शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

दलितांवरील अत्याचार आरक्षणामुळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दलितांवर अत्याचार वाढण्यास आरक्षण कारणीभूत ठरत आहे. आरक्षणाने दुजाभाव होत असल्याचे मत तयार होत आहे. त्यामुळे बहुसंख्येने असलेल्या समाजालाही आरक्षण देण्यासाठी आरक्षणाच्या टक्केवारीचा कोटा वाढविण्यात यावा, अशी शिफारस केंद्रीय मंत्री समितीपुढे आपण केलेली आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी सांगलीतील पत्रकार ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दलितांवर अत्याचार वाढण्यास आरक्षण कारणीभूत ठरत आहे. आरक्षणाने दुजाभाव होत असल्याचे मत तयार होत आहे. त्यामुळे बहुसंख्येने असलेल्या समाजालाही आरक्षण देण्यासाठी आरक्षणाच्या टक्केवारीचा कोटा वाढविण्यात यावा, अशी शिफारस केंद्रीय मंत्री समितीपुढे आपण केलेली आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, आरक्षणामुळे दलितांनाच सवलती मिळत असल्याची भावना आरक्षणापासून वंचित समाजघटकांमध्ये होत आहे. कायद्यानुसार आता आरक्षणाचा कोटा ५० टक्क्यावर घालवता येत नाही. त्यामुळे हा कोटाच ७५ टक्के करण्याचा विचार मी मांडला आहे. महाराष्टÑात मराठा समाजासाठी १६ टक्के आणि उर्वरित ९ टक्क्यांमध्ये इतर समाजांनाही आरक्षण देता येईल. त्याचबरोबर विविध राज्यातील ठाकूर, गुज्जर, पटेल, राजपूत अशा बहुसंख्येने असणाºया समाजालाही समाविष्ट करून घेता येणे शक्य आहे. ७५ टक्के आरक्षणाचा कोटा झाल्यानंतर उर्वरित २५ टक्के जागांमध्ये खुल्या स्पर्धा होतील.महाराष्टÑात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मताशी मी सहमत आहे. मराठा समाजाने केलेली आंदोलने स्तुत्य आहेत. त्यामध्ये कुठेही हिंसा नव्हती. आरक्षण मागतानाही त्यांनी अन्य समाजघटकांच्या आरक्षणाला धक्का लावू नये, अशी सकारात्मक मागणी केली आहे. सध्याच्या स्थितीत केवळ राज्य शासनाने निर्णय घेऊन तो न्यायालयीन लढाईत टिकणार नाही. न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी संसदेत त्याविषयीच्या कायद्यात बदल करण्याची गरज आहे. असा बदल करता येऊ शकतो, ही बाब मीच मंत्रिमंडळ समितीपुढे मांडलेली आहे. पूर्ण ताकदीनीशी मी त्याचा पाठपुरावा करीत आहे.समाजात आजही जातीव्यवस्था दिसून येत असली तरी, गेल्या अनेक वर्षांत सामाजिक एकोपा घडविणाºया गोष्टीही घडत आहेत. ही बाब सकारात्मक आहे. मी दलित पॅँथरचा प्रमुख म्हणून काम करत असताना राज्यभरातील अनेक गावामध्ये मला मराठा व अन्य समाजाचे नेते मंदिरांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलावत होते. अनेक जाती-जातींमध्ये आता रोटी-बेटीचे व्यवहारही झाले आहेत. हे सर्व बदल चांगले आहेत. काही लोकांच्या कट्टरतेमुळे जातीव्यवस्था टिकून आहे. जातीव्यवस्था मोडून काढण्यासाठी आता विविध समाजघटकांनीच पुढाकार घ्यायला हवा, असे ते म्हणाले.ब्राह्मणच मराठ्यांना आरक्षण देणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असले तरी त्यांचे नेतृत्व व्यापक आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे. पूजेला, श्राद्धाला किंवा कोणत्याही विधीला आवश्यक असणारा ब्राह्मणच आता आरक्षणालाही आवश्यक आहे, असे मत आठवलेंनी व्यक्त केले. फडणवीस यांनी गेल्या काही वर्षात घेतलेले निर्णय हे सर्व समाजघटकांना न्याय देणारे असेच आहेत. मराठा समाजाच्या मोर्चानंतर त्यांच्यासाठी घेतलेले निर्णयही अत्यंत चांगले आहेत. या निर्णयांचे मी स्वागत करतो. यापुढेही अशाच कामांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.