शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
4
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
5
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
6
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
7
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
8
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
9
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
10
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
12
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
13
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
14
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
15
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
16
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
17
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
18
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
19
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
20
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

पाण्याविना १७ हजार हेक्टर लाभक्षेत्र वंचित-ताकारी योजनेचे चित्र : १० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:56 IST

कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदायिनी ठरलेल्या ताकारी योजनेचे १७ हजार हेक्टर लाभक्षेत्र अजूनही पाण्याविना वंचित राहिले आहे.

ठळक मुद्देनिम्म्याहून अधिक क्षेत्र कोरडे

- अतुल जाधव ।देवराष्ट : कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदायिनी ठरलेल्या ताकारी योजनेचे १७ हजार हेक्टर लाभक्षेत्र अजूनही पाण्याविना वंचित राहिले आहे. ओलिताखाली येणाऱ्या क्षेत्राची वाढ ही कासवगतीने असल्यामुळे शेतकºयांचे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याविना वंचित राहत आहे. ३४ वर्षांत योजनेचा आराखडा शेकडोपटीने वाढूनही निम्मे लाभक्षेत्रही ओलिताखाली येऊ शकलेले नाही.

ताकारी उपसा सिंचन योजनेतून सहा तालुक्यातील २७ हजार ४८० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. वास्तविक योजना सुरू झाल्यापासून ३४ वर्षांच्या काळात यापैकी इंच न इंच जमीन ओलिताखाली यावयास हवी होती; मात्र राज्यकर्त्यांसह प्रशासनाची इच्छाशक्ती व निधीची कमतरता यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही योजनेचे काम आजही अपूर्ण राहिले आहे.

ताकारी योजनेचे पाणी २००२-०३ ला कडेगाव तालुक्यात दाखल झाले. तेव्हापासून मागील दोन वर्षांपर्यंत या योजनेवर स्वतंत्र सिंंचन व्यवस्थापन विभाग कार्यरत नव्हता. यामुळे या विभागाची जबाबदारी योजनेच्या बांधकाम विभागावरच होती. अपुºया कर्मचारी संख्येमुळे बांधकाम विभागाला तारेवरची कसरत करावी लागत होती. यामुळे सदोष मोजणीमुळे लाभक्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत नव्हते.ताकारी योजनेसाठी स्वतंत्र सिंंचन व्यवस्थापन विभागाची निर्मिती झाल्यानंतर योजनेच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून लाभक्षेत्रात थोडीच वाढ झाल्याचे दिसत आहे.

यामुळे अजूनही लाभक्षेत्राची मोजणी सदोषच झाल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. तसेच २०१२-१३ व १३-१४ मधील ओलिताखाली आलेल्या लाभक्षेत्राचा विचार केल्यास मोठी तफावत पाहावयास मिळत आहे.ओलिताखाली आलेले क्षेत्र २०११-१२ मध्ये ५४४८ हेक्टर, १२-१३ मध्ये ६३४२, १३-१४ मध्ये ६४०० हेक्टर, तर १४-१५ मध्ये ७८१६ इतके झाले होते. १५-१६ मध्ये ७९३५ हेक्टर व १६-१७ मध्ये ९०७० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल्याची नोंद आहे; तर १७-१८ मध्ये १०७६५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे.योजनेचे लाभक्षेत्र असलेल्या कडेगाव, खानापूर, तासगाव, पलूस, वाळवा या तालुक्यातील लाभक्षेत्राचा अभ्यास केल्यास या भागात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. तसेच भाजीपाला व द्राक्ष, डाळिंब यांचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. योजनेच्या लाभक्षेत्रातील उसाचे गाळप व ऊस पिकाची नोंद लक्षात घेता, योजनेचे ओलिताखाली आलेले लाभक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.

मात्र योजनेच्या लाभक्षेत्राची मोजणी सदोष होत असल्याने व यामध्ये काही अडचणी येत असल्याने योजनेला काही कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.५ वर्षात ओलिताखालील क्षेत्र : ३ हजार हेक्टरने वाढलेताकारी योजनेचे पाणी जिथपर्यंत पोहोचले आहे, तिथपर्यंतचे क्षेत्र १३८५२ हेक्टर क्षेत्र लाभक्षेत्रात आले आहे. त्यापैकी १०७६५ हेक्टर क्षेत्राला पाणी दिले जात आहे. २०१४-१५ मध्ये ७८१६ हेक्टर ओलिताखालील क्षेत्रात ३ हजार हेक्टरने वाढ होऊन ते २०१८ पर्यंत १०७६५ हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.