शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

आपले मन, हृदय दगड होऊ देऊ नका

By admin | Updated: March 3, 2015 00:28 IST

येडेनिपाणीमध्ये वसंतदादा व्याख्यानमाला : मकरंद गोंधळी --वसंतदादा व्याख्यानमाला

कामेरी : दगडावर प्रेम करणारी आपली संस्कृती आहे. मानवाचे दगडाशी घट्ट नाते आहे, हे जरी खरे असले तरी, आजच्या विज्ञान युगात आपले मन व हृदय दगड होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे, असे मत कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी यांनी व्यक्त केले.येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जयकिसान मंडळाच्यावतीने आयोजित पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मृती व्याख्यानमालेत ‘...आणि आसूही हसले खुदूखुदू.. खदा खदा..!’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. सत्यजित देशमुख अध्यक्षस्थानी होते.मकरंद गोंधळी म्हणाले, दगडावर आपले प्रेम पूर्वीपासून आहे. त्याच्याशी आपले नाते घट्ट आहे. कारण देव, देऊळ, घर, चूल, पाटा, वरवंटा, जाते एवढेच नव्हे, तर पूर्वजांच्या स्मृती असणारे थडगेही दगडाचेच. भांडणासाठी मुलांच्या हातातही दगडच. मात्र विज्ञान युगात मन दगड होणार नाही, याची काळजी घ्या. आई, वडील, मुले, मुली यांच्यातील संभाषण वाढवा. सायंकाळचे जेवण सर्वांनी एकत्र घ्या, तरच कुटुंब संस्कारी बनेल.माजी मंत्री विनय कोरे म्हणाले, काँग्रेसवर आपला राग आहे. कारण जर त्यांनी वसंतदादा व यशवंतराव चव्हाण यांच्यात भांडण लावले नसते, तर देशाला दिशा देणारे राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे असता. महाराष्ट्रीयन माणूस पंतप्रधान झाला असता. कारण या दोन नेत्यांनी विधायक विकासाची पाऊलवाट कशी चालावी, याची शिकवण सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिली.यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, बाळासाहेब पाटील, सी. बी. पाटील, जितेंद्र पाटील, वैभव पवार, जयराज पाटील, गोविंदराव जाधव, के. डी. पाटील, हेमंत कुरळे उपस्थित होते. (वार्ताहर)