शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

पाण्यासाठी ‘कोरडे ओढ’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 00:31 IST

शिवसेना आक्रमक : कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर एकतारी भजन

कवठेमहांकाळ : दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या म्हैसाळ पाणी योजनेचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र बनत चालला असून, राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेने मंगळवारी आपल्याच सरकारविरोधात शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘कोरडे ओढ’ आंदोलन केले. शिवाय गांधीगिरी मार्गाने एकतारी भजनाचा कार्यक्रमही तहसील कार्यालयाच्या आवारात केला आणि विठ्ठलाला साकडे घातले. म्हैसाळ योजनेचे पाणी तात्काळ सुरू करण्याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तहसील कार्यालयाच्या आवारात तालुक्यात प्रथमच अनोखे आंदोलन जनतेला पाहायला मिळाले. म्हैसाळ योजनेचे पाणी तातडीने द्यावे, या मागणीसाठी शिवसेनेने ‘कोरडे ओढ’ आंदोलन केले. कडकलक्ष्मीच्या रूपातील कार्यकर्ता स्वत:च्या अंगावर आसुडाचे जोरदार फटके घेताना तहसील कार्यालयात आवाज घुमत होता आणि हा आवाज कशाचा आहे, हे पाहण्यासाठी शेकडो नागरिक आंदोलनस्थळी जमा झाले होते. आसुडाच्या फटक्यांचा आवाज थेट शासनापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला होता.दुष्काळी भाग ‘म्हैसाळ’च्या पाण्याविना तडफडत आहे. हे पाणी तात्काळ सुरू व्हावे म्हणून शिवसेनेने याचवेळी एकतारी भजन गायनाचेही आंदोलन केले. तहसील कार्यालयाच्या आवारात मंडप उभारून शेतकऱ्यांनी हातात वीणा, टाळ घेऊन विठ्ठलाला साकडे घातले आणि ‘झोपलेल्या शासनाला बा विठ्ठला जागे कर’, अशी विनवणी केली. तहसील कार्यालय आवारातच एकतारी भजन चालू असल्याचे समजताच गर्दी झाली आणि लोकांनी या आंदोलनाला पाठिंंबा दिला. आपल्याच पाठिंंब्यावर सत्तेवर असलेल्या शिवसेनेला शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करण्याची वेळ आली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन शासनाला दिले. नायब तहसीलदार रूपाली रेडेकर यांनी निवेदन स्वीकारले. आंदोलनकर्त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दुष्काळी भागातील बळिराजाला वाचविण्यासाठी म्हैसाळ योजना सुरू करावी, अग्रणी नदीच्या पात्रातील बंधारे या पाण्याने भरून घ्यावेत, ढालगाव भाग आणि घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांना टेंभूचे पाणी द्यावे, तालुक्यातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवावा, त्वरित चारा डेपो सुरू करावेत अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. पाण्याच्या मागणीसाठी कवठेमहांकाळ बंदही पुकारला होता, परंतु शासन जागे झाले नाही. त्यामुळे यापुढच्या काळात पाणी आले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी दिनकर पाटील, संजय चव्हाण, अनिल बाबर, प्रकाश चव्हाण, अनिल पाटील, गुंडा पोतदार, मोहन पाटील, रमेश जाधव, संजय साठे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. (वार्ताहर)अनोखे आंदोलन : तालुक्यात चर्चाशिवसेनेने केलेल्या अनोख्या आंदोलनाची चर्चा तालुक्यात होती. एकतारी भजनाचे सूर आणि आसुडाचे फटके दिवसभर ऐकू येत असल्याने गर्दी झाली होती. एकतारी भजनासाठी उभारलेल्या मंडपात ‘झोपी गेलेल्या शासनाने जागे व्हावे’, असे फलक शिवसेनेने लावले होते.