शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

शेतकरी संपाबद्दल जिल्ह्यात संभ्रम

By admin | Updated: June 4, 2017 01:16 IST

संघटनांमध्ये मतभिन्नता : दूध वाहतूक काही प्रमाणात सुरू; आजपासून सर्व संघांकडून पुरवठा होणार

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मुंबईतील बैठकीत संप मिटल्याचे वृत्त जिल्ह्यात पसरताच आंदोलनकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. हे आंदोलन फसल्याचे सांगून शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने आता संपात सहभागी न होण्याचा निर्णय न घेतला, तर रघुनाथदादा पाटील आणि किसान सभेने संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, बंद, पुतळा दहन यासारखी आंदोलने शनिवारी दिवसभर सुरूच राहिली. आंदोलनकर्त्यांमध्ये शनिवारी दिवसभर संभ्रम दिसत होता. तरीही ठिकठिकाणी संपाची धग कायम राहिली. मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज, म्हैसाळमध्ये बंद पाळून शासनाचा निषेध करण्यात आला. लेंगरे (ता. खानापूर), येलूर (ता. वाळवा) येथील आठवडा बाजार झाले नाहीत, तर इस्लामपूरमध्ये बळिराजा संघटनेने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ््याचे दहन केले. संपाची तीव्रता थोडी कमी झाल्याचे शनिवारी दिसून आले. काही दूध संघांनी शनिवारी सकाळी दूधपुरवठा सुरू ठेवला, तर बहुतांश खासगी संघांनी रविवारपासून पुरवठा सुरू होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शनिवारी भाजी बाजारात थोडी गर्दी दिसत होती. शेतकरी संघटनांमध्येही आता संपावरून मतभिन्नता दिसत आहे. शरद जोशीप्रणित संघटनेने संपात यापुढे सहभागी न होता, नियोजन करून पुन्हा काही दिवसांनी आंदोलनात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे बळिराजा संघटना, किसान सभा यांनी आंदोलन कायम असल्याचे स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसांपासून हिंसक बनलेला संप शनिवारी थोडा शांत झाला होता. पश्चिम महाराष्ट्रात दोनच दिवसात मोठा संप झाला, ही जमेची बाजू आहे. तरीही नेतृत्व नसलेल्या संपात सहभागी होणे ही आमची चूक होती. मागण्यांबाबत चर्चा करण्याचा अनुभव संबंधित पुणतांब्याच्या लोकांना नव्हता. त्यामुळे सरकारने त्यांना फसविले. संपाबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. पुन्हा ते उभारणे शक्य नाही. त्यामुळे थोडे दिवस शांततेने चर्चा करून पुन्हा आंदोलन उभारण्यात येईल. - संजय कोले, शेतकरी संघटना (शरद जोशीप्रणित)सरकारने संपकऱ्यांना फसविण्याचे काम केले आहे. एकही मागणी मान्य झालेली नाही. त्यामुळे संप चालू राहील. सोमवारी ५ जूनपासून जिल्"ात तीव्रता वाढविण्यात येईल. मुंबईत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच राहील. - उमेश देशमुख, किसान सभा