शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

पाण्यासाठी ‘कोरडे ओढ’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 00:31 IST

शिवसेना आक्रमक : कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर एकतारी भजन

कवठेमहांकाळ : दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या म्हैसाळ पाणी योजनेचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र बनत चालला असून, राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेने मंगळवारी आपल्याच सरकारविरोधात शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘कोरडे ओढ’ आंदोलन केले. शिवाय गांधीगिरी मार्गाने एकतारी भजनाचा कार्यक्रमही तहसील कार्यालयाच्या आवारात केला आणि विठ्ठलाला साकडे घातले. म्हैसाळ योजनेचे पाणी तात्काळ सुरू करण्याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तहसील कार्यालयाच्या आवारात तालुक्यात प्रथमच अनोखे आंदोलन जनतेला पाहायला मिळाले. म्हैसाळ योजनेचे पाणी तातडीने द्यावे, या मागणीसाठी शिवसेनेने ‘कोरडे ओढ’ आंदोलन केले. कडकलक्ष्मीच्या रूपातील कार्यकर्ता स्वत:च्या अंगावर आसुडाचे जोरदार फटके घेताना तहसील कार्यालयात आवाज घुमत होता आणि हा आवाज कशाचा आहे, हे पाहण्यासाठी शेकडो नागरिक आंदोलनस्थळी जमा झाले होते. आसुडाच्या फटक्यांचा आवाज थेट शासनापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला होता.दुष्काळी भाग ‘म्हैसाळ’च्या पाण्याविना तडफडत आहे. हे पाणी तात्काळ सुरू व्हावे म्हणून शिवसेनेने याचवेळी एकतारी भजन गायनाचेही आंदोलन केले. तहसील कार्यालयाच्या आवारात मंडप उभारून शेतकऱ्यांनी हातात वीणा, टाळ घेऊन विठ्ठलाला साकडे घातले आणि ‘झोपलेल्या शासनाला बा विठ्ठला जागे कर’, अशी विनवणी केली. तहसील कार्यालय आवारातच एकतारी भजन चालू असल्याचे समजताच गर्दी झाली आणि लोकांनी या आंदोलनाला पाठिंंबा दिला. आपल्याच पाठिंंब्यावर सत्तेवर असलेल्या शिवसेनेला शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करण्याची वेळ आली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन शासनाला दिले. नायब तहसीलदार रूपाली रेडेकर यांनी निवेदन स्वीकारले. आंदोलनकर्त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दुष्काळी भागातील बळिराजाला वाचविण्यासाठी म्हैसाळ योजना सुरू करावी, अग्रणी नदीच्या पात्रातील बंधारे या पाण्याने भरून घ्यावेत, ढालगाव भाग आणि घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांना टेंभूचे पाणी द्यावे, तालुक्यातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवावा, त्वरित चारा डेपो सुरू करावेत अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. पाण्याच्या मागणीसाठी कवठेमहांकाळ बंदही पुकारला होता, परंतु शासन जागे झाले नाही. त्यामुळे यापुढच्या काळात पाणी आले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी दिनकर पाटील, संजय चव्हाण, अनिल बाबर, प्रकाश चव्हाण, अनिल पाटील, गुंडा पोतदार, मोहन पाटील, रमेश जाधव, संजय साठे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. (वार्ताहर)अनोखे आंदोलन : तालुक्यात चर्चाशिवसेनेने केलेल्या अनोख्या आंदोलनाची चर्चा तालुक्यात होती. एकतारी भजनाचे सूर आणि आसुडाचे फटके दिवसभर ऐकू येत असल्याने गर्दी झाली होती. एकतारी भजनासाठी उभारलेल्या मंडपात ‘झोपी गेलेल्या शासनाने जागे व्हावे’, असे फलक शिवसेनेने लावले होते.