शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला ड्युटी नको रे बाबा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:16 IST

सांगली : कोरोनामुळे दिवसेंदिवस मुंबईतील परिस्थिती अवघड होत असताना, एसटी महामंडळ प्रशासनातर्फे पुढील आठवड्यात १०० चालक-वाहकांना मुंबईला पाठविले जाणार ...

सांगली : कोरोनामुळे दिवसेंदिवस मुंबईतील परिस्थिती अवघड होत असताना, एसटी महामंडळ प्रशासनातर्फे पुढील आठवड्यात १०० चालक-वाहकांना मुंबईला पाठविले जाणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयास कर्मचारी संघटनेकडून तीव्र विरोध होत असून अनेक चालक-वाहक मुंबईची ड्युटी नकोच, अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे भूमिका मांडत आहेत. मुंबईहून आल्यानंतर बहुतांश कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे, या कर्मचाऱ्यांमधून मुंबईला ड्युटीला जाण्यासाठी प्रचंड विरोध होत आहे.

मुंबईला बेस्टच्या सेवेसाठी सांगली विभागातून गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात २०० चालक आणि २०० वाहक पाठविले होते. यापैकी १०५ चालक व वाहक पॉझिटिव्ह आले होते. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक त्रास झाला होता. सांगली विभागाच्या ५० बसेस बेस्टच्या सेवेतच असल्यामुळे पुढील आठवड्यात ५० चालक आणि ५० वाहकांना पाठविण्यात येणार आहे. सध्या मुंबई, ठाणे येथे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे चालक-वाहकांच्या मनामध्ये मोठी भीती आहे. परिणामी, यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे आरोग्य खालावले आहे. सुरुवातीपासूनच मुंबईला जाण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा विरोध होत आहे. आता तर आठऐवजी १५ दिवस सेवा बजाविण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळेच चालक-वाहक मुंबईची ड्युटी म्हटले की, नकोच म्हणत आहेत. अनेक जण मुंबईची ड्युटी रद्दसाठी अनेक फंडे शोधून काढत आहेत. सांगलीत डबलड्युटी द्या, पण मुंबईची नको रे बाबा... असेच म्हणताना दिसत आहे.

कोट

सांगली विभागातील कर्मचारी मुंबई येथे बेस्टच्या वाहतुकीला जात असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही यातून लागण होत आहे. आता तर आठ दिवसांऐवजी १५ दिवस मुंबईला जाण्याचे आदेश आहेत. त्यामुळे आमच्या विभागावर अन्याय होत आहे. हे आदेश रद्द व्हावे म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत. अन्यथा, संघटनेतर्फे महामंडळाविरोधात आंदोलन पुकारण्यात येईल.

-अशोक खोत, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

कोट

ठाणे आणि मुंबईत कोरोनाची परिस्थिती खूप भयावह आहे. खूप भीतीने काम करावे लागते. मात्र, योग्य ती काळजी आणि खबरदारी घेऊनही अनेक कर्मचारी कोरोनाबाधित होत आहेत. महामंडळ प्रशासनाने तत्काळ आमची मुंबईची सेवा थांबवावी.

-एक वाहक, सांगली आगार

कोट

सांगलीसह अन्यत्र सेवा करूनही कोरोनाची लागण न झालेल्या कर्मचाऱ्यांना मुंबईत सेवा बजावण्यासाठी गेल्यावर कोरोना झाला आहे. या संसर्गामुळे काही कर्मचाऱ्यांची प्रकृती खूप खराब झाली. त्यामुळे महामंडळ प्रशासनाने मुंबईची सेवा थांबविणे गरजेचे असून, अन्यथा कर्मचारी आंदोलन पुकारतील.

-एक चालक, सांगली आगार

चौकट

गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यातून ४०० जणांना पाठवले.

चालक २००

वाहक - २००

-मुंबईहून परत आल्यानंतर आढळले १०५ पॉझिटिव्ह

चौकट

परत आल्यानंतर अनेकांना झाला त्रास

मुंबईहून आल्यानंतर १२५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच मुंबईतील वातावरणाचाही इतर कर्मचाऱ्यांना त्रास होऊन आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबईची ड्युटी नको रे बाबा, असा कर्मचाऱ्यांमधून सूर उमटत आहे.