शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
2
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
3
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
4
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
5
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
6
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
7
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
8
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
9
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
10
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
11
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
12
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
13
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
14
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
15
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
16
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
17
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...
18
Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा
19
VIDEO: तुफान राडा! निवडणुकीचं तिकीट नाकारलं म्हणून RJD नेत्याने कुर्ता फाडला, भरपूर रडला...
20
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...

दुधगावची क्षारपड जमीन सुधारणा संस्था अवसायनात : योजना बासनात गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:55 IST

मिरज तालुक्यातील दुधगाव येथे क्षारपड जमिनीचे क्षेत्र मोठे आहे. या क्षारपड जमिनीतून पुन्हा शेतीचे उत्पादन घेण्यासाठी २००५ मध्ये माजी आमदार दिनकर पाटील यांच्या प्रयत्नातून ‘वारणा क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्थे’ची स्थापना केली.

ठळक मुद्देसभासदांना कर्जवसुलीच्या नोटिसा; शेतकऱ्यांमधून प्रशासनाच्या भूमिकेबद्दल नाराजी

अमोल कुदळे ।दुधगाव : मिरज तालुक्यातील दुधगाव येथे क्षारपड जमिनीचे क्षेत्र मोठे आहे. या क्षारपड जमिनीतून पुन्हा शेतीचे उत्पादन घेण्यासाठी २००५ मध्ये माजी आमदार दिनकर पाटील यांच्या प्रयत्नातून ‘वारणा क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्थे’ची स्थापना केली. क्षारपड जमीन सुधारणा योजना राबविली, परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. सध्या ही संस्था अवसायनात निघाली आहे. अवसायकाने सभासदांना कर्जवसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत.

दुधगावला वारणा नदीमुळे बारमाही पाणी उपलब्ध आहे. परंतु शेतीमध्ये अतिरिक्त पाण्याचा वापर केल्यामुळे सुमारे १२०० ते १३०० एकर जमीन क्षारपड झाली आहे. यामुळे जमिनी नापीक बनल्या आहेत. या जमिनी पुन्हा पीक घेण्यासाठी योग्य व्हाव्यात, यासाठी २००५ मध्ये कोट्यवधीचा खर्च करून क्षारपड जमीन सुधारणा योजना राबविली. परंतु त्याचा कसलाही उपयोग झाला नाही. या योजनेसाठी स्थापन केलेली वारणा क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था अवसायनात निघाली असून संस्थेवर अवसायकाची नेमणूक केली आहे. संस्थेचा कसलाही लाभ झालेला नसतानाही बॅँकेने मात्र कर्ज हप्त्याच्या नोटिसा दिल्या आहेत. ज्यांना या कामाचा ठेका दिला होता, त्यांच्याकडून ते काम व्यवस्थित केले जात नव्हते. त्यावेळी अनेक शेतकºयांनीही याबाबत तक्रारी दाखल केल्या. ज्यांनी ज्यांनी तक्रारी दाखल केल्या, त्यांच्या शेतात तेवढे व्यवस्थित काम करण्याचा प्रयत्न झाला होता.

योजनेचे काम योग्य न झाल्याने संबंधित शेतकºयांनी कर्जाचे हप्ते भरणेच बंद केले होते. संस्थेवर अवसायकाची नेमणूक केली आहे. या अवसायकाने संबंधित कर्जदारांना कर्ज भरण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.काम नाही, मात्र कर्जवसुलीच्या नोटिसासंबंधित कर्जाची मुदत ३० जून २०१६ रोजी संपली आहे. संबंधितांनी कर्ज भरले नसल्यामुळे कर्जाच्या रकमा व्याजासह २० हजारापासून एक लाखापर्यंत गेल्या आहेत. योजनेचे काम सुरळीत झालेले नाही. तरीही संस्थेने कर्जाची रक्कम भरण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. 

केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ४० टक्के अनुदान आणि शेतकºयांनी २० टक्के रक्कम भरावयाची होती. शेतकºयांच्या पैशासाठी वारणा क्षारपड जमीन सुधारणा संस्थेच्या माध्यमातून कर्ज वाटण्यात आले. परंतु योजनेचे काम निकृष्ट झाल्याने कोणत्याही सभासदाने कर्जाचे हप्ते भरलेले नाहीत आणि येथून पुढेही भरणार नाहीत.- सुभाष पाटील-समगोंडा, शेतकरी

 

टॅग्स :Land Roverलँड रोव्हरFarmerशेतकरी