शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नाही प्यायला, मका दिला पेरायला -आटपाडीत दुष्काळग्रस्तांची कुचेष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:54 IST

आटपाडी तालुका दुष्काळात होरपळत असताना, शासन मका पेरा म्हणत आहे! ज्या तालुक्यात खरीप आणि रब्बी हंगाम वाया गेले, जिथे वर्षभर पाऊसच पडला नसल्याने

ठळक मुद्देशासनाकडून चारानिर्मितीसाठी पंधरा टन बियाणे दाखल

अविनाश बाड ।आटपाडी : आटपाडी तालुका दुष्काळात होरपळत असताना, शासन मका पेरा म्हणत आहे! ज्या तालुक्यात खरीप आणि रब्बी हंगाम वाया गेले, जिथे वर्षभर पाऊसच पडला नसल्याने टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, त्या तालुक्यात तब्बल १५ टन मका बियाणे, जनावरांसाठी चारा करा, असे म्हणत वाटप करून शासनाने एकप्रकारे दुष्काळग्रस्तांची कुचेष्टाच केली आहे.

आटपाडी तालुक्यात दि. १० आॅक्टोबर २०१७ रोजी शेवटचा पाऊस झाला. त्यानंतर वर्ष उलटून गेले, पण पाऊसच आला नाही. खरीप आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठीही यंदा पाऊस आला नाही. काही भागात विहीर, तलावातील पाण्यावर ज्या शेतकऱ्यांनी थोडीफार पेरणी केली, ती सुद्धा वाया गेली. दोन्ही हंगामाची आणेवारी ५० पैशाच्या आत आहे. सध्या तालुक्यातील १६ गावात १० टॅँकरच्या ३२ खेपांनी पिण्याचा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टॅँकरच्या पाण्यावर तालुक्यातील २१ हजार ४९५ एवढी लोकसंख्या अवलंबून आहे. टॅँकरची मागणी करणाºया गावांची संख्या वेगाने वाढत आहे.

तीव्र दुष्काळाने माणसाचे जगणे कठीण केलेले असताना, जनावरांचे तर माणसांपेक्षा जास्त हाल सुरू आहेत. दोन्ही हंगाम वाया गेल्याने येथे चारा उपलब्ध नाही. जनावरांच्या पाण्यासाठी शासनाकडे सध्या कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत चाºयासाठी चारा डेपो, छावण्या किंवा शेतकºयांना थेट अनुदान देणे अपेक्षित असताना, शासनाने दि. २९ नोव्हेंबर २०१८ रोजी चाºयाबाबतचा अजब निर्णय घेतला आहे.

शेतकºयांनी जनावरांसाठी चारा निर्माण करावा, त्यासाठी शासनाने केवळ मका बियाणे वाटप करून शेतकºयांना मोठी मदत केल्याचा आव आणला आहे. त्यामुळे संतापही व्यक्त होत आहे.शेतकºयांनी त्यासाठी अर्ज करायचा आहे. ७/१२ उतारा, आधार कार्ड, किती जमीन आहे, त्यापैकी किती जमिनीत मका पेरणार आणि पेरल्यानंतर त्याला खते शेतकºयांनी घालायची आहेत. ३ ते ४ महिन्यांनंतर ५ किलोच्या एका पिशवी पेरणीने ४ ते ५ टन चारा निर्माण होईल, असे शासनाचे गणित आहे. पण पुढचे ३ ते ४ महिने शेतकºयाने मका पिकाला पाणी कुठून घालायचे? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.अजब निर्णय : लोक चक्रावलेदि. १५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर हा रब्बी हंगामातील पेरणीचा कालावधी असतो. पाऊस नसल्याने यंदा पेरणी झाली नाही. पण आता मका पेरा म्हणणारे शासन जानेवारीत पेरणी करण्याचा सल्ला देऊन शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. तालुक्यात ज्या भागात टेंभूचे पाणी ओढ्याने फिरले, ते पाणी शेतकºयांनी डाळिंबाच्या बागांसाठी आधी पैसे भरून आणले. मका बियाणे शंभर टक्के मोफत असल्याने बोगस योजनेपेक्षा टेंभूचे पाणी मोफत आणि पुरेसे दिले तरच दुष्काळ सुसह्य होईल.हे व्हायला हवे...चारा डेपो आणि चारा छावण्यांत भ्रष्टाचार झाल्याच्या मोठ्या प्रमाणात यापूर्वी तक्रारी झाल्या, ही वस्तुस्थिती आहे. मात्र त्यावेळी जनावरे जगली. त्यांना छावणीत पिण्याचे पाणी मिळाले, हेही खरे आहे. आता तालुक्यात गाई ३२३५५, म्हैशी २९७४०, मेंढ्या ३२६१९ आणि शेळ्या ४८२०२ एवढ्या आहेत. या पशुधनास दररोज ८९० टन ओली वैरण, तर ३५४ टन वाळलेल्या चाºयाची आवश्यकता आहे. दररोज २३ लाख ६१ हजार ४०० लिटर पाणी जनावरांसाठी आवश्यक आहे. शासनाने त्याची सोय करण्याची गरज आहे. 

तहान लागल्यावर आड खोदायला सुरुवात करण्याचा हा मूर्खपणा आहे. तालुक्यात प्यायला पाणी नाही. जनावरे चाºयासाठी तडफडत आहेत. आता मका पेरुन तो ४ महिन्यांनी येणार. तोपर्यंत मका पिकाला पाणी कुठले द्यायचे, हे सरकारने सांगावे. वेळकाढूपणा करुन सरकारने शेतकºयांची नुसती चेष्टा सुरु केली आहे.- हणमंतराव देशमुख, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी

टॅग्स :Sangliसांगलीwater shortageपाणीटंचाईFarmerशेतकरी