शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

दुष्काळप्रश्नी राज्य सरकार उदासीन

By admin | Updated: December 2, 2015 00:37 IST

पतंगराव कदम : नेवरी येथे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

नेवरी : राज्य सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही. अद्याप कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. ठोस धोरण नाही यामुळे दुष्काळाची समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, मी मदतकार्य व पुनर्वसन मंत्री असताना दुष्काळ, अतिवृष्टीसारख्या आपत्तींमध्ये साडेबारा हजार कोटींची मदत दिली होती, असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव क दम यांनी केले.नेवरी (ता. कडेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आ. डॉ. कदम बोलत होते. ते म्हणाले की, गावाबाहेरील आंबेगाव ते नेवरी तसेच नदीवर जाणाऱ्या महादेव बंधाऱ्यापर्यंतचा रस्ता ही कामे भविष्यात पूर्ण करून देईन. लोकांनी गट-तट विसरून एकत्र येऊन गावचा विकास करणे गरजेचे आहे. आतापर्यंत माझ्यासाठी या गावाने चांगले योगदान दिले आहे. ते मी कधीही विसरू शकणार नाही. नेवरीतील युवक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन चांगली फळी निर्माण करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम चांगल्या पध्दतीचे झाले आहे. यावेळी बांधकाम ठेकेदार किरण चव्हाण यांचा सत्कार डॉ. कदम यांच्याहस्ते करण्यात आला. या कार्यालयात ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांची सुसज्ज स्वतंत्र कार्यालये आहेत. या कार्यक्रमासाठी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, शांताराम कदम, सरपंच बाळासाहेब महाडिक, उपसरपंच मोहन सूर्यवंशी, ज्येष्ठ नेते रंगराव महाडिक, जालिंदर महाडिक, कडेगावच्या सभापती सौ. लता महाडिक, उपसभापती विठ्ठल मुळीक, इंद्रजित साळुंखे, सौ. मालन मोहिते, बाजीराव पवार, जि. प. सदस्य सुरेश मोहिते, पं. स. सदस्य सखाराम सूर्यवंशी, माजी सरपंच विष्णू महाडिक, सुनील महाडिक, नंदकुमार महाडिक, कडेगावचे तहसीलदार हेमंत निकम, नेवरीचे तलाठी डी. एल. चवरे, ग्रामविकास अधिकारी एस. जे. तेरदाळे, मंडल अधिकारी एस. पी. तिटकारे उपस्थित होते. योगेश महाडिक यांनी प्रास्ताविक केले. महादेव महाडिक यांनी आभार मानले. (वार्ताहर)