शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाळवा-शिराळ्याला मंत्रीपद, महामंडळांची आस -: पुन्हा चर्चा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:52 IST

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली गतिमान झाल्या असून, त्यामध्ये शंभर दिवसांसाठी का होईना, शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवाय इस्लामपूर मतदार संघातील काही नेत्यांची महामंडळांवर वर्णी लागल्याची

ठळक मुद्देआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राजकीय खेळीची शक्यता

अशोक पाटील ।इस्लामपूर : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली गतिमान झाल्या असून, त्यामध्ये शंभर दिवसांसाठी का होईना, शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवाय इस्लामपूर मतदार संघातील काही नेत्यांची महामंडळांवर वर्णी लागल्याची अधिकृत घोषणा होणार आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही भाजपची खेळी असल्याचे बोलले जात आहे.

मागील निवडणूक आमदार नाईक यांनी भाजपचा झेंडा घेऊन निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, शिवाजीरावांना निवडून द्या, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊ, असा शब्द दिला होता. या घोषणेला पाच वर्षे होत आली. आता मंत्रिमंडळाच्या शेवटच्या तीन महिन्यांसाठी पुन्हा एकदा १४ जूनरोजी विस्तार केला जाणार आहे. यामध्ये आ. नाईक यांना मंत्रीपदाची संधी मिळेल, अशी शक्यता आहे.इस्लामपूर मतदार संघातील भाजपचे नेते विक्रम पाटील व राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या वैभव शिंदे यांना यापूर्वीच महामंडळावर घेण्यात आले आहे. परंतु तशी अधिकृत घोषणा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली होती. आता दोघांच्या अधिकृत निवडी जाहीर होणार आहेत. यासाठी या दोघांच्याही मुंबई वाऱ्या वाढल्या आहेत.

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपची खेळी सुरू आहे. शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष डोके वर काढू लागला आहे. आ. नाईक यांनी उभ्या केलेल्या संस्था तोट्यात असल्याचा आरोप राष्टÑवादी आणि काँग्रेसने सुरू केला आहे. त्यांची प्रतिमा ढासळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावर उपाय म्हणून शंभर दिवसांसाठी का होईना, आ. नाईक यांना मंत्रीपद देऊन त्यांची प्रतिमा उजळवली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

आश्वासनांची पूर्तता होणार का?इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात भाजपला ऊर्जा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद, विक्रम पाटील, वैभव शिंदे यांना महामंडळ, तर महाडिक गटाचे राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांना उमेदवारीची संधी देण्याचे आश्वासन दिले आहे. याची पूर्तता झाली नाही, तर येथील राजकारण वेगळ्या वळणावर जाणार आहे.

 

१४ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यानंतर आठ दिवसांत महामंडळावर नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा होणार आहे.- विक्रम पाटील, भाजपचे नेते

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक