शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

जात दाखल्यांची प्रकरणे धुळीत!

By admin | Updated: November 22, 2014 00:03 IST

इस्लामपूर प्रांत कार्यालय : नागरिक त्रस्त

युनूस शेख -इस्लामपूर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयातून सर्वच जातीची प्रमाणपत्रे देण्याचे काम रखडले आहे. कार्यालयातील अधिकारी या दाखल्यांना हातच लावत नाहीत, अशी अवस्था आहे. अगोदरच दाखला मिळण्यासाठीच्या जाचक अटी, त्यात सेतू कार्यालयातील आॅनलाईन कामकाज व त्यासाठी पडणारा भुर्दंड, यामुळे जनतेचा जीव मेटाकुटीस आला आहे. त्यात भरीस भर म्हणून अधिकाऱ्यांकडून होणारा विलंब, अशा कात्रीत कामकाजाचा खेळखंडोबा झाला आहे.कामे खोळंबून ठेवणे, नागरिकांना हेलपाटे मारायला लावणे हा या कार्यालयाचा सरकारी शिरस्ताच बनला आहे. एक तर कार्यालय गावाबाहेर. त्यासाठी होणारी पायपीट किंवा इंधनाचा खर्च वेगळाच. कार्यालय तिसऱ्या मजल्यावर. कार्यालयात जाण्यासाठी जिन्याच्या पायऱ्या चढतानाच प्रत्येकाला दम भरतो. त्यामुळे पुढे कार्यालयात जाऊन आपले काम सांगण्याचा दमच त्या व्यक्तीमध्ये उरत नाही. या कार्यालयातून विविध जातीचे दाखले निर्गमीत केले जातात. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून इथल्या दाखल्यांना अधिकाऱ्यांचा हातच लागलेला नाही. पूर्वी एका अधिकाऱ्याने फेटाळलेला दाखला देताना इथल्या अधिकाऱ्यांचे हात पोळले. तेव्हापासून तर हे दाखले देण्याचे काम थंडावले आहे. अधिकाऱ्यांचे हातही दाखल्यावर सही करण्यासाठी वळत नाहीत, इतकी धास्ती बसली आहे. परिणामी त्याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे.जातीचा दाखला मिळण्यासाठी जी कागदपत्रे जमा करावी लागतात, ते एक मोठे दिव्यच असते. १९५0 पूर्वीचा महसुली पुरावा, हे त्यातले सर्वात मोठे बालंट असते. गेल्या ६ महिन्यांपासून जातीच्या दाखल्याची अनेक कामे काहींना काही त्रुटी काढून बाजूला ठेवण्याचे अथवा निकाली काढण्याचे काम सजगपणे सुरु असते. त्यातूनही एखाद्याचा हट्ट वाढला, तर मग ‘काय द्याचं बोला’ची भाषा सुरु होते आणि मगच तो दाखला हातात पडतो. या कार्यालयातील कामकाजाचा खेळखंडोबा झाल्याने इकडे अनेक विद्यार्थ्यांचे जातीचा दाखला न मिळाल्याने मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. मात्र इथल्या अधिकाऱ्यांना त्याची तमा नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून, इथल्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या द्याव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.शिवसेनेचा आंदोलनाचा इशाराप्रांताधिकारी कार्यालयातून सर्वच जातीचे दाखले देण्यास विलंब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, १५ दिवसांच्या आत जातीचा दाखला देण्याची कार्यवाही सुरु न झाल्यास शिवसेना स्टाईलने कार्यालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा शहरप्रमुख शकील सय्यद यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांना दिले आहे. यावेळी राजू कोळी, गजानन जाधव, हौसेराव आडके, महंमद शेख, सुनील कापसे, जितेंद्र ढबू, वसीम तांबोळी, दिलीप साळुंखे उपस्थित होते.