शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वाहने जपून चालवा; जीवघेणी ३६ ठिकाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:25 IST

वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सध्या वाहतूक सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. यात वाहन चालविण्याच्या आदर्श नियमावलींसह इतर ...

वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सध्या वाहतूक सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. यात वाहन चालविण्याच्या आदर्श नियमावलींसह इतर नियमांच्या पालनाविषयक आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर काही मार्गांचा वापर सुरूही झाला आहे. त्यामुळे वाहनधारक वेगमर्यादा ओलांडून वाहन चालवत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत तर काही ठिकाणी रस्त्यांची सुरू असलेली कामे, रस्त्यावरील खड्डे, चुकीचे गतिरोधक यामुळेही अपघात घडत आहेत.

अपघात टाळण्यासाठी वेगावर नियंत्रण यासह वाहनांच्या स्थितीबाबतही अनेक नियम आहेत मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघात वाढत आहेत.

चौकट

जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट

वाघवाडी चौक, पेठनाका, विठ्ठलवाडी, कामेरी, कासेगाव बसस्थानक, नेर्ले, येवलेवाडी फाटा, तांदूळवाडी फाटा, येडेनिपाणी फाटा, कणेगाव फाटा, येलूर फाटा, इटकरे फाटा, बोरगाव फाटा, कुची कॉर्नर, नागज फाटा, नागज महामार्ग चौक, बालाजी मंगल कार्यालय पंढरपूर रोड, मिरज, डी मार्ट पंढरपूर रोड, मिरज, यल्लमा मंदिर ते भोसे फाटा, सांडगेवाडी बसस्थानक, पाचवा मैल, कॉलेज कॉर्नर, बनपुरी-खरसुंडी ते मिटकी, गणपती मंदिर जत, काेळगिरी बसस्थानक जत, चव्हाण वस्ती कुडनूर फाटा जत, घाडगे हॉस्पिटल ते शिवशंभो चौक,सांगली, प्रांत कार्यालय पेठ नाका रस्ता इस्लामपूर, आष्टा नाका, आरआयटी कॉलेज, शिराळा-पेठ रस्ता, किसान चौक,मिरज, सांगली-तासगाव सिद्धेश्वर मंदिर, लक्ष्मी फाटा,सांगली.

चौकट

२०२० मधील अपघातांची संख्या

महिना अपघात

जानेवारी ६५

फेब्रुवारी ७९

मार्च ५६

एप्रिल १९

मे ४२

जून ३७

जुलै २५

ऑगस्ट ४३

सप्टेंबर ३३

ऑक्टोबर ५२

नोव्हेंबर ६३

डिसेंबर ७४

चौकट

तालुकानिहाय ‘ब्लॅक स्पॉट’ची ठिकाणे

वाळवा १५

कवठेमहांकाळ ४

मिरज ६

पलूस २

कडेगाव १

तासगाव २

आटपाडी १

जत ३

शिराळा १

खानापूर १

चौकट

जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट ३६

२०२० मध्ये याठिकाणी झालेले अपघात ५

एकूण अपघातातील मृत्यू २६०

चौकट

अपघातांचे प्रमाण घटले तरीही खबरदारी आवश्यकच

गेल्या दोन वर्षांतील अपघातांचा आढावा घेतला तर एक हजार ३४४ रस्ते अपघात झाले आहेत. रस्त्याच्या स्थितीमुळेच हे अपघात झाले आहेत. कोरोना कालावधीत सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये अपघातांचे प्रमाण घटले असले तरी खबरदारी घेणे आवश्यकच आहे.