शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

दुष्काळी परिस्थितीत शासन झोपलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : दुष्काळी परिस्थिती असूनही हे सरकार झोपले आहे. सरकारने केलेल्या या कर्जमाफीबद्दल शेतकरी समाधानी नाही. विजेची बिले वाढवायचे काम सरकारने केले. शेतकºयांच्या मुळावर हे सरकार उठले आहे. दुष्काळ हटवण्यात सरकारला अपयश आल्यामुळे या सरकारचा आता एकत्र येऊन प्रतिकार करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन आमदार जयंतराव पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : दुष्काळी परिस्थिती असूनही हे सरकार झोपले आहे. सरकारने केलेल्या या कर्जमाफीबद्दल शेतकरी समाधानी नाही. विजेची बिले वाढवायचे काम सरकारने केले. शेतकºयांच्या मुळावर हे सरकार उठले आहे. दुष्काळ हटवण्यात सरकारला अपयश आल्यामुळे या सरकारचा आता एकत्र येऊन प्रतिकार करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन आमदार जयंतराव पाटील यांनी केले.तासगाव येथे आर. आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्ते मार्गदर्शन शिबिर व मेळाव्याचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार पाटील बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे उपस्थित होत्या. पाटील म्हणाले, एवढा कडक दुष्काळ पडूनही सरकारला शेतकºयांची दया आली नाही. कर्जमाफीचा शाब्दिक खेळ सुरू आहे. मात्र यांना आता प्रतिकार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपणाला एकत्र यावे लागेल. आर. आर. पाटील यांना जाऊन दोन वर्षे झाली, मात्र महाराष्ट्रातील जनता अजूनही आबांना विसरली नाही. आज आबा असते तर त्यांनी सरकारला सळो की पळो करून सोडले असते. दुष्काळ हटविण्यासाठी सरकारकडून तोकडे प्रयत्न सुरू आहेत, तर विरोधी बाकावर असलेल्या आमदार सुमनताई पाटील मात्र दुष्काळग्रस्तांसाठी उपोषण करण्यासाठी बसणार आहेत. आमदार सुमनताई पाटील व आम्ही तालुक्यातील द्राक्षबागायतदारांना तरी कमीत कमी चार लाखांची कर्जमाफी द्यावी, यासाठी मागणी केली होती; मात्र सरकारने अडवणुक केली.यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी वक्ते म्हणून डॉ. संजय ठिगळे, डॉ. सूरज चौगुले, मधुकर पाटील उपस्थित होते. ते म्हणाले, कार्यकर्ता जनतेच्या नजरेत आश्रयदाता म्हणून असली पाहिजे. चांगला वक्ता होण्यासाठी वाचन वाढवा. राष्ट्रवादीच्या सर्व सेलच्या अध्यक्षांची निवड व सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. स्मिता पाटील यांनी आभार मानले. यावेळी बाजार समितीचे सभापती रवी पाटील, पंचायत समिती सभापती मायाताई एडके, उपसभापती संभाजी पाटील, पतंगबापू माने, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अमोल पाटील उपस्थित होते.पाण्यासाठी श्रेयवादजयंत पाटील म्हणाले, तासगाव तालुक्यात आबांनी पाणी फिरवले. त्यांनी जनतेला कधीच पाण्यासाठी वेठीस धरले नाही. त्याच तालुक्यात आज पाण्याचे राजकारण केले जात आहे आणि त्याचे वाटप करतानाही श्रेयवाद सुरू आहे. विरोधकांकडून राजकारण सुरु आहे.