शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

महापौरांकडून अधिकाऱ्यांना डोस

By admin | Updated: February 2, 2015 23:46 IST

महापालिकेत आढावा बैठक : नागरिकांच्या कामांबाबत अधिकाऱ्यांना ताकीद

सांगली : महापालिकेचे नूतन महापौर विवेक कांबळे यांनी घेतलेल्या पहिल्याच आढावा बैठकीत आज अधिकाऱ्यांना शिस्तीचा डोस दिला. नागरिकांची कामे तातडीने झाली पाहिजेत. कामातील दिरंगाई आणि बेशिस्तपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा कांबळे यांनी दिला. महापौरांच्या दालनातच ही आढावा बैठक झाली. सर्व विभागप्रमुखांसह प्रमुख अधिकाऱ्यांना त्यांनी बोलावले होते. यावेळी कांबळे म्हणाले की, महापालिका कायद्याचा परिपूर्ण अभ्यास मी केलेला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कायद्यातील तरतुदींचा बाऊ करून दिशाभूल करू नये. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई कशी करायची, याचाही आपल्याला चांगला अभ्यास आहे. त्यामुळे यापूर्वी चाललेला बेशिस्तपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांची कामे प्राधान्याने झाली पाहिजेत. दैनंदिन कचरा उठाव, स्वच्छता, औषध फवारणी, सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा या गोष्टींबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे. कर भरणाऱ्या नागरिकांना त्याचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. सेवक या भावनेनेच प्रत्येकाने काम केले पाहिजे. मालकी हक्क गाजविण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. स्थायी समिती व महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. यापूर्वी एका आयुक्तांनाही भर सभागृहात आपण दम दिला होता. त्यामुळे अन्य अधिकाऱ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवून काम करावे. चुकीच्या गोष्टींना योग्य भाषेत आणि योग्य गोष्टीने आपण उत्तर देऊ. चांगल्या कामाचे कौतुकही केले जाईल. त्यामुळे महापालिकेचा यापुढील कारभार नियम आणि व्यावहारिक विचार यांची सांगड घालून झाला पाहिजे. जे या गोष्टी पाळणार नाहीत, त्यांनी कारवाईसाठी सज्ज राहावे, असा इशाराही त्यांनी दिला. निवडीनंतरच्या पहिल्याच बैठकीत महापौरांनी आक्रमक भूमिका स्पष्ट केल्यामुळे अधिकाऱ्यांत खळबळ माजली आहे. (प्रतिनिधी) एलबीटीप्रश्नी भूमिका स्पष्ट करताना कांबळे म्हणाले की, कर गोळा झाला तरच महापालिका क्षेत्राचा विकास साधला जाणार आहे. त्यामुळे एलबीटीबाबत शासनाचे स्पष्ट आदेश येईपर्यंत व्यापाऱ्यांकडून कर गोळा करावा. जे व्यापारी कर भरण्यास तयार नाहीत त्यांच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करावी. कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या ठिकाणच्या सर्व सुविधा बंद कराव्यात. त्यांच्या परिसरातील कचराउठावसुद्धा केला जाणार नाही, याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी. शासन ज्यावेळी यासंदर्भातील स्पष्ट आदेश महापालिकेला देईल, त्यावेळीच कारवाई थांबवावी, अशी सूचना त्यांनी दिली.