शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

महापालिकेत झाले ते जिल्हा परिषदेत नकाे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST

सांगली : महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना सत्तांतर झाले, जिल्हा परिषदेत तर मित्र पक्षांच्या टेकूवर भाजपने सत्ता मिळविली आहे. ...

सांगली : महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना सत्तांतर झाले, जिल्हा परिषदेत तर मित्र पक्षांच्या टेकूवर भाजपने सत्ता मिळविली आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाचा हट्ट नकोच, असे भाजपच्या बहुतांशी नेत्यांचे मत आहे. मात्र, खासदार संजयकाका पाटील यांनी बदलाची भूमिका घेतली आहे. त्यावरून भाजपमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत.

जिल्हा परिषदेत ६१ सदस्यसंख्या आहे. भाजपकडे पक्षाच्या चिन्हावर २४ आणि सहयोगी सदस्य एक असे २५ सदस्य आहेत. शिवाय रयत क्रांती आघाडीचे चार, शिवसेनेच्या आमदार अनिल बाबर गटाचे तीन, माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थक दोन अशा ३४ सदस्यांचे बहुमत आहे. पण, सध्या पदाधिकारी बदल करायचा म्हटले तर बाबर, घोरपडे गट भाजपबरोबर राहतील, याची खात्री भाजपच्या नेत्यांना नाही. यामुळे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, विलासराव जगताप यांचा पदाधिकारी बदलास विरोध दिसत आहे. मात्र, इच्छुकांना दिलेल्या शब्दानुसार बदल करा, अशी भूमिका खासदार पाटील यांनी घेतली आहे. त्यासाठी बाबर, घोरपडे, महाडिक गटाशी चर्चा सुरू केली आहे. पदाधिकारी बदलावरून भाजपमध्ये दोन गट पडल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे.

चौकट

दोन दिवसांत नेत्यांची बैठक घेऊन निर्णय : संजयकाका पाटील

ठरल्यानुसार पदाधिकारी बदल तर करावाच लागणार आहे. त्यासाठी भाजप नेत्यांसह शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, माजी मंत्री अजितराव घोरपडे, महाडिक गटाशी चर्चा करण्यात येणार आहे. दोन दिवसांत भाजपसह मित्रपक्ष, संघटनांची बैठक घेऊन तिढा सोडविणार आहे, असे खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले.

चौकट

विषाची परीक्षा कशासाठी? : विलासराव जगताप

महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही सत्तांतर झाले. भाजपचे नगरसेवक फुटत असतील तर जिल्हा परिषदेचा विचार न केलेलाच बरा, असे स्पष्ट मत माजी आमदार विलासराव जगताप यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेत बहुमत नसताना पदाधिकारी बदलाचा निर्णय घेणे म्हणजे विषाची परीक्षा घेतल्याप्रमाणेच आहे, असे खा. पाटील यांनाही सांगितले आहे. बाबर, घोरपडे, महाडिक गटाशी चर्चा करून त्यांचा होकार मिळवा, नंतरच बदलावर निर्णय घ्या, असेही संजयकाकांना सांगितल्याचे जगताप म्हणाले.

चौकट

पक्षीय बलाबल

भाजप २५

राष्ट्रवादी १४

काँग्रेस ०९

रयत आघाडी ४

शिवसेना ३

विकास आघाडी २

अपक्ष १

स्वाभिमानी शेतकरी संघटना १