शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

‘म्हैसाळ’च्या पाण्याचे राजकारण नको : अजितराव घोरपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:00 IST

सांगली : कुचकामी ठरलेली शासकीय यंत्रणा व नियोजन नसल्याने म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न दरवर्षी ताणला जात आहे. पाणीपट्टी वसुलीचे योग्य नियोजन आवश्यक असताना पाणी टंचाईतून सोडले जाणार आहे, यासह इतर कारणे पुढे करून पाण्याचे राजकारण केले जात आहे. शेतीचे होणारे नुकसान लक्षात घेता म्हैसाळच्या पाण्यावरून सुरू असलेला राजकीय ...

ठळक मुद्देआवर्तन सुरू न झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकºयांचे तीनशे कोटींवर नुकसान

सांगली : कुचकामी ठरलेली शासकीय यंत्रणा व नियोजन नसल्याने म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न दरवर्षी ताणला जात आहे. पाणीपट्टी वसुलीचे योग्य नियोजन आवश्यक असताना पाणी टंचाईतून सोडले जाणार आहे, यासह इतर कारणे पुढे करून पाण्याचे राजकारण केले जात आहे. शेतीचे होणारे नुकसान लक्षात घेता म्हैसाळच्या पाण्यावरून सुरू असलेला राजकीय खेळ थांबवा, असा घणाघात माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत येथे केला.

दरम्यान, टंचाईतूनच पैसे भरून पाणी सोडायचे होते तर जानेवारी महिन्यातच पिकांना गरज असताना पाणी का सोडले नाही? असा सवाल करत लाभक्षेत्रातील शेतीचे तीनशे कोटींवर नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले.म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन लांबल्याने लाभक्षेत्रातील शेतीची झालेली अवस्था व पाणीवापर संस्थांचा पुढाकार याविषयासह म्हैसाळच्या आवर्तनाच्या अडचणीवर घोरपडे यांनी शुक्रवारी मत मांडले.

घोरपडे म्हणाले की, योजना सुरू होऊन पंधरा वर्षांचा कालावधी झाला, मात्र अद्यापही कारभारात काटेकोरपणा दिसत नाही. ‘म्हैसाळ’नंतर सुरू झालेल्या टेंभूचे आवर्तन योग्यरितीने सुरू आहे. लाभक्षेत्रातील द्राक्ष व उसाचे पिक अडचणीत असल्याने पाणी सोडणे आवश्यक असताना शेतकºयांना पाणीपट्टी भरण्यापासून रोखले जात आहे. याचसाठी पुढाकार घेऊन मिरज व कवठेमहांकाळ येथे बैठका घेत शेतकºयांना एकरी दोन हजार रूपये भरण्याचे आवाहन केले आहे.

त्यास प्रतिसादही चांगला असताना आता टंचाईतून थकबाकी भरणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने शेतकºयांनीही हात आखडता घेतल्याने त्याचा परिणाम शेतीवर झाला आहे.वास्तविक कवठेमहांकाळ, तासगाव व जत तालुक्यातील पाण्याची स्थिती पाहता जानेवारी महिन्यातच पाणी सोडणे आवश्यक आहे. मात्र, मार्च महिना सुरू झाला तरी अजूनही शेतकºयांना झुलवण्यात येत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. याउलट पाणीवापर संस्था स्थापन करून पाण्याचे नियोजन शेतकºयांच्या हातात दिले तर वारंवार निर्माण होणाºया म्हैसाळ योजनेच्या आवर्तनासह अनेक प्रश्न सुटणार आहेत. यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भारत डुबुले उपस्थित होते.तीन संस्थांचे ल्ािंकिंग आवश्यकपाणी नसल्याने शेतीचे नुकसानम्हैसाळ योजना सौरऊर्जेवर चालवाम्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा लाभ दुष्काळी भागाला जास्तीत जास्त मिळणे गरजेचे आहे. यासाठी लोकांमध्ये जागृती करून पाणीवापर संस्था निर्माण करून आवर्तनाचे नियोजन केले तर शासनाच्या भरवशावर शेतकरी थांबणार नाही. त्यासाठी पाणी वापर संस्था, विकास सोसायट्या व मध्यवर्ती बॅँक यांचे लिंकिंग करावे जेणेकरून भविष्यातील वसुलीची प्रक्रिया सुकर होणार आहे.घोरपडे म्हणाले की, पिकांना वेळेत पाणी न मिळाल्याने दुष्काळी भागातील शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. उसाची नवीन लागवड थांबली आहे. सध्या विक्रीसाठी तयार असलेल्या द्राक्षांना पाणी मिळत नसल्याने मणी मऊ पडत आहेत. परिणामी द्राक्षांचे ६० ते ७० हजार हेक्टरवरील क्षेत्र धोक्यात आले आहे. असे असतानाही पाणी सोडण्याचे नियोजन होत नाही हे दुर्दैवाचे आहे.पाटबंधारे विभागाचे अधिकाºयांकडून योग्य नियोजन होत नाही. त्यामुळे यावर पर्याय आवश्यक आहे. शेतकºयांकडून वसुलीसाठी यंत्रणा तयार करावी तसेच प्रकल्पखर्च वाढवून सौरऊर्जेवर योजना चालवावी. यासाठी थोडीफार पाणीपट्टी वाढविली तरी त्यास शेतकरी मदतच करतील. फक्त पाणी मिळणार का ही शेतकºयांची भीती घालविण्याची गरज असल्याचेही घोरपडे यांनी सांगितले.