शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

वाळवा-शिराळ्याला मंत्रीपद, महामंडळांची आस -: पुन्हा चर्चा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:52 IST

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली गतिमान झाल्या असून, त्यामध्ये शंभर दिवसांसाठी का होईना, शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवाय इस्लामपूर मतदार संघातील काही नेत्यांची महामंडळांवर वर्णी लागल्याची

ठळक मुद्देआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राजकीय खेळीची शक्यता

अशोक पाटील ।इस्लामपूर : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली गतिमान झाल्या असून, त्यामध्ये शंभर दिवसांसाठी का होईना, शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवाय इस्लामपूर मतदार संघातील काही नेत्यांची महामंडळांवर वर्णी लागल्याची अधिकृत घोषणा होणार आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही भाजपची खेळी असल्याचे बोलले जात आहे.

मागील निवडणूक आमदार नाईक यांनी भाजपचा झेंडा घेऊन निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, शिवाजीरावांना निवडून द्या, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊ, असा शब्द दिला होता. या घोषणेला पाच वर्षे होत आली. आता मंत्रिमंडळाच्या शेवटच्या तीन महिन्यांसाठी पुन्हा एकदा १४ जूनरोजी विस्तार केला जाणार आहे. यामध्ये आ. नाईक यांना मंत्रीपदाची संधी मिळेल, अशी शक्यता आहे.इस्लामपूर मतदार संघातील भाजपचे नेते विक्रम पाटील व राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या वैभव शिंदे यांना यापूर्वीच महामंडळावर घेण्यात आले आहे. परंतु तशी अधिकृत घोषणा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली होती. आता दोघांच्या अधिकृत निवडी जाहीर होणार आहेत. यासाठी या दोघांच्याही मुंबई वाऱ्या वाढल्या आहेत.

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपची खेळी सुरू आहे. शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष डोके वर काढू लागला आहे. आ. नाईक यांनी उभ्या केलेल्या संस्था तोट्यात असल्याचा आरोप राष्टÑवादी आणि काँग्रेसने सुरू केला आहे. त्यांची प्रतिमा ढासळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावर उपाय म्हणून शंभर दिवसांसाठी का होईना, आ. नाईक यांना मंत्रीपद देऊन त्यांची प्रतिमा उजळवली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

आश्वासनांची पूर्तता होणार का?इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात भाजपला ऊर्जा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद, विक्रम पाटील, वैभव शिंदे यांना महामंडळ, तर महाडिक गटाचे राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांना उमेदवारीची संधी देण्याचे आश्वासन दिले आहे. याची पूर्तता झाली नाही, तर येथील राजकारण वेगळ्या वळणावर जाणार आहे.

 

१४ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यानंतर आठ दिवसांत महामंडळावर नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा होणार आहे.- विक्रम पाटील, भाजपचे नेते

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक