शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

वाळवा-शिराळ्यात सोयीच्या आघाड्यांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:24 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : ग्रामपंचायत निवडणूक पक्ष पातळीवर न होता गटांतर्गत होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. वाळवा-शिराळ्यात आमदार जयंत पाटील, माजी आ. मानसिंगराव नाईक, हुतात्मा सुंकुलाचे वैभव नायकवडी, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, काँग्रेसचे सत्यजित देशमुख, नानासाहेब महाडिक यांचे गट सक्षम आहेत. या गटांच्या प्रत्येक गावांमध्ये सोयीच्या आघाड्या होणार ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : ग्रामपंचायत निवडणूक पक्ष पातळीवर न होता गटांतर्गत होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. वाळवा-शिराळ्यात आमदार जयंत पाटील, माजी आ. मानसिंगराव नाईक, हुतात्मा सुंकुलाचे वैभव नायकवडी, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, काँग्रेसचे सत्यजित देशमुख, नानासाहेब महाडिक यांचे गट सक्षम आहेत. या गटांच्या प्रत्येक गावांमध्ये सोयीच्या आघाड्या होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.राष्ट्रीय आणि राज्य पक्षाबरोबरच शिवसेना, आर. पी. आय., स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटना आदी पक्षाचे नेतेही निवडणूकीत पक्षांना सोयीचा पाठिंबा देणार असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या आदेशाला बगल देत स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी हा निर्णय घेतला आहे.शिराळा येथे माजी आ. मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन भाऊंची ‘समझोता एक्स्प्रेस’ काही अपवादात्मक निवडणुका सोडल्या, तर नेहमीच सुसाट धावल्याचे चित्र आहे. मानसिंगराव नाईक यांच्याकडे संस्था आणि कारखान्याच्या माध्यमातून कामगार शक्ती मोठी आहे. तरीसुध्दा त्यांना काँग्रेसची साथ घ्यावी लागते. या दोघांच्या विरोधात भाजपचे शिवाजीराव नाईक यांच्या गटानेही सत्तेच्या जोरावर मोठे आव्हान देण्याचा प्रयत्न चालू आहे.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्या गटाची ताकद पाहता, वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक यांनी तर ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडी स्थापन करण्याला बगल देत दोन्ही गट आपआपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. याउलट जयंत पाटील हे राजारामबापू उद्योग समूहातील कामगार शक्तीच्या ताकदीवर आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर ग्रामपंचायत निवडणुकीत उतरणार आहेत. परंतु प्रत्येक गावात त्यांच्या पक्षांतर्गत गटांची असणारी धुसफूस हा डोकेदुखीचा विषय असतो. यावेळी जयंत पाटील यांनाच बगल देऊन स्वत:च्या गटाची ताकद दाखविण्यासाठी ग्रामीण भागातील बहुतांशी नेते, कार्यकर्ते सरसावले आहेत. या निवडणुकीत जो निवडून येईल तो आमचाच, अशी भूमिका जयंत पाटील घेणार आहेत.इस्लामपूर पालिकेचे पक्षप्रतोद विक्रमभाऊ पाटील यांनी वाळवा-शिराळा तालुक्यात भाजपला मानणाºया कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. परंतु ग्रामीण भागात अद्यापही विक्रम पाटील यांचा संपर्क म्हणावा तसा नाही. त्यामुळे त्यांचा निर्णय कितपत योग्य ठरणार, हे आगामी निवडणूकीत स्पष्ट होईल.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत पाच जागा मिळाल्याने पवार यांची ताकद चांगलीच वाढली आहे. त्यामुळे त्यांनीही ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याबाबत चाचपणी सुरु केली आहे.स्वाभिमानी, बळीराजा शेतकरी संघटना व शेतकरी संघटना या संघटनांच्या निर्णयाकडेही मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. या नेत्यांची भूमिका काय असणार, असाही प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होतांना दिसत आहे.