शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाळव्याच्या विभाजनाचा डाव : नायकवडी

By admin | Updated: November 5, 2014 23:45 IST

प्रसंगी रक्त सांडू--स्वातंत्र्यपूर्व काळापासून क्रांतिकारी ऐतिहासिक वारसा असलेल्या

वाळवा : स्वातंत्र्यपूर्व काळापासून क्रांतिकारी ऐतिहासिक वारसा असलेल्या वाळवा तालुक्याचे विभाजन करुन वाळव्याचे नाव पुसून टाकण्याचा उद्योग राजकारण्यांनी चालविला आहे. हा प्रयत्न कदापीही यशस्वी होऊ देणार नाही. त्यासाठी वाळव्याचा युवक प्रसंगी आपले रक्तही सांडेल, अशी स्पष्टोक्ती सरपंच गौरव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.नायकवडी म्हणाले की, वाळवा विधानसभेचे नामकरण करून ते इस्लामपूर विधानसभा केले. त्यातही राजकीय हेतूच होता. त्यावेळी आम्ही विरोध नको, म्हणून गप्प राहिलो. क्रांतिकारी वाळव्याचे नाव क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानामुळे, प्रतिसरकारच्या लढ्याने ब्रिटिश पार्लमेंटरी बोर्डाला नोंद आहे, त्या वाळवा गावचे तालुका म्हणून असलेले नाव पुसून टाकण्याचा घाट विरोधकांनी सुरू केला आहे, असे खात्रीलायकरित्या समजले आहे. आज वाळव्याचे विभाजन करुन आष्टा तालुका निर्माण करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. आष्टा तालुका होण्यास आमचा विरोध नाही, पण या नवीन आष्टा तालुक्यात वाळवा गावाचा समावेश करुन ‘वाळवा तालुका’ पुसण्याचा जो घाट घातला आहे, त्याला मात्र आमचा निश्चितच विरोध आहे. वाळवा तालुका हे अस्तित्व कायम राहिलेच पाहिजे. त्यासाठी वाळवा गाव आष्टा तालुक्यात समाविष्ट होता कामा नये. वाळव्याच्या विकासाला कायमच सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांनी विरोध केला आहे, हे वाळव्याला जोडणाऱ्या रस्त्यांवरुन गेली २५ वर्षे दिसून येतच आहे. यावेळी शिवाजी सापकर, राजेंद्र साळुंखे, विश्वास थोरात, नंदू पाटील, प्रताप शिंदे, मोहन सव्वाशे, पोपट फाटक, बाळासाहेब आचरे, विश्वास थोरात आदी उपस्थित होते. (वार्ताहर)प्रसंगी रक्त सांडूज्या क्रांतिकारी डॉ. नागनाथअण्णांनी वाळव्याचे नाव समता, बंधुता व सद्विचाराने ओळख पटवून देण्यास केले, त्याच वाळव्याचा विकास राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन कायमस्वरुपी थांबविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वाळवा तालुक्याचे नाव बदलण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी प्रसंगी रक्त सांडू व दुसऱ्या क्रांतीला प्रारंभ करु, असा इशारा गौरव नायकवडी यांनी दिला.