शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

पाण्यासाठी ‘कोरडे ओढ’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 00:31 IST

शिवसेना आक्रमक : कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर एकतारी भजन

कवठेमहांकाळ : दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या म्हैसाळ पाणी योजनेचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र बनत चालला असून, राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेने मंगळवारी आपल्याच सरकारविरोधात शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘कोरडे ओढ’ आंदोलन केले. शिवाय गांधीगिरी मार्गाने एकतारी भजनाचा कार्यक्रमही तहसील कार्यालयाच्या आवारात केला आणि विठ्ठलाला साकडे घातले. म्हैसाळ योजनेचे पाणी तात्काळ सुरू करण्याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तहसील कार्यालयाच्या आवारात तालुक्यात प्रथमच अनोखे आंदोलन जनतेला पाहायला मिळाले. म्हैसाळ योजनेचे पाणी तातडीने द्यावे, या मागणीसाठी शिवसेनेने ‘कोरडे ओढ’ आंदोलन केले. कडकलक्ष्मीच्या रूपातील कार्यकर्ता स्वत:च्या अंगावर आसुडाचे जोरदार फटके घेताना तहसील कार्यालयात आवाज घुमत होता आणि हा आवाज कशाचा आहे, हे पाहण्यासाठी शेकडो नागरिक आंदोलनस्थळी जमा झाले होते. आसुडाच्या फटक्यांचा आवाज थेट शासनापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला होता.दुष्काळी भाग ‘म्हैसाळ’च्या पाण्याविना तडफडत आहे. हे पाणी तात्काळ सुरू व्हावे म्हणून शिवसेनेने याचवेळी एकतारी भजन गायनाचेही आंदोलन केले. तहसील कार्यालयाच्या आवारात मंडप उभारून शेतकऱ्यांनी हातात वीणा, टाळ घेऊन विठ्ठलाला साकडे घातले आणि ‘झोपलेल्या शासनाला बा विठ्ठला जागे कर’, अशी विनवणी केली. तहसील कार्यालय आवारातच एकतारी भजन चालू असल्याचे समजताच गर्दी झाली आणि लोकांनी या आंदोलनाला पाठिंंबा दिला. आपल्याच पाठिंंब्यावर सत्तेवर असलेल्या शिवसेनेला शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करण्याची वेळ आली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन शासनाला दिले. नायब तहसीलदार रूपाली रेडेकर यांनी निवेदन स्वीकारले. आंदोलनकर्त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दुष्काळी भागातील बळिराजाला वाचविण्यासाठी म्हैसाळ योजना सुरू करावी, अग्रणी नदीच्या पात्रातील बंधारे या पाण्याने भरून घ्यावेत, ढालगाव भाग आणि घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांना टेंभूचे पाणी द्यावे, तालुक्यातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवावा, त्वरित चारा डेपो सुरू करावेत अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. पाण्याच्या मागणीसाठी कवठेमहांकाळ बंदही पुकारला होता, परंतु शासन जागे झाले नाही. त्यामुळे यापुढच्या काळात पाणी आले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी दिनकर पाटील, संजय चव्हाण, अनिल बाबर, प्रकाश चव्हाण, अनिल पाटील, गुंडा पोतदार, मोहन पाटील, रमेश जाधव, संजय साठे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. (वार्ताहर)अनोखे आंदोलन : तालुक्यात चर्चाशिवसेनेने केलेल्या अनोख्या आंदोलनाची चर्चा तालुक्यात होती. एकतारी भजनाचे सूर आणि आसुडाचे फटके दिवसभर ऐकू येत असल्याने गर्दी झाली होती. एकतारी भजनासाठी उभारलेल्या मंडपात ‘झोपी गेलेल्या शासनाने जागे व्हावे’, असे फलक शिवसेनेने लावले होते.