शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:19 IST

संतोष भिसे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली - मिरजेतून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या हळूहळू वाढविण्यात येत आहे. या सर्व ...

संतोष भिसे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगली - मिरजेतून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या हळूहळू वाढविण्यात येत आहे. या सर्व गाड्या एक्सप्रेस किंवा विशेष दर्जाच्या आहेत. पॅसेंजर गाड्या मात्र अद्याप यार्डातच आहेत. कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.

सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगावच्या प्रवाशांसाठी पॅसेंजर गाड्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आहेत. विशेषत: सांगली, मिरजेतून बेळगाव आणि कोल्हापूर मार्गावर दररोज वीस हजारांहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. पॅसेंजर गाड्या कधी सुरु होतात, याकडे त्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. या शहरांतील व्यवहार अद्याप पूर्ण क्षमतेने सुरु झाले नसले तरी चाचण्या केलेल्या प्रवाशांची ये-जा सुरुच आहे. त्यांच्यासाठी पॅसेंजर गरजेच्या आहेत.

बॉक्स

सध्या सुरु असणाऱ्या एक्सप्रेस

- कोल्हापूर - हरिप्रिया तिरुपती

- कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी

- मिरज - बेंगलुरु राणी चेन्नम्मा

- यशवंतपूर - अजमेर एक्सप्रेस

- यशवंतपूर - जोधपूर एक्सप्रेस

- म्हैसूर - अजमेर एक्सप्रेस

- कोल्हापूर - गोंदिया महाराष्ट्र

- गोवा - निजामुद्दीन एक्सप्रेस

- कोल्हापूर - अहमदाबाद

- थिरुनरवेल्ली - दादर चालुक्य

- हुबळी - दादर एक्सप्रेस

- कोल्हापूर - मुंबई कोयना

- यशवंतपूर - निजामुद्दीन

बॉक्स

मग पॅसेंजरच बंद का?

देशभरातून धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्या सांगली, मिरजेतून जातात. दररोज काही हजार प्रवाशांची येथे चढ-उतार होते. कोरोना चाचणी प्रमाणपत्रांसह त्यांना प्रवासासाठी परवानगी आहे, या स्थितीत पॅसेंजर गाड्यांनीच काय घोडे मारलेय? असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.

कोट

एक्सप्रेसचा प्रवास परवडणारा नाही

कोल्हापूर किंवा बेळगावला जाण्यासाठी एक्सप्रेसचा प्रवास परवडत नाही. कामानिमित्त दररोज या शहरांचा प्रवास करावा लागतो. कोरोनापूर्वी पासदेखील काढला होता. गेल्या दीड वर्षांपासून पॅसेंजर बंद असल्याने प्रवास थांबला आहे. अत्यावश्यक कामावेळी एक्सप्रेसने जातो.

- शोएब मुल्ला, प्रवासी, मिरज

काही महत्त्वाच्या मार्गांवरील पॅसेंजर सुरु केल्या पाहिजेत. सकाळी व संध्याकाळी काही मोजक्याच गाड्या सुरु झाल्या तरी प्रवाशांना दिलासा मिळेल. विशेषत: कोल्हापूर, बेळगाव आणि पुणे मार्गांवर पॅसेंजर सोडल्या पाहिजेत. कोरोना चाचणी प्रमाणपत्र सक्तीचे केल्यास संसर्गाची भीती राहणार नाही.

- अनिकेत जैन, प्रवासी, सांगली.

सध्यातरी नियोजन नाही

सध्या काही लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. आणखी काही सुरु होणार असल्यास प्रवाशांना कल्पना दिली जाईल. पॅसेंजर गाड्या सुरु करण्याचे कोणतेही नियोजन सध्यातरी नाही.

- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग