शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

वाळवा-शिराळ्यात सोयीच्या आघाड्यांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:24 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : ग्रामपंचायत निवडणूक पक्ष पातळीवर न होता गटांतर्गत होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. वाळवा-शिराळ्यात आमदार जयंत पाटील, माजी आ. मानसिंगराव नाईक, हुतात्मा सुंकुलाचे वैभव नायकवडी, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, काँग्रेसचे सत्यजित देशमुख, नानासाहेब महाडिक यांचे गट सक्षम आहेत. या गटांच्या प्रत्येक गावांमध्ये सोयीच्या आघाड्या होणार ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : ग्रामपंचायत निवडणूक पक्ष पातळीवर न होता गटांतर्गत होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. वाळवा-शिराळ्यात आमदार जयंत पाटील, माजी आ. मानसिंगराव नाईक, हुतात्मा सुंकुलाचे वैभव नायकवडी, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, काँग्रेसचे सत्यजित देशमुख, नानासाहेब महाडिक यांचे गट सक्षम आहेत. या गटांच्या प्रत्येक गावांमध्ये सोयीच्या आघाड्या होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.राष्ट्रीय आणि राज्य पक्षाबरोबरच शिवसेना, आर. पी. आय., स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटना आदी पक्षाचे नेतेही निवडणूकीत पक्षांना सोयीचा पाठिंबा देणार असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या आदेशाला बगल देत स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी हा निर्णय घेतला आहे.शिराळा येथे माजी आ. मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन भाऊंची ‘समझोता एक्स्प्रेस’ काही अपवादात्मक निवडणुका सोडल्या, तर नेहमीच सुसाट धावल्याचे चित्र आहे. मानसिंगराव नाईक यांच्याकडे संस्था आणि कारखान्याच्या माध्यमातून कामगार शक्ती मोठी आहे. तरीसुध्दा त्यांना काँग्रेसची साथ घ्यावी लागते. या दोघांच्या विरोधात भाजपचे शिवाजीराव नाईक यांच्या गटानेही सत्तेच्या जोरावर मोठे आव्हान देण्याचा प्रयत्न चालू आहे.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्या गटाची ताकद पाहता, वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक यांनी तर ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडी स्थापन करण्याला बगल देत दोन्ही गट आपआपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. याउलट जयंत पाटील हे राजारामबापू उद्योग समूहातील कामगार शक्तीच्या ताकदीवर आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर ग्रामपंचायत निवडणुकीत उतरणार आहेत. परंतु प्रत्येक गावात त्यांच्या पक्षांतर्गत गटांची असणारी धुसफूस हा डोकेदुखीचा विषय असतो. यावेळी जयंत पाटील यांनाच बगल देऊन स्वत:च्या गटाची ताकद दाखविण्यासाठी ग्रामीण भागातील बहुतांशी नेते, कार्यकर्ते सरसावले आहेत. या निवडणुकीत जो निवडून येईल तो आमचाच, अशी भूमिका जयंत पाटील घेणार आहेत.इस्लामपूर पालिकेचे पक्षप्रतोद विक्रमभाऊ पाटील यांनी वाळवा-शिराळा तालुक्यात भाजपला मानणाºया कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. परंतु ग्रामीण भागात अद्यापही विक्रम पाटील यांचा संपर्क म्हणावा तसा नाही. त्यामुळे त्यांचा निर्णय कितपत योग्य ठरणार, हे आगामी निवडणूकीत स्पष्ट होईल.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत पाच जागा मिळाल्याने पवार यांची ताकद चांगलीच वाढली आहे. त्यामुळे त्यांनीही ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याबाबत चाचपणी सुरु केली आहे.स्वाभिमानी, बळीराजा शेतकरी संघटना व शेतकरी संघटना या संघटनांच्या निर्णयाकडेही मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. या नेत्यांची भूमिका काय असणार, असाही प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होतांना दिसत आहे.