शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी विट्यातील रणरागिणी सरसावल्या

By admin | Updated: May 23, 2017 23:31 IST

दारूबंदीसाठी विट्यातील रणरागिणी सरसावल्या

लोकमत न्यूज नेटवर्कविटा : विटा येथील साळशिंगे रस्त्यावरील मशिदीजवळ सुरू असलेले देशी दारूचे दुकान तातडीने बंद करण्यासाठी मंगळवारी विट्यातील महिला आक्रमक झाल्या. गेल्या दीड ते दोन महिन्यापासून त्रास सहन करणाऱ्या रणरागिणींनी नगरपालिका व उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून, दुकान बंद करण्याची मागणी केली. यावेळी पालिकेने संबंधित देशी दारूच्या दुकानाचे नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) रद्द करण्याचा ठराव मंगळवारी मासिक सभेत घेतला.येथील यशवंतनगरमध्ये देशी दारूचे दुकान आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यमार्गालगतची सर्व दारू विक्री बंद झाली असून, पाचशे मीटरच्या बाहेर असलेले, आळसंदचे हिंमतराव जाधव यांचे एकमेव देशी दारूचे दुकान सुरू आहे. त्यामुळे विट्यासह ग्रामीण भागातील तळीरामांची संख्या येथे वाढली आहे. परिणामी, महिला व विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे. संतप्त महिलांनी मंगळवारी दुपारी पालिका व उत्पादन शुल्कच्या कार्यालयावर धडक दिली. नगराध्यक्षा सौ. प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, मुख्याधिकारी महेश रोकडे यांना महिलांनी निवेदन देऊन, संबंधित दुकानाचे नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली. त्यावेळी मुख्याधिकारी रोकडे यांनी, दुकान बंद करण्याचा अंतिम निर्णय उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारात आहे. मात्र, नाहरकत प्रमाणपत्र रद्दबाबत सभेत ठराव घेऊन तो संबंधित विभागाकडे पाठविला जाईल, अशी ग्वाही दिली. त्यानंतर महिलांनी उत्पादन शुल्क कार्यालयाकडे मोर्चा वळविला. दुय्यम निरीक्षक एस. एन. पाटील यांना घेराव घालून, किती दिवसात दुकान बंद करणार, असा जाब विचारला. त्यावेळी पाटील यांनी, दुकान बंद करण्याची मागणी वरिष्ठांना कळविण्यात येईल, असे सांगितले. यावेळी शैला दिवटे, देवता आळंदे, मंगल लोटके, अनिता चोथे, कालिंदी कांबळे, शोभा चोथे यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.विटा नगरपालिकेने दुपारी मासिक सर्वसाधारण सभेत या दारूच्या दुकानाचे नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. हा ठराव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने यावेळी सांगितले.