शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

दिव्यांग मित्र अभियान राज्यात राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : सांगली जिल्हा परिषदेने राबवलेला ‘दिव्यांग मित्र अभियान’ हा उपक्रम राज्यातील पूर्ण जिल्ह्यात राबविणार आहे. संग्रामसिंह देशमुख व अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली विविध शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सांगली जिल्हा परिषद सक्षमपणे करीत असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.कडेगाव येथे आयोजित दिव्यांग मित्र अभियान या कार्यक्रमात ...

लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : सांगली जिल्हा परिषदेने राबवलेला ‘दिव्यांग मित्र अभियान’ हा उपक्रम राज्यातील पूर्ण जिल्ह्यात राबविणार आहे. संग्रामसिंह देशमुख व अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली विविध शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सांगली जिल्हा परिषद सक्षमपणे करीत असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.कडेगाव येथे आयोजित दिव्यांग मित्र अभियान या कार्यक्रमात दिव्यांग लाभार्थी तपासणीप्रसंगी ते बोलत बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य राजाराम गरुड, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे, प्रांताधिकारी प्रवीण साळुंखे उपस्थित होते.यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सांगली जिल्हा परिषदेने राबवलेला दिव्यांग मित्र अभियान हा उपक्रम कौतुकास्पद असून, तो राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविला जाणार आहे. सरकारबरोबर राज्यातील स्वयंसेवी संघटनेत वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. सर्व शासकीय योजनांचे महत्त्व जाणून त्या घरोघरी पोहोचल्या पाहिजेत, यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी हे लोक व शासनातील दुवा आहेत.संग्रामसिंह देशमुख म्हणाले, दिव्यांग मित्र अभियानात प्रत्येक गावात वाडी वस्तीवर जाऊन नोंदणी केली आहे. जिल्ह्यात ३४ हजार ६५ लोकांची नोंद झाली आहे. यामध्ये २० हजार लोकांकडे प्रमाणपत्रे नाहीत. त्यांची तपासणी करून लवकरच त्यांना प्रमाणपत्र देणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत सर्व आरोग्य सेवा मोफत दिल्या जात आहेत. यावेळी तहसीलदार अर्चना शेटे, सभापती मंदाताई करांडे, उपसभापती रवींद्र कांबळे, चंद्रसेन देशमुख, धनंजय देशमुख, कडेगाव नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते उदयकुमार देशमुख, नथुराम पवार, आरोग्य अधिकारी अशोक वायदंडे, विठ्ठल खाडे, नितीन शिंदे, कृष्णत मोकळे यांच्यासह कार्यकर्ते आदी उपस्थित होते.जतला सौर ऊर्जा प्रकल्प : देशमुखसांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या नळ पाणीपुरवठा व प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिल थकबाकीचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेने जत येथे ४० एकर जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आपली जिल्हा परिषद असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद असेल. या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उत्पन्नातून सर्व गावांच्या विजबिलाचा प्रश्न सुटणार आहे, असे संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले .