शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

पाण्याविना १७ हजार हेक्टर लाभक्षेत्र वंचित-ताकारी योजनेचे चित्र : १० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:56 IST

कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदायिनी ठरलेल्या ताकारी योजनेचे १७ हजार हेक्टर लाभक्षेत्र अजूनही पाण्याविना वंचित राहिले आहे.

ठळक मुद्देनिम्म्याहून अधिक क्षेत्र कोरडे

- अतुल जाधव ।देवराष्ट : कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदायिनी ठरलेल्या ताकारी योजनेचे १७ हजार हेक्टर लाभक्षेत्र अजूनही पाण्याविना वंचित राहिले आहे. ओलिताखाली येणाऱ्या क्षेत्राची वाढ ही कासवगतीने असल्यामुळे शेतकºयांचे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याविना वंचित राहत आहे. ३४ वर्षांत योजनेचा आराखडा शेकडोपटीने वाढूनही निम्मे लाभक्षेत्रही ओलिताखाली येऊ शकलेले नाही.

ताकारी उपसा सिंचन योजनेतून सहा तालुक्यातील २७ हजार ४८० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. वास्तविक योजना सुरू झाल्यापासून ३४ वर्षांच्या काळात यापैकी इंच न इंच जमीन ओलिताखाली यावयास हवी होती; मात्र राज्यकर्त्यांसह प्रशासनाची इच्छाशक्ती व निधीची कमतरता यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही योजनेचे काम आजही अपूर्ण राहिले आहे.

ताकारी योजनेचे पाणी २००२-०३ ला कडेगाव तालुक्यात दाखल झाले. तेव्हापासून मागील दोन वर्षांपर्यंत या योजनेवर स्वतंत्र सिंंचन व्यवस्थापन विभाग कार्यरत नव्हता. यामुळे या विभागाची जबाबदारी योजनेच्या बांधकाम विभागावरच होती. अपुºया कर्मचारी संख्येमुळे बांधकाम विभागाला तारेवरची कसरत करावी लागत होती. यामुळे सदोष मोजणीमुळे लाभक्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत नव्हते.ताकारी योजनेसाठी स्वतंत्र सिंंचन व्यवस्थापन विभागाची निर्मिती झाल्यानंतर योजनेच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून लाभक्षेत्रात थोडीच वाढ झाल्याचे दिसत आहे.

यामुळे अजूनही लाभक्षेत्राची मोजणी सदोषच झाल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. तसेच २०१२-१३ व १३-१४ मधील ओलिताखाली आलेल्या लाभक्षेत्राचा विचार केल्यास मोठी तफावत पाहावयास मिळत आहे.ओलिताखाली आलेले क्षेत्र २०११-१२ मध्ये ५४४८ हेक्टर, १२-१३ मध्ये ६३४२, १३-१४ मध्ये ६४०० हेक्टर, तर १४-१५ मध्ये ७८१६ इतके झाले होते. १५-१६ मध्ये ७९३५ हेक्टर व १६-१७ मध्ये ९०७० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल्याची नोंद आहे; तर १७-१८ मध्ये १०७६५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे.योजनेचे लाभक्षेत्र असलेल्या कडेगाव, खानापूर, तासगाव, पलूस, वाळवा या तालुक्यातील लाभक्षेत्राचा अभ्यास केल्यास या भागात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. तसेच भाजीपाला व द्राक्ष, डाळिंब यांचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. योजनेच्या लाभक्षेत्रातील उसाचे गाळप व ऊस पिकाची नोंद लक्षात घेता, योजनेचे ओलिताखाली आलेले लाभक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.

मात्र योजनेच्या लाभक्षेत्राची मोजणी सदोष होत असल्याने व यामध्ये काही अडचणी येत असल्याने योजनेला काही कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.५ वर्षात ओलिताखालील क्षेत्र : ३ हजार हेक्टरने वाढलेताकारी योजनेचे पाणी जिथपर्यंत पोहोचले आहे, तिथपर्यंतचे क्षेत्र १३८५२ हेक्टर क्षेत्र लाभक्षेत्रात आले आहे. त्यापैकी १०७६५ हेक्टर क्षेत्राला पाणी दिले जात आहे. २०१४-१५ मध्ये ७८१६ हेक्टर ओलिताखालील क्षेत्रात ३ हजार हेक्टरने वाढ होऊन ते २०१८ पर्यंत १०७६५ हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.