शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
4
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
5
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
6
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
7
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
8
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
9
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
10
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
11
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
12
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
13
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
14
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
15
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
16
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
17
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
18
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
19
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
20
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता

बोंबाबोंब नको, चांगली कामे जनतेपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: April 24, 2017 23:41 IST

पतंगरावांच्या कानपिचक्या : माळबंगला जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी; सांगली, कुपवाडला शुध्द पाणी देणार

सांगली : महापालिकेतील बोंबाबोंबच प्रसारमाध्यमातून अधिक येते. चांगली कामे जनतेपर्यंत गेली पाहिजेत, अशा शब्दात सोमवारी काँग्रेस नेते आमदार पतंगराव कदम यांनी महापौर व गटनेत्यांना कानपिचक्या दिल्या. ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम मेअखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर सांगली व कुपवाड या दोन शहरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. कदम यांनी सोमवारी माळबंगला येथील ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, आयुक्त रवींद्र खेबूडकर, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नगरसेवक प्रदीप पाटील, विशाल कलकुटगी होते. पाणीपुरवठा अभियंता शरद सागरे यांनी जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची माहिती दिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. कदम यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर टोलेबाजी केली. सांगलीचे लोक जगतात कसे? असा सवाल करून शेरीनाल्याच्या प्रश्नाला हात घातला. गेली ४० वर्षे शेरीनाल्याचा प्रश्न ऐकतोय. पण अजून तो सुटलेला नाही. शेरीनाल्याचे सांडपाणी कृष्णा नदीत मिसळते. तेच पाणी सांगली व कुपवाडला मिळते. पण आता हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघेल.महापालिकेने ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्णत्वास आणले आहे. मेअखेरीपर्यंत काम पूर्ण होऊन सांगलीकरांना शुद्ध पाणीपुरवठा होईल. काँग्रेसच्यादृष्टीने ही फार महत्त्वाची योजना आहे. आजच सकाळी आयुक्तांशी विकास कामावर चर्चा केली आहे. लवकरच अनेक कामे मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यावर किशोर जामदार व हारुण शिकलगार यांनी पालिकेकडून मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाची माहिती दिली. त्यावर महापालिकेतील बोंबाबोंबच अधिक बाहेर येते. चांगली कामे जनतेसमोर गेली पाहिजेत, अशा शब्दात त्यांनी कानपिचक्याही दिल्या. जलशुद्धीकरण केंद्राच्या ठेकेदाराला दर्जेदार व चांगले काम करण्याची सूचनाही त्यांनी केली. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांना आपण सांगली महापालिकेत आणले, असे सांगत महापालिकेचा कारभार स्वच्छ व पारदर्शी व्हावा आणि सर्व नगरसेवकांना न्याय मिळावा, अशी अपेक्षाही डॉ. कदम यांनी आयुक्तांकडून व्यक्त केली. (प्रतिनिधी)