शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

दुधगावची क्षारपड जमीन सुधारणा संस्था अवसायनात : योजना बासनात गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:55 IST

मिरज तालुक्यातील दुधगाव येथे क्षारपड जमिनीचे क्षेत्र मोठे आहे. या क्षारपड जमिनीतून पुन्हा शेतीचे उत्पादन घेण्यासाठी २००५ मध्ये माजी आमदार दिनकर पाटील यांच्या प्रयत्नातून ‘वारणा क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्थे’ची स्थापना केली.

ठळक मुद्देसभासदांना कर्जवसुलीच्या नोटिसा; शेतकऱ्यांमधून प्रशासनाच्या भूमिकेबद्दल नाराजी

अमोल कुदळे ।दुधगाव : मिरज तालुक्यातील दुधगाव येथे क्षारपड जमिनीचे क्षेत्र मोठे आहे. या क्षारपड जमिनीतून पुन्हा शेतीचे उत्पादन घेण्यासाठी २००५ मध्ये माजी आमदार दिनकर पाटील यांच्या प्रयत्नातून ‘वारणा क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्थे’ची स्थापना केली. क्षारपड जमीन सुधारणा योजना राबविली, परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. सध्या ही संस्था अवसायनात निघाली आहे. अवसायकाने सभासदांना कर्जवसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत.

दुधगावला वारणा नदीमुळे बारमाही पाणी उपलब्ध आहे. परंतु शेतीमध्ये अतिरिक्त पाण्याचा वापर केल्यामुळे सुमारे १२०० ते १३०० एकर जमीन क्षारपड झाली आहे. यामुळे जमिनी नापीक बनल्या आहेत. या जमिनी पुन्हा पीक घेण्यासाठी योग्य व्हाव्यात, यासाठी २००५ मध्ये कोट्यवधीचा खर्च करून क्षारपड जमीन सुधारणा योजना राबविली. परंतु त्याचा कसलाही उपयोग झाला नाही. या योजनेसाठी स्थापन केलेली वारणा क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था अवसायनात निघाली असून संस्थेवर अवसायकाची नेमणूक केली आहे. संस्थेचा कसलाही लाभ झालेला नसतानाही बॅँकेने मात्र कर्ज हप्त्याच्या नोटिसा दिल्या आहेत. ज्यांना या कामाचा ठेका दिला होता, त्यांच्याकडून ते काम व्यवस्थित केले जात नव्हते. त्यावेळी अनेक शेतकºयांनीही याबाबत तक्रारी दाखल केल्या. ज्यांनी ज्यांनी तक्रारी दाखल केल्या, त्यांच्या शेतात तेवढे व्यवस्थित काम करण्याचा प्रयत्न झाला होता.

योजनेचे काम योग्य न झाल्याने संबंधित शेतकºयांनी कर्जाचे हप्ते भरणेच बंद केले होते. संस्थेवर अवसायकाची नेमणूक केली आहे. या अवसायकाने संबंधित कर्जदारांना कर्ज भरण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.काम नाही, मात्र कर्जवसुलीच्या नोटिसासंबंधित कर्जाची मुदत ३० जून २०१६ रोजी संपली आहे. संबंधितांनी कर्ज भरले नसल्यामुळे कर्जाच्या रकमा व्याजासह २० हजारापासून एक लाखापर्यंत गेल्या आहेत. योजनेचे काम सुरळीत झालेले नाही. तरीही संस्थेने कर्जाची रक्कम भरण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. 

केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ४० टक्के अनुदान आणि शेतकºयांनी २० टक्के रक्कम भरावयाची होती. शेतकºयांच्या पैशासाठी वारणा क्षारपड जमीन सुधारणा संस्थेच्या माध्यमातून कर्ज वाटण्यात आले. परंतु योजनेचे काम निकृष्ट झाल्याने कोणत्याही सभासदाने कर्जाचे हप्ते भरलेले नाहीत आणि येथून पुढेही भरणार नाहीत.- सुभाष पाटील-समगोंडा, शेतकरी

 

टॅग्स :Land Roverलँड रोव्हरFarmerशेतकरी