शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

महापालिकेत झाले ते जिल्हा परिषदेत नकाे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST

सांगली : महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना सत्तांतर झाले, जिल्हा परिषदेत तर मित्र पक्षांच्या टेकूवर भाजपने सत्ता मिळविली आहे. ...

सांगली : महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना सत्तांतर झाले, जिल्हा परिषदेत तर मित्र पक्षांच्या टेकूवर भाजपने सत्ता मिळविली आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाचा हट्ट नकोच, असे भाजपच्या बहुतांशी नेत्यांचे मत आहे. मात्र, खासदार संजयकाका पाटील यांनी बदलाची भूमिका घेतली आहे. त्यावरून भाजपमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत.

जिल्हा परिषदेत ६१ सदस्यसंख्या आहे. भाजपकडे पक्षाच्या चिन्हावर २४ आणि सहयोगी सदस्य एक असे २५ सदस्य आहेत. शिवाय रयत क्रांती आघाडीचे चार, शिवसेनेच्या आमदार अनिल बाबर गटाचे तीन, माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थक दोन अशा ३४ सदस्यांचे बहुमत आहे. पण, सध्या पदाधिकारी बदल करायचा म्हटले तर बाबर, घोरपडे गट भाजपबरोबर राहतील, याची खात्री भाजपच्या नेत्यांना नाही. यामुळे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, विलासराव जगताप यांचा पदाधिकारी बदलास विरोध दिसत आहे. मात्र, इच्छुकांना दिलेल्या शब्दानुसार बदल करा, अशी भूमिका खासदार पाटील यांनी घेतली आहे. त्यासाठी बाबर, घोरपडे, महाडिक गटाशी चर्चा सुरू केली आहे. पदाधिकारी बदलावरून भाजपमध्ये दोन गट पडल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे.

चौकट

दोन दिवसांत नेत्यांची बैठक घेऊन निर्णय : संजयकाका पाटील

ठरल्यानुसार पदाधिकारी बदल तर करावाच लागणार आहे. त्यासाठी भाजप नेत्यांसह शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, माजी मंत्री अजितराव घोरपडे, महाडिक गटाशी चर्चा करण्यात येणार आहे. दोन दिवसांत भाजपसह मित्रपक्ष, संघटनांची बैठक घेऊन तिढा सोडविणार आहे, असे खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले.

चौकट

विषाची परीक्षा कशासाठी? : विलासराव जगताप

महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही सत्तांतर झाले. भाजपचे नगरसेवक फुटत असतील तर जिल्हा परिषदेचा विचार न केलेलाच बरा, असे स्पष्ट मत माजी आमदार विलासराव जगताप यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेत बहुमत नसताना पदाधिकारी बदलाचा निर्णय घेणे म्हणजे विषाची परीक्षा घेतल्याप्रमाणेच आहे, असे खा. पाटील यांनाही सांगितले आहे. बाबर, घोरपडे, महाडिक गटाशी चर्चा करून त्यांचा होकार मिळवा, नंतरच बदलावर निर्णय घ्या, असेही संजयकाकांना सांगितल्याचे जगताप म्हणाले.

चौकट

पक्षीय बलाबल

भाजप २५

राष्ट्रवादी १४

काँग्रेस ०९

रयत आघाडी ४

शिवसेना ३

विकास आघाडी २

अपक्ष १

स्वाभिमानी शेतकरी संघटना १