शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

शेतकरी संपाबद्दल जिल्ह्यात संभ्रम

By admin | Updated: June 4, 2017 01:16 IST

संघटनांमध्ये मतभिन्नता : दूध वाहतूक काही प्रमाणात सुरू; आजपासून सर्व संघांकडून पुरवठा होणार

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मुंबईतील बैठकीत संप मिटल्याचे वृत्त जिल्ह्यात पसरताच आंदोलनकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. हे आंदोलन फसल्याचे सांगून शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने आता संपात सहभागी न होण्याचा निर्णय न घेतला, तर रघुनाथदादा पाटील आणि किसान सभेने संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, बंद, पुतळा दहन यासारखी आंदोलने शनिवारी दिवसभर सुरूच राहिली. आंदोलनकर्त्यांमध्ये शनिवारी दिवसभर संभ्रम दिसत होता. तरीही ठिकठिकाणी संपाची धग कायम राहिली. मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज, म्हैसाळमध्ये बंद पाळून शासनाचा निषेध करण्यात आला. लेंगरे (ता. खानापूर), येलूर (ता. वाळवा) येथील आठवडा बाजार झाले नाहीत, तर इस्लामपूरमध्ये बळिराजा संघटनेने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ््याचे दहन केले. संपाची तीव्रता थोडी कमी झाल्याचे शनिवारी दिसून आले. काही दूध संघांनी शनिवारी सकाळी दूधपुरवठा सुरू ठेवला, तर बहुतांश खासगी संघांनी रविवारपासून पुरवठा सुरू होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शनिवारी भाजी बाजारात थोडी गर्दी दिसत होती. शेतकरी संघटनांमध्येही आता संपावरून मतभिन्नता दिसत आहे. शरद जोशीप्रणित संघटनेने संपात यापुढे सहभागी न होता, नियोजन करून पुन्हा काही दिवसांनी आंदोलनात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे बळिराजा संघटना, किसान सभा यांनी आंदोलन कायम असल्याचे स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसांपासून हिंसक बनलेला संप शनिवारी थोडा शांत झाला होता. पश्चिम महाराष्ट्रात दोनच दिवसात मोठा संप झाला, ही जमेची बाजू आहे. तरीही नेतृत्व नसलेल्या संपात सहभागी होणे ही आमची चूक होती. मागण्यांबाबत चर्चा करण्याचा अनुभव संबंधित पुणतांब्याच्या लोकांना नव्हता. त्यामुळे सरकारने त्यांना फसविले. संपाबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. पुन्हा ते उभारणे शक्य नाही. त्यामुळे थोडे दिवस शांततेने चर्चा करून पुन्हा आंदोलन उभारण्यात येईल. - संजय कोले, शेतकरी संघटना (शरद जोशीप्रणित)सरकारने संपकऱ्यांना फसविण्याचे काम केले आहे. एकही मागणी मान्य झालेली नाही. त्यामुळे संप चालू राहील. सोमवारी ५ जूनपासून जिल्"ात तीव्रता वाढविण्यात येईल. मुंबईत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच राहील. - उमेश देशमुख, किसान सभा