शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

दुबईतील कंपनीचा मिरजेतील द्राक्ष व्यापाऱ्यास पावणेतीन कोटीचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : दुबईतील जान जबेल अल नजर फूडस्टफ या कंपनीने तीन कोटी रुपये किमतीची द्राक्षे मागवून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मिरज : दुबईतील जान जबेल अल नजर फूडस्टफ या कंपनीने तीन कोटी रुपये किमतीची द्राक्षे मागवून मिरजेतील व्यापाऱ्यास दोन कोटी ८० लाखाचा गंडा घातला. याप्रकरणी गांधी चाैक पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दुबईतील कंपनीस द्राक्षे पाठविणारे जिल्ह्यातील शेतकरी या प्रकाराने हवालदिल झाले आहेत.

मिरजेतील पांडुरंग जगताप यांची कृषिमाल निर्यात करणारी ऑल एशिया इम्पोर्ट ॲन्ड एक्सपोर्ट या नावाची व्यापारी फर्म आहे. या फर्मच्या माध्यामातून जगताप गेली काही वर्षे फळे, भाजीपाला व ड्रायफ्रूटस परदेशात निर्यात करतात. त्यांच्या व्यवसायाची गुगलवर, वेबसाईटवर दुबईतील जान जबेल अल नजर फूडस्टफ ट्रेडिंग या कंपनीतून जगताप यांच्याशी संपर्क साधून द्राक्षे खरेदीबाबत डिसेंबर २०२० व जानेवारी २०२१ या महिन्यात बोलणी झाली. या कंपनीमार्फत जगताप यांना ई-मेल करून द्राक्ष खरेदीची ऑर्डर देण्यात आली. त्यानुसार जगताप यांनी सांगली जिल्ह्यातील सावळज, नागठाणे, जत, बिळूर येथील शेतकऱ्यांचा निर्यात दर्जाची द्राक्षे जहाजाने दुबईला पाठविली.

जान जबेल कंपनीचे व्यवस्थापक सुबिध व आनंद देसाई यांनी बिल स्कॅन काॅपीच्या आधारे ३० टक्के रक्कम व उरलेली ७० टक्के रक्कम देणार असल्याचे सांगितले होते. सुबिध व आनंद देसाई यांनी द्राक्षाचे तीन कंटेनर दुबईत पोहोचल्यानंतर तीन टप्प्यात २५ लाख रुपये मार्च महिन्यात पाठविले. ही रक्कम मिळेपर्यंत आणखी १२ कंटेनर जगताप यांच्याकडून घेतले. त्यांनतर जगताप यांनी राहिलेल्या रकमेची मागणी केली असता सुबिध व आनंद देसाई यांनी मार्च महिनाअखेरीस रक्कम देतो असे सांगितले. जगताप यांनी पाठविलेली १५ कंटेनरचे तीन कोटी पाच लाख बिलापैकी दोन कोटी ८० लाख बाकी अद्याप येणे आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असल्याने सुबिध व आनंद देसाई यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ करीत ११ एप्रिलपासून त्यांचे फोन बंद केले. दुबईतील जानजबेल अल नजर फूडस्टफ कंपनीचे सुबिध व आनंद देसाई यांनी विश्वास संपादन करून दोन कोटी ८० लाखाची फसवणूक केल्याची फिर्याद पांडुरंग जगताप यांनी गांधी चाैक पोलिसात दिली आहे.

चाैकट

बोगस धनादेशाद्वारे अनेकांना गंडा

दुबईतील जान जबेल कंपनीने कृषीमाल आयात करून ४० कोटींचे बोगस धनादेश देऊन फसवणूक केल्याबद्दल महिनाभरापूर्वी मुंबईतही गुन्हा दाखल झाला आहे. या कंपनीतून संपर्क साधणारे भारतीय नागरिक असून, त्यांनी अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.