शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
4
ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
5
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
6
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
7
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
8
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
10
भविष्यातील भारतात अदानी ग्रुपचं काय योगदान असेल?; प्रणव अदानींनी सांगितला संपूर्ण 'प्लॅन'
11
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
12
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
13
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
14
मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना आता हक्काचे घर; ‘मदत माश’ जमिनीवरील घरे नियमित होणार
15
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
16
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
17
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
18
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
19
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
20
Shivraj Patil Death: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
Daily Top 2Weekly Top 5

महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 23:59 IST

सांगली : कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुराचे पाणी याच जिल्ह्यातील दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी शासनाने योजना आखली आहे. याबाबत जागतिक बँकेशी ...

सांगली : कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुराचे पाणी याच जिल्ह्यातील दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी शासनाने योजना आखली आहे. याबाबत जागतिक बँकेशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी यास तत्त्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगलीत महाजनादेश यात्रेवेळी दिली.सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकात सोमवारी सायंकाळी फडणवीस यांची सभा झाली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, नीता केळकर आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, महापुरात उद्भवलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही उपाययोजना करीत आहोत. भविष्यात महापूर आला, तर येथील विद्युत यंत्रणा, पाणीपुरवठा यंत्रणा बंद होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील. जिल्ह्यातील निम्मा भाग महापुराने ग्रासलेला असताना निम्मा भाग दुष्काळाशी सामना करीत होता. जिल्ह्याची ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारने नवी योजना आखली आहे. पुराचे अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी यापुढे धरणातून दुभाजक बोगदा काढण्यात येईल. त्यातून कालव्याद्वारे हे पाणी जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला देण्यात येईल. जागतिक बँक आणि आशियाई बँकेच्या प्रतिनिधींचे पथक सांगलीला पाठविले होते. त्यांनी पाहणी केली आहे. दुष्काळी भागाला महापुराचे पाणी देण्याबाबतचा प्रस्ताव त्यांच्यासमोर सादर केला असून, त्यांनी त्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. याची अंमलबजावणी होण्यास पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. लोकांचे पुनर्वसन करण्याबरोबरच पुराची तीव्रता कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करू.महापालिकेच्या इतिहासात सर्वाधिक निधी आम्ही दिला आहे. पूरग्रस्तांना जाहीर केलेली मदत दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना, व्यापाऱ्यांनाही आम्ही मदत करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांचे ढोलवादनसांगलीच्या विजयनगर येथे धनगर समाजाच्यावतीने नगरसेविका सविता मदने, अप्सरा वायदंडे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. समाजाच्यावतीने त्यांना काठी आणि घोंगडे देण्यात आले. यावेळी धनगरी ढोलवादन करण्यात येत होते. मुख्यमंत्र्यांनीही गळ्यात ढोल अडकवून ढोलवादन केले.महायुतीचेच सरकार येणारराज्यात भाजप, शिवसेना व अन्य घटक पक्ष एकत्र येणार की नाही, याविषयी मुख्यमंत्री काहीतरी बोलणार, अशी अनेकांना अपेक्षा होती. भाषणाचा समारोप करताना फडणवीस यांनी, राज्यात महायुतीचेच सरकार येणार, असे स्पष्ट केले. भाषणादरम्यान त्यांनी कोठेही शिवसेनेचा उल्लेख केला नाही.