शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासघातकी राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको

By admin | Updated: August 3, 2014 01:49 IST

कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना : काँग्रेसने स्वबळावरच निवडणूक लढवण्याची मागणी

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर विश्वासघातकीपणाचे राजकारण केल्यामुळेच पक्षाचे नुकसान झाले आहे. काँग्रेस पक्ष टिकवायचा असेल, तर राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तोडून स्वतंत्र लढले तरच पक्षाला चांगले दिवस येतील, अन्यथा पक्ष नावालाही जिल्ह्यात शिल्लक राहणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे पक्षनिरीक्षक आमदार रामहरी रूपनर यांच्यासमोर व्यक्त केल्या. विधानसभा निवडणुकीसंबंधी काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी पक्षनिरीक्षक रामहरी रूपनर सांगलीत आले होते. त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मते जाणून घेतली़ यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने विश्वासघातकी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करू नका, अशी सडेतोड मते मांडून भूमिका स्पष्ट केली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीला आघाडी चालते, तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका निवडणुकीत तुमची आघाडी का चालत नाही. आमची डोकी फोडता आणि तुमच्या सोयी पाहता का? असा सवालही कार्यकर्त्यांनी नेत्यांना केला. हणमंतराव पाटील यांनी पक्ष अडचणीतून जात आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते पायात पाय घालून काँग्रेस कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्यांच्याबरोबर आघाडी करू नका, असे मत मांडले. विशाल घोलप यांनीही त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देऊन काँग्रेस पूर्वीप्रमाणे सर्व जागा देण्याची मागणी केली. वाळवा तालुकाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आघाडी करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र का लढता, असा नेत्यांना सवाल केला. हंबीरराव पाटील म्हणाले की, पक्ष वाढीसाठी नियमित कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याची मागणी केली. कुंडलचे श्रीकांत लाड म्हणाले की, राज्यात सत्ता काँग्रेसची, राज्य बँक, सहकार खातेही पक्षाकडे आहे. तरीही तासगाव कारखान्याचा निर्णय होत नसल्यामुळे कार्यकर्त्यांत असंतोषाचे वातावरण आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोस्त म्हणून बरोबर घेतले, त्यांनीच काँग्रेस संपवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हे थांबले पाहिजे. पलूस तालुकाध्यक्ष ए. डी. पाटील, मिरज पंचायत समितीचे सभापती सुभाष पाटील, अमरसिंह पाटील यांनी पक्ष टिकवायचा आणि वाढवायचा असेल, तर काँग्रेसने विधानसभा स्वतंत्र लढविली पाहिजेत, अशी भूमिका मांडली. यावेळी लक्ष्मण नवलाई, करीम मिस्त्री, रफिक मुजावर, विशाल पाटील, राजू मोरे, कवठेमहांकाळचे आप्पासाहेब शिंदे यांनीही काँग्रेसने स्वतंत्र निवडणुका लढवण्याची मागणी केली. वसतंतराव गायकवाड, राहुल गायकवाड, रवींद्र देशमुख, अ‍ॅड. किसनराव निकम यांनी खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याची मागणी केली. यावेळी महापौर कांचन कांबळे, जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे, पक्षनिरीक्षक प्रकाश सातपुते, ज्येष्ठ नेते बापूसाहेब पाटील, माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, सभापती राजेश नाईक, काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा शैलजा पाटील, मालन मोहिते, भीमराव मोहिते, आनंदराव मोहिते, माजी आ. हाफिज धत्तुरे, उमाजीराव सनमडीकर, पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)