शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
2
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
4
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
5
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
6
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
7
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
8
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
9
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
10
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
11
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
12
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
13
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
14
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
15
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू
16
नव्या रुपात परततेय Tata Sierra! पेट्रोल, डिझेल, EV व्हर्जनमध्ये होणार लाँच; थेट Creta, Seltos सारख्या कारला देणार टक्कर
17
VIDEO: रोहित शर्मा सुरक्षा रक्षकावर भडकला; मुंबईच्या शिवाजी पार्कवर नेमकं काय घडलं? पाहा...
18
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
19
'मिस्टर मोदी, तुम्ही दुबळे आहात...', अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
20
गजकेसरीसह ३ राजयोगांचा वरदान काळ: ९ राशींचे मंगल, हाती पैसा खेळेल; सुख-समृद्धी, शुभ-भरभराट!

दुष्काळी परिस्थितीत शासन झोपलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : दुष्काळी परिस्थिती असूनही हे सरकार झोपले आहे. सरकारने केलेल्या या कर्जमाफीबद्दल शेतकरी समाधानी नाही. विजेची बिले वाढवायचे काम सरकारने केले. शेतकºयांच्या मुळावर हे सरकार उठले आहे. दुष्काळ हटवण्यात सरकारला अपयश आल्यामुळे या सरकारचा आता एकत्र येऊन प्रतिकार करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन आमदार जयंतराव पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : दुष्काळी परिस्थिती असूनही हे सरकार झोपले आहे. सरकारने केलेल्या या कर्जमाफीबद्दल शेतकरी समाधानी नाही. विजेची बिले वाढवायचे काम सरकारने केले. शेतकºयांच्या मुळावर हे सरकार उठले आहे. दुष्काळ हटवण्यात सरकारला अपयश आल्यामुळे या सरकारचा आता एकत्र येऊन प्रतिकार करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन आमदार जयंतराव पाटील यांनी केले.तासगाव येथे आर. आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्ते मार्गदर्शन शिबिर व मेळाव्याचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार पाटील बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे उपस्थित होत्या. पाटील म्हणाले, एवढा कडक दुष्काळ पडूनही सरकारला शेतकºयांची दया आली नाही. कर्जमाफीचा शाब्दिक खेळ सुरू आहे. मात्र यांना आता प्रतिकार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपणाला एकत्र यावे लागेल. आर. आर. पाटील यांना जाऊन दोन वर्षे झाली, मात्र महाराष्ट्रातील जनता अजूनही आबांना विसरली नाही. आज आबा असते तर त्यांनी सरकारला सळो की पळो करून सोडले असते. दुष्काळ हटविण्यासाठी सरकारकडून तोकडे प्रयत्न सुरू आहेत, तर विरोधी बाकावर असलेल्या आमदार सुमनताई पाटील मात्र दुष्काळग्रस्तांसाठी उपोषण करण्यासाठी बसणार आहेत. आमदार सुमनताई पाटील व आम्ही तालुक्यातील द्राक्षबागायतदारांना तरी कमीत कमी चार लाखांची कर्जमाफी द्यावी, यासाठी मागणी केली होती; मात्र सरकारने अडवणुक केली.यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी वक्ते म्हणून डॉ. संजय ठिगळे, डॉ. सूरज चौगुले, मधुकर पाटील उपस्थित होते. ते म्हणाले, कार्यकर्ता जनतेच्या नजरेत आश्रयदाता म्हणून असली पाहिजे. चांगला वक्ता होण्यासाठी वाचन वाढवा. राष्ट्रवादीच्या सर्व सेलच्या अध्यक्षांची निवड व सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. स्मिता पाटील यांनी आभार मानले. यावेळी बाजार समितीचे सभापती रवी पाटील, पंचायत समिती सभापती मायाताई एडके, उपसभापती संभाजी पाटील, पतंगबापू माने, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अमोल पाटील उपस्थित होते.पाण्यासाठी श्रेयवादजयंत पाटील म्हणाले, तासगाव तालुक्यात आबांनी पाणी फिरवले. त्यांनी जनतेला कधीच पाण्यासाठी वेठीस धरले नाही. त्याच तालुक्यात आज पाण्याचे राजकारण केले जात आहे आणि त्याचे वाटप करतानाही श्रेयवाद सुरू आहे. विरोधकांकडून राजकारण सुरु आहे.