या कालावधित पैसे आले नाहीत, तर ही कनेक्शन्स ताबडतोब तोडा. मात्र दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी वारणा नदीचे पाणी त्वरित मोरणा नदीत सोडावे, असे आदेश आ. शिवाजीराव नाईक यांनी दिले. ते तालुका समन्वय समितीच्या बैठकीत बोलत होते.आ. नाईक म्हणाले, गेल्यावर्षी अनेक प्रकारचे प्रयत्न व आंदोलनानंतर वाकुर्डे योजनेसाठी पाणी मोरणा नदीला पाटबंधारे विभागाने सोडले होते. चालूवर्षी अत्यंत अपुरा पाऊस झाल्याने तालुक्याच्या मेणी, येळापूर, गुढे, पाचगणी, उत्तर विभाग व मोरणा धरणाच्या लाभक्षेत्रातील पिके हातची गेली आहेत. परतीचा पाऊस न झाल्याने रब्बीदेखील अडचणीत आहे. वाकुर्डे योजनेतून शेतीला पाणी मिळणे गरजेचे आहे. गेल्यावर्षी मोरणा नदीत वारणा नदीचे पाणी सोडल्याने उत्पादनात दुप्पट वाढ झाली होती. छोट्या शेतकऱ्यांनी वीजबिले भरली; मात्र अद्याप २ लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी थकवले आहेत. आता मोठ्या ठगांचीच कनेक्शन तोडावीत. मात्र कोणत्याही परिस्थितीत या विभागाच्या दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी त्वरित वारणा नदीचे पाणी मोरणेत सोडावे.नाईक म्हणाले, विद्युत महामंडळाने हातेगाव व खिरवडे पंप हाऊस भगीरथ योजनेतून दोन्ही ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करून त्वरित विद्युत कनेक्शन द्यावीत. यावेळी १ डिसेंबरला वारणेचे आवर्तन सुरू होणार असून, त्यामधून वाकुर्डेला पाणी देणार असल्याची माहिती वारणा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी दीपक चव्हाण, सुखदेव पाटील, संग्राम पाटील, आनंदराव पाटील, दगडू सावंत, दीपक पाटील, संदीप तडाखे, कृषी अधिकारी भगवान माने, प्रादेशिक परिवहन विभागाचे रा. आ. काटकर उपस्थित होते. (वार्ताहर)