शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

देशांतर्गत असणारे कलह रोखावेत

By admin | Updated: August 29, 2016 00:20 IST

सीताराम येचुरी : व्ही. वाय. पाटील अमृतमहोत्सवी सत्कार कार्यक्रम

कुंडल : देशात आजच्या घडीला बंधुत्वाचे नाते राहिले नसून, देशात एकमेकांविरोधातील वातावरण निर्माण झाले आहे. देशांतर्गत असणारे कलह रोखले तरच बाहेरून होणारे हल्ले रोखले जाणार असल्याचे प्रतिपादन डाव्या पुरोगामी चळवळीचे नेते खासदार सीताराम येचुरी यांनी केले. ते येथील अष्टेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित शेतकरी, कामगार, शेतमजूर, कष्टकरी यांच्या जाहीर मेळाव्यात बोलत होते. श्रमिकांचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी भारतीय किसान सभेचे अतुलकुमार अंजान, डॉ. अशोक ढवळे, क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, हुतात्मा समूहाचे वैभव नायकवडी, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, माजी आमदार भगवानराव साळुंखे, सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद लाड यांच्यासह शिक्षण, समाजकारण, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते व्ही. वाय. पाटील यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला. येचुरी म्हणाले, स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात कुठे आहोत याचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे. आज पंतप्रधानांकडून दर आठवड्याला नवीन घोषवाक्य दिले जात असले तरी, देशात बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. प्रगत महाराष्ट्रासारख्या विदर्भातही शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्या वाढली आहे. काश्मीरमधील हिंसाचार पाकिस्तानमुळेच होत असला तरी, सरकारने तेथील तरूणांच्या अंतर्गत प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस अतुलकुमार अंजान म्हणाले, क्रांती कारखान्याच्या उभारणीमध्ये माझाही खारीचा वाटा आहे. भारताचे संविधान बदलून देशातील समस्या सुटणार नाहीत. जीएसटीचा सर्वात वाईट परिणाम हा फक्त शेतकऱ्यांवर होणार आहे. प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, भारतातील जनता आजवर प्रत्येक आश्वासनाला बळी पडली आहे. कॉँग्रेसच्या राजवटीत सर्वात जास्त आत्महत्या झाल्या. येणाऱ्या निवडणुकांमध्ये योग्य सरकार निवडून द्या. यावेळी सर्वच वक्त्यांनी पंतप्रधानांच्या कार्यशैलीवरही जोरदार टीका केली. प्रा. बी. ए. पाटील यांनी स्वागत केले. क्रांती उद्योग समूहाचे अध्यक्ष अरुण लाड यांनी प्रास्ताविक केले. पी. व्ही. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)