शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

अवकाळीचा कहर; दोन बळी

By admin | Updated: March 15, 2015 00:30 IST

गारपीट : खानापूर, मिरज, तासगाव तालुक्यांना तडाखा; द्राक्षबागांसह रब्बी पिके उद्ध्वस्त

सांगली : जिल्ह्याच्या पूर्वभागाला शनिवारी सायंकाळी पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले. विजेच्या कडकडाटासह वादळी वारे व मुसळधार पावसाने दोन बळी घेतले. विनायक हणमंत बुधावले (वय २०, रा. हातनूर, ता. तासगाव) व सुमन परसू जाधव (५५, जाधववाडी, ता. खानापूर) अशी मृतांची नावे आहेत. गेल्या पंधरवड्यात पाचव्यांदा अवकाळीचा फटका बसल्याने द्राक्षबागांसह रब्बी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. खानापूर, तासगाव आणि मिरज तालुक्यांत गारपीट झाली. शनिवारी सकाळपासून उन्हाचा तडाखा जाणवत होता. दुपारी दोनपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळी पाचनंतर पूर्वभागात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. विटा शहरासह खानापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्याने खानापूर-मोही रस्त्यावर लिंबाचे झाड, तर तामखडीजवळही मोठे झाड कोसळल्याने राज्यमार्गावरील वाहतूक सुमारे दोन ते अडीच तास ठप्प झाली. खानापूर पूर्व भागात मुसळधार पावसासह गारपीट झाल्याने द्राक्षबागायतदारांना जबर फटका बसला. हातनूर येथे वीज पडून विनायक बुधावले हा तरुण जागीच ठार झाला. सायंकाळी पाचच्या दरम्यान तो शेतात जनावरांना चरण्यासाठी घेऊन गेला होता. वादळी वारे सुटल्याने तो जनावरांना घाईगडबडीने घरी घेऊन निघाला. या दरम्यान त्याच्या अंगावर वीज कोसळली. त्यात तो जागीच ठार झाला. जाधववाडी (ता. खानापूर) येथे वादळी वाऱ्याने घराच्या छतावरील पत्रा उडून अंगावर पडल्याने सुमन जाधव यांचा मृत्यू झाला. तासगाव तालुक्यात मणेराजुरी परिसरात हलकी गारपीट झाली. मिरज तालुक्यात बेळंकी, लिंगनूर परिसरात सायंकाळनंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. खटावमध्ये गारपीट झाली. यामुळे परिसरातील बेदाणा उत्पादक अडचणीत आला आहे. रब्बी पिकांसह द्राक्षबागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे झाले नाहीत, तोपर्यंत शनिवारी पुन्हा पाऊस झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बेदाणा शेडवर प्रक्रियेत असलेले बेदाणे व द्राक्षांचे नुकसान होणार आहे. दि. ११ ते १३ मार्च या कालावधीत पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज होता. यामुळे शेतकऱ्यांनी बागेतील द्राक्षे बेदाण्यासाठी शेडवर टाकली आहेत. पलूस तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.