शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या झळा...रंगपंचमी, होळी पाण्याविना खेळा!

By admin | Updated: March 23, 2016 00:41 IST

संघटनांकडून जनजागृती सुरू : सणांच्या निमित्ताने जिल्ह्यात पाण्याची आणीबाणी टाळण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक

सांगली : जिल्ह्यातील निम्मा भाग तहानलेला असताना, आता येणाऱ्या होळी आणि रंगपंचमी या सणांमध्ये होणाऱ्या पाण्याच्या बेसुमार वापरावर पुढाकार घेऊन अंकुश ठेवणे आवश्यक आहे. शहरातील पाण्याची नासाडी टाळण्यासाठी सामाजिक संघटनांनी प्रबोधन केले असले तरी तरुणांच्या उत्साहापुढे त्यास बंधने येत आहेत. मात्र यंदाची होळी, रंगपंचमी पाण्याविना साजरी करण्याचे आवाहन अनेक सामाजिक संस्थांनी केले आहे. बुधवार, दि. २३ मार्चला साजरी होणारी होळी आणि सोमवार, दि. २८ ला साजऱ्या होणाऱ्या रंगपंचमीला पाण्याची बचत हा मंत्र जपावा, अशीही हाक देण्यात आली आहे.भारतीय सणांमध्ये सर्वाधिक उत्साह देणारा सण म्हणजे होळीचा सण. होळी पेटवून सण साजरा केला जातो. हिवाळ्यात सुरू झालेली थंडी होळीपासून कमी होते, असे अनुभवी लोक सांगतात. शहरात होळी रस्त्यावर साजरी करण्यात येत असल्याने प्रदूषण वाढते, रस्त्याची आणि पर्यावरणाची हानी होते. अलीकडे हा सण पर्यावरणपूरक साजरा करण्याकडे कल वाढला आहे. त्यातही होळीमध्ये झाडे न जाळता टाकाऊ कचरा आणि इतर निरुपयोगी साहित्य जाळण्याची संकल्पना अनेक ठिकाणी राबविण्यात येते आहे. उत्तर भारतात होळीला रंगांची उधळण केली जाते. सांगली शहरातील काही भागात रंगांची उधळण करत होळी साजरी केली जाते. जिल्ह्यात रंगपंचमीला रंगांची उधळण होत असली तरी रासायनिक रंगांमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, शिवाय पाण्याची मोठी नासाडी होते. सध्याची जिल्ह्यातील परिस्थिती पाहता पाण्याची नासाडी टाळणे आवश्यक आहे. अगदी आता शहरातही एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने केले असल्याने तरुणांनी होळीमध्ये, रंगपंचमीमध्ये पाणी वापर टाळण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेणे आवश्यक आहे.शहरात अनेक ठिकाणी बॅरेलमध्ये अथवा काहिलीमध्ये पाणी भरून, तर काही ठिकाणी थेट शॉवर तयार करुन ‘रेन डान्स’ करीत रंगपंचमी साजरी केली जाते. यातून मोठ्याप्रमाणावर पाणी वाया जाते. त्याऐवजी सणांचा आनंद घेण्यासाठी पावडर शेडमधील, शरीराला अपाय न करणारे रंग वापरुन सणाचा आनंद द्विगणित करता येऊ शकतो. त्याचबरोबरच अनेक ठिकाणी सध्या रंगीबेरंगी फुलांची उधळण करत सण साजरे केले जातात. त्यामुळेच प्रत्येकाने भान ठेवून पाण्याचा वापर टाळून सण साजरे करणे आता आवश्यक बनले आहे. (प्रतिनिधी)पाण्याचा काटकसरीने वापर करणे आता महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला, तर कोणताही संवेदनशील माणूस पाण्याचा अति वापर निश्चितच करणार नाही. राज्यात पाण्यासाठी २२ जणांचे प्राण गेल्याने, पाण्याचे मोल प्रत्येकाला कळले आहे. महत्त्वाचे म्हणजे नैतिकदृष्ट्या आजही समाजाला पाणी वाचविण्यासाठी आवाहन करावे लागते, हे चुकीचे आहे. जिल्ह्यातील एक भाग दुष्काळात सापडला असताना, कोणीही पाण्याचा वापर करून होळी अथवा रंगपंचमी साजरी करु नये.- अ‍ॅड. अमित शिंदेसामाजिक कार्यकर्तेमुळात होळीसारखे सण साजरेच करु नयेत, या मताचा मी आहे. पर्यावरणाची हानी करीत साजरे होणारे कोणतेही सण टाळले पाहिजे. आपल्या जिल्ह्यात पाण्याची निर्माण झालेली बिकट परिस्थिती लक्षात घेता, कोणीही पाण्याचा अतिरिक्त वापर करु नये. होळीला झाडांची तोड न करता आणि रंगपंचमीला पाण्याची नासाडी टाळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे भान ठेवून सण साजरे केल्यास, पाण्याचा वापर न करताही सण साजरा करता येऊ शकतो. - शिवाजी ओऊळकर, सामाजिक कार्यकर्ते