शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

दिव्यांग मित्र अभियान राज्यात राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : सांगली जिल्हा परिषदेने राबवलेला ‘दिव्यांग मित्र अभियान’ हा उपक्रम राज्यातील पूर्ण जिल्ह्यात राबविणार आहे. संग्रामसिंह देशमुख व अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली विविध शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सांगली जिल्हा परिषद सक्षमपणे करीत असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.कडेगाव येथे आयोजित दिव्यांग मित्र अभियान या कार्यक्रमात ...

लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : सांगली जिल्हा परिषदेने राबवलेला ‘दिव्यांग मित्र अभियान’ हा उपक्रम राज्यातील पूर्ण जिल्ह्यात राबविणार आहे. संग्रामसिंह देशमुख व अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली विविध शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सांगली जिल्हा परिषद सक्षमपणे करीत असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.कडेगाव येथे आयोजित दिव्यांग मित्र अभियान या कार्यक्रमात दिव्यांग लाभार्थी तपासणीप्रसंगी ते बोलत बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य राजाराम गरुड, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे, प्रांताधिकारी प्रवीण साळुंखे उपस्थित होते.यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सांगली जिल्हा परिषदेने राबवलेला दिव्यांग मित्र अभियान हा उपक्रम कौतुकास्पद असून, तो राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविला जाणार आहे. सरकारबरोबर राज्यातील स्वयंसेवी संघटनेत वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. सर्व शासकीय योजनांचे महत्त्व जाणून त्या घरोघरी पोहोचल्या पाहिजेत, यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी हे लोक व शासनातील दुवा आहेत.संग्रामसिंह देशमुख म्हणाले, दिव्यांग मित्र अभियानात प्रत्येक गावात वाडी वस्तीवर जाऊन नोंदणी केली आहे. जिल्ह्यात ३४ हजार ६५ लोकांची नोंद झाली आहे. यामध्ये २० हजार लोकांकडे प्रमाणपत्रे नाहीत. त्यांची तपासणी करून लवकरच त्यांना प्रमाणपत्र देणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत सर्व आरोग्य सेवा मोफत दिल्या जात आहेत. यावेळी तहसीलदार अर्चना शेटे, सभापती मंदाताई करांडे, उपसभापती रवींद्र कांबळे, चंद्रसेन देशमुख, धनंजय देशमुख, कडेगाव नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते उदयकुमार देशमुख, नथुराम पवार, आरोग्य अधिकारी अशोक वायदंडे, विठ्ठल खाडे, नितीन शिंदे, कृष्णत मोकळे यांच्यासह कार्यकर्ते आदी उपस्थित होते.जतला सौर ऊर्जा प्रकल्प : देशमुखसांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या नळ पाणीपुरवठा व प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिल थकबाकीचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेने जत येथे ४० एकर जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आपली जिल्हा परिषद असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद असेल. या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उत्पन्नातून सर्व गावांच्या विजबिलाचा प्रश्न सुटणार आहे, असे संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले .