शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

दुष्काळी परिस्थितीत शासन झोपलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : दुष्काळी परिस्थिती असूनही हे सरकार झोपले आहे. सरकारने केलेल्या या कर्जमाफीबद्दल शेतकरी समाधानी नाही. विजेची बिले वाढवायचे काम सरकारने केले. शेतकºयांच्या मुळावर हे सरकार उठले आहे. दुष्काळ हटवण्यात सरकारला अपयश आल्यामुळे या सरकारचा आता एकत्र येऊन प्रतिकार करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन आमदार जयंतराव पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : दुष्काळी परिस्थिती असूनही हे सरकार झोपले आहे. सरकारने केलेल्या या कर्जमाफीबद्दल शेतकरी समाधानी नाही. विजेची बिले वाढवायचे काम सरकारने केले. शेतकºयांच्या मुळावर हे सरकार उठले आहे. दुष्काळ हटवण्यात सरकारला अपयश आल्यामुळे या सरकारचा आता एकत्र येऊन प्रतिकार करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन आमदार जयंतराव पाटील यांनी केले.तासगाव येथे आर. आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्ते मार्गदर्शन शिबिर व मेळाव्याचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार पाटील बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे उपस्थित होत्या. पाटील म्हणाले, एवढा कडक दुष्काळ पडूनही सरकारला शेतकºयांची दया आली नाही. कर्जमाफीचा शाब्दिक खेळ सुरू आहे. मात्र यांना आता प्रतिकार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपणाला एकत्र यावे लागेल. आर. आर. पाटील यांना जाऊन दोन वर्षे झाली, मात्र महाराष्ट्रातील जनता अजूनही आबांना विसरली नाही. आज आबा असते तर त्यांनी सरकारला सळो की पळो करून सोडले असते. दुष्काळ हटविण्यासाठी सरकारकडून तोकडे प्रयत्न सुरू आहेत, तर विरोधी बाकावर असलेल्या आमदार सुमनताई पाटील मात्र दुष्काळग्रस्तांसाठी उपोषण करण्यासाठी बसणार आहेत. आमदार सुमनताई पाटील व आम्ही तालुक्यातील द्राक्षबागायतदारांना तरी कमीत कमी चार लाखांची कर्जमाफी द्यावी, यासाठी मागणी केली होती; मात्र सरकारने अडवणुक केली.यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी वक्ते म्हणून डॉ. संजय ठिगळे, डॉ. सूरज चौगुले, मधुकर पाटील उपस्थित होते. ते म्हणाले, कार्यकर्ता जनतेच्या नजरेत आश्रयदाता म्हणून असली पाहिजे. चांगला वक्ता होण्यासाठी वाचन वाढवा. राष्ट्रवादीच्या सर्व सेलच्या अध्यक्षांची निवड व सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. स्मिता पाटील यांनी आभार मानले. यावेळी बाजार समितीचे सभापती रवी पाटील, पंचायत समिती सभापती मायाताई एडके, उपसभापती संभाजी पाटील, पतंगबापू माने, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अमोल पाटील उपस्थित होते.पाण्यासाठी श्रेयवादजयंत पाटील म्हणाले, तासगाव तालुक्यात आबांनी पाणी फिरवले. त्यांनी जनतेला कधीच पाण्यासाठी वेठीस धरले नाही. त्याच तालुक्यात आज पाण्याचे राजकारण केले जात आहे आणि त्याचे वाटप करतानाही श्रेयवाद सुरू आहे. विरोधकांकडून राजकारण सुरु आहे.