शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

द्राक्षबागेची औषधे उधारीने घेताय? मग जरा जपूनच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:27 IST

सांगली : द्राक्ष हंगाम सुरू होताच उत्पादकांना अप्रत्यक्ष सावकारीचा सामना करावा लागत आहे. काही अैैाषध दुकानदार उधार औषध देताना ...

सांगली : द्राक्ष हंगाम सुरू होताच उत्पादकांना अप्रत्यक्ष सावकारीचा सामना करावा लागत आहे. काही अैैाषध दुकानदार उधार औषध देताना एमआरपीपेक्षा २५ ते ३० टक्के जादा दर लावत आहेत, म्हणजे वार्षिक ४५ टक्क्यांचा व्याजदर पडत आहे. याविरोधात द्राक्ष शेतकऱ्यांनी सोशल मीडियावरून जागृतीची मोहीम सुरू केली आहे.

द्राक्ष शेतीची औषधे अत्यंत महागडी आहेत. त्यामुळे ती रोखीने खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल नसतो. रोखीने खरेदीत सवलत मिळत असली, तरी पैशांची चणचण असते. वर्षभर उधारीने औषधे खरेदी करायची आणि द्राक्षे गेल्यानंतर पैसे भागवायचे, अशी प्रथा आहे. याचा गैरफायदा काही औषधविक्रेते घेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. औषधाच्या एमआरपीपेक्षा २५ ते ३० टक्के जास्त किंमत लावली जाते. वास्तविक, औषधाचा एमआरपीदेखील मुळातच जास्त असतो. त्यावर पुन्हा जादा दर लावल्याने शेतकऱ्यांची लूट होते. मूळ किमतीपेक्षा ४५ टक्क्यांपर्यंत जादा खरेदीदर पडतो. गरजवंत शेतकऱ्याला कानाडोळा करण्याशिवाय पर्याय नसतो. ठरावीक दुकानदारांमुळे अन्य चांगल्या दुकानदारांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.

चौकट

शेतकऱ्यांचे आवाहन

या लुटीविरोधात द्राक्ष शेतकऱ्यांनी सोशल मीडियावरून मोहीम सुरू केली आहे. औषधे उधार घेत असाल तर जपून व्यवहार करण्याचे आवाहन केले आहे. उधारीचा दर रोखीपेक्षा कमाल १० टक्के जास्त असल्यास ठीक, अन्यथा पर्याय शोधावा. काही दुकानदार यापेक्षा जास्त किंमत लावून सावकारी करत आहेत. वार्षिक ४५ टक्क्यांपर्यंत व्याजदर पडत आहे. त्यामुळे उधारीचा मार्ग टाळण्याचा प्रयत्न करा. उधारीचे पैसे वेळीच चुकते करा. एमआरपी व एक्सपायरी तारीख पाहून औषध घ्या, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे.

कोट

द्राक्षबागेच्या औषधांच्या किमती हजारो रुपयांच्या घरात आहेत. शेतकऱ्यांना लुटण्याचे काम औषध कंपन्या करत आहेत. काही मोजके दुकानदारही कंपन्यांच्या हातात हात घालून शेतकऱ्यांना लुबाडत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना एमआरपीमध्ये सवलत द्यायला हवी. उधार देत असला तरी हंगामाअखेर शेतकरी प्रामाणिकपणे पैसे आणून देतो, त्यामुळे जादा दर लावू नयेत.

- महादेव कोरे, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना