शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

दलितांवरील अत्याचार आरक्षणामुळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दलितांवर अत्याचार वाढण्यास आरक्षण कारणीभूत ठरत आहे. आरक्षणाने दुजाभाव होत असल्याचे मत तयार होत आहे. त्यामुळे बहुसंख्येने असलेल्या समाजालाही आरक्षण देण्यासाठी आरक्षणाच्या टक्केवारीचा कोटा वाढविण्यात यावा, अशी शिफारस केंद्रीय मंत्री समितीपुढे आपण केलेली आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी सांगलीतील पत्रकार ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दलितांवर अत्याचार वाढण्यास आरक्षण कारणीभूत ठरत आहे. आरक्षणाने दुजाभाव होत असल्याचे मत तयार होत आहे. त्यामुळे बहुसंख्येने असलेल्या समाजालाही आरक्षण देण्यासाठी आरक्षणाच्या टक्केवारीचा कोटा वाढविण्यात यावा, अशी शिफारस केंद्रीय मंत्री समितीपुढे आपण केलेली आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, आरक्षणामुळे दलितांनाच सवलती मिळत असल्याची भावना आरक्षणापासून वंचित समाजघटकांमध्ये होत आहे. कायद्यानुसार आता आरक्षणाचा कोटा ५० टक्क्यावर घालवता येत नाही. त्यामुळे हा कोटाच ७५ टक्के करण्याचा विचार मी मांडला आहे. महाराष्टÑात मराठा समाजासाठी १६ टक्के आणि उर्वरित ९ टक्क्यांमध्ये इतर समाजांनाही आरक्षण देता येईल. त्याचबरोबर विविध राज्यातील ठाकूर, गुज्जर, पटेल, राजपूत अशा बहुसंख्येने असणाºया समाजालाही समाविष्ट करून घेता येणे शक्य आहे. ७५ टक्के आरक्षणाचा कोटा झाल्यानंतर उर्वरित २५ टक्के जागांमध्ये खुल्या स्पर्धा होतील.महाराष्टÑात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मताशी मी सहमत आहे. मराठा समाजाने केलेली आंदोलने स्तुत्य आहेत. त्यामध्ये कुठेही हिंसा नव्हती. आरक्षण मागतानाही त्यांनी अन्य समाजघटकांच्या आरक्षणाला धक्का लावू नये, अशी सकारात्मक मागणी केली आहे. सध्याच्या स्थितीत केवळ राज्य शासनाने निर्णय घेऊन तो न्यायालयीन लढाईत टिकणार नाही. न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी संसदेत त्याविषयीच्या कायद्यात बदल करण्याची गरज आहे. असा बदल करता येऊ शकतो, ही बाब मीच मंत्रिमंडळ समितीपुढे मांडलेली आहे. पूर्ण ताकदीनीशी मी त्याचा पाठपुरावा करीत आहे.समाजात आजही जातीव्यवस्था दिसून येत असली तरी, गेल्या अनेक वर्षांत सामाजिक एकोपा घडविणाºया गोष्टीही घडत आहेत. ही बाब सकारात्मक आहे. मी दलित पॅँथरचा प्रमुख म्हणून काम करत असताना राज्यभरातील अनेक गावामध्ये मला मराठा व अन्य समाजाचे नेते मंदिरांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलावत होते. अनेक जाती-जातींमध्ये आता रोटी-बेटीचे व्यवहारही झाले आहेत. हे सर्व बदल चांगले आहेत. काही लोकांच्या कट्टरतेमुळे जातीव्यवस्था टिकून आहे. जातीव्यवस्था मोडून काढण्यासाठी आता विविध समाजघटकांनीच पुढाकार घ्यायला हवा, असे ते म्हणाले.ब्राह्मणच मराठ्यांना आरक्षण देणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असले तरी त्यांचे नेतृत्व व्यापक आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे. पूजेला, श्राद्धाला किंवा कोणत्याही विधीला आवश्यक असणारा ब्राह्मणच आता आरक्षणालाही आवश्यक आहे, असे मत आठवलेंनी व्यक्त केले. फडणवीस यांनी गेल्या काही वर्षात घेतलेले निर्णय हे सर्व समाजघटकांना न्याय देणारे असेच आहेत. मराठा समाजाच्या मोर्चानंतर त्यांच्यासाठी घेतलेले निर्णयही अत्यंत चांगले आहेत. या निर्णयांचे मी स्वागत करतो. यापुढेही अशाच कामांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.