शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

दुष्काळप्रश्नी राज्य सरकार उदासीन

By admin | Updated: December 2, 2015 00:37 IST

पतंगराव कदम : नेवरी येथे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

नेवरी : राज्य सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही. अद्याप कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. ठोस धोरण नाही यामुळे दुष्काळाची समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, मी मदतकार्य व पुनर्वसन मंत्री असताना दुष्काळ, अतिवृष्टीसारख्या आपत्तींमध्ये साडेबारा हजार कोटींची मदत दिली होती, असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव क दम यांनी केले.नेवरी (ता. कडेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आ. डॉ. कदम बोलत होते. ते म्हणाले की, गावाबाहेरील आंबेगाव ते नेवरी तसेच नदीवर जाणाऱ्या महादेव बंधाऱ्यापर्यंतचा रस्ता ही कामे भविष्यात पूर्ण करून देईन. लोकांनी गट-तट विसरून एकत्र येऊन गावचा विकास करणे गरजेचे आहे. आतापर्यंत माझ्यासाठी या गावाने चांगले योगदान दिले आहे. ते मी कधीही विसरू शकणार नाही. नेवरीतील युवक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन चांगली फळी निर्माण करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम चांगल्या पध्दतीचे झाले आहे. यावेळी बांधकाम ठेकेदार किरण चव्हाण यांचा सत्कार डॉ. कदम यांच्याहस्ते करण्यात आला. या कार्यालयात ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांची सुसज्ज स्वतंत्र कार्यालये आहेत. या कार्यक्रमासाठी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, शांताराम कदम, सरपंच बाळासाहेब महाडिक, उपसरपंच मोहन सूर्यवंशी, ज्येष्ठ नेते रंगराव महाडिक, जालिंदर महाडिक, कडेगावच्या सभापती सौ. लता महाडिक, उपसभापती विठ्ठल मुळीक, इंद्रजित साळुंखे, सौ. मालन मोहिते, बाजीराव पवार, जि. प. सदस्य सुरेश मोहिते, पं. स. सदस्य सखाराम सूर्यवंशी, माजी सरपंच विष्णू महाडिक, सुनील महाडिक, नंदकुमार महाडिक, कडेगावचे तहसीलदार हेमंत निकम, नेवरीचे तलाठी डी. एल. चवरे, ग्रामविकास अधिकारी एस. जे. तेरदाळे, मंडल अधिकारी एस. पी. तिटकारे उपस्थित होते. योगेश महाडिक यांनी प्रास्ताविक केले. महादेव महाडिक यांनी आभार मानले. (वार्ताहर)