शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

कर्नाटकात प्रवेशबंदीमुळे एसटी फेऱ्या कागवाड सीमेपर्यंतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:25 IST

मिरज : कोरोन‌ाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात प्रवेश बंद केल्याने महाराष्ट्र एसटीच्या फेऱ्या कागवाड सीमेपर्यंत सुरू आहेत. मात्र, कर्नाटकातून एसटी फेऱ्या ...

मिरज : कोरोन‌ाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात प्रवेश बंद केल्याने महाराष्ट्र एसटीच्या फेऱ्या कागवाड सीमेपर्यंत सुरू आहेत. मात्र, कर्नाटकातून एसटी फेऱ्या सुरू असल्याने मिरजेत प्रवासी आणून सोडण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटक कागवाड सीमेवर प्रवेशबंदी आहे. मात्र, कर्नाटकातून येणाऱ्यांना महाराष्ट्रात प्रवेश खुला, असे परस्पर विरोधी चित्र आहे.

गेल्या महिनाभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने सोमवारपासून मिरजेतून येणाऱ्या एसटी प्रवाशांना कर्नाटकात प्रवेशासाठी कोरोना निगेटिव्ह तपासणी अहवालाची सक्ती करण्यात आली आहे. कागवाड सीमेवर महाराष्ट्रातून येणाऱ्या एसटी व खाजगी वाहनांना रोखण्यात येत आहे. मात्र, महाराष्ट्रातून एसटी बसमधून येणाऱ्या प्रवाशांना यापूर्वी प्रवेश देण्यात येत होता. मात्र, आता कोरोना निगेटिव्ह अहवाल नसल्यास एसटी प्रवाशांनाही सीमेवर एसटीतून उतरविण्यात येत आहे.

बेळगाव जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रातील प्रवाशांवर निर्बंध घातले असले तरी कर्नाटकातून येणाऱ्या बस म्हैसाळ सीमेवरून विना अडथळा ये- जा करीत आहेत. मात्र, कर्नाटकातून प्रवासी घेऊन मिरजेत येणाऱ्या कर्नाटक बस जाताना कागवाड सीमेपर्यंतच प्रवासी नेत आहेत. मिरज आगारातून दररोज जमखंडीला जाणाऱ्या केवळ चारच फेऱ्या आहेत. मिरजेशिवाय जिल्ह्यातील इतर आगाराच्याही कर्नाटकात मोजक्याच फेऱ्या आहेत. मात्र, सीमेवर कर्नाटक प्रवेशासाठी निर्बंध लागू करण्यात आल्याने महाराष्ट्र एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून कागवाड सीमेपर्यंतच प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे एसटीचे मिरज आगार व्यवस्थापक अप्पासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

चाैकट

कच्च्या रस्त्याने कर्नाटकात

कर्नाटक प्रशासनाने कागवाड नाक्याजवळ तपासणी सुरू केल्याने अनेक खाजगी वाहने नरवाडमार्गे कच्च्या रस्त्याने कर्नाटकात जात आहेत. म्हैसाळ सीमेवर कर्नाटकातून येणाऱ्यांवर महाराष्ट्र सरकारचे कसलेच बंधन नाही. प्रवेशबंदीमुळे कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांची संख्याही घटल्याचे चित्र आहे.