शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा-शिराळ्यात सोयीच्या आघाड्यांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:24 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : ग्रामपंचायत निवडणूक पक्ष पातळीवर न होता गटांतर्गत होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. वाळवा-शिराळ्यात आमदार जयंत पाटील, माजी आ. मानसिंगराव नाईक, हुतात्मा सुंकुलाचे वैभव नायकवडी, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, काँग्रेसचे सत्यजित देशमुख, नानासाहेब महाडिक यांचे गट सक्षम आहेत. या गटांच्या प्रत्येक गावांमध्ये सोयीच्या आघाड्या होणार ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : ग्रामपंचायत निवडणूक पक्ष पातळीवर न होता गटांतर्गत होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. वाळवा-शिराळ्यात आमदार जयंत पाटील, माजी आ. मानसिंगराव नाईक, हुतात्मा सुंकुलाचे वैभव नायकवडी, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, काँग्रेसचे सत्यजित देशमुख, नानासाहेब महाडिक यांचे गट सक्षम आहेत. या गटांच्या प्रत्येक गावांमध्ये सोयीच्या आघाड्या होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.राष्ट्रीय आणि राज्य पक्षाबरोबरच शिवसेना, आर. पी. आय., स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटना आदी पक्षाचे नेतेही निवडणूकीत पक्षांना सोयीचा पाठिंबा देणार असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या आदेशाला बगल देत स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी हा निर्णय घेतला आहे.शिराळा येथे माजी आ. मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन भाऊंची ‘समझोता एक्स्प्रेस’ काही अपवादात्मक निवडणुका सोडल्या, तर नेहमीच सुसाट धावल्याचे चित्र आहे. मानसिंगराव नाईक यांच्याकडे संस्था आणि कारखान्याच्या माध्यमातून कामगार शक्ती मोठी आहे. तरीसुध्दा त्यांना काँग्रेसची साथ घ्यावी लागते. या दोघांच्या विरोधात भाजपचे शिवाजीराव नाईक यांच्या गटानेही सत्तेच्या जोरावर मोठे आव्हान देण्याचा प्रयत्न चालू आहे.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्या गटाची ताकद पाहता, वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक यांनी तर ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडी स्थापन करण्याला बगल देत दोन्ही गट आपआपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. याउलट जयंत पाटील हे राजारामबापू उद्योग समूहातील कामगार शक्तीच्या ताकदीवर आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर ग्रामपंचायत निवडणुकीत उतरणार आहेत. परंतु प्रत्येक गावात त्यांच्या पक्षांतर्गत गटांची असणारी धुसफूस हा डोकेदुखीचा विषय असतो. यावेळी जयंत पाटील यांनाच बगल देऊन स्वत:च्या गटाची ताकद दाखविण्यासाठी ग्रामीण भागातील बहुतांशी नेते, कार्यकर्ते सरसावले आहेत. या निवडणुकीत जो निवडून येईल तो आमचाच, अशी भूमिका जयंत पाटील घेणार आहेत.इस्लामपूर पालिकेचे पक्षप्रतोद विक्रमभाऊ पाटील यांनी वाळवा-शिराळा तालुक्यात भाजपला मानणाºया कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. परंतु ग्रामीण भागात अद्यापही विक्रम पाटील यांचा संपर्क म्हणावा तसा नाही. त्यामुळे त्यांचा निर्णय कितपत योग्य ठरणार, हे आगामी निवडणूकीत स्पष्ट होईल.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत पाच जागा मिळाल्याने पवार यांची ताकद चांगलीच वाढली आहे. त्यामुळे त्यांनीही ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याबाबत चाचपणी सुरु केली आहे.स्वाभिमानी, बळीराजा शेतकरी संघटना व शेतकरी संघटना या संघटनांच्या निर्णयाकडेही मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. या नेत्यांची भूमिका काय असणार, असाही प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होतांना दिसत आहे.