शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

जिल्ह्यातील अडीच हजार रिक्षांचे परवाने होणार रद्द!

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

रिक्षाचालकांचा कानाडोळा : मुदत १६ नोव्हेंबरपर्यंत, सुट्टीमुळे नूतनीकरणासाठी मिळणार सहा दिवसच

सचिन लाड -सांगली मुदत ओलांडून गेलेल्या रिक्षा परवान्यांच्या नूतनीकरणासाठी परिवहन आयुक्तांनी दीड महिन्याची मुदत देऊनही रिक्षाचालकांनी त्यास ठेंगा दाखविला आहे. नूतनीकरणाची मुदत १६ नोव्हेंबरपर्यंत असली तरी, यामध्ये दुसरा शनिवार, दोन रविवार व दिवाळीची सुट्टी असल्याने केवळ सहा दिवस रिक्षाचालकांना मिळणार आहेत. आतापर्यंत तीस रिक्षाचालक नूतनीकरणास पुढे आले आहेत. रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रश्नी मौन धारण केले आहे. त्यामुळे नूतनीकरणास मुदत मिळूनही अडीच हजार परवाने बंद रद्द होण्याची चिन्हे आहेत.राज्यातील अनेक रिक्षा परवाने मुदतीत नूतनीकरण न झाल्याने ते बाद झाले आहेत. रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हे परवाने नूतनीकरण करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार परिवहन आयुक्तांनी दि. १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधित चालकांनी परवाने नूतनीकरण करून घेण्याचा आदेश काढला होता; पण यासाठी वीस ते तीस हजार रुपये दंड आकारण्याचाही आदेश दिला होता. चालकांनी याप्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला होता. तीस हजार रुपये दंड हा मुंबई महानगर क्षेत्रासाठी होता. अन्य जिल्ह्यात दंड आकारण्याचा पूर्वीचा जो नियम होता, तोच नियम यामध्ये लागू करावा, असे परिवहन आयुक्तांनी आदेशात म्हटले होते. पण आदेश नेमका काय आहे, हे संघटनांच्या प्रतिनिधींना न समजल्याने त्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी परवाना नूतनीकरणासाठी प्रत्येक दिवसाला २० रुपये ते दोन हजारापर्यंत दंड आहे. २० ते ३० हजार रुपये दंड नाही, हे चालकांनी लक्षात घ्यावे. नूतनीकरणास ही शेवटची संधी असल्याने चालकांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले होते; पण तरीही याकडे दुर्लक्ष होत आहे.नूतनीकरणास चालकांना प्रतिसाद न मिळाल्याने परिवहन आयुक्तांनी पुन्हा १५ दिवसांची मुदत दिली. १५ नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन केले होते. तरीही चालकांना प्रतिसाद नाही. केवळ ३० चालकांनी अर्ज सादर केले आहेत. उर्वरित दोन हजार ४७० चालक अद्याप आले नाहीत. १६ नोव्हेंबरची मुदत असली तरी, यामध्ये शनिवार, रविवार व दिवाळीची सुट्टी असल्याने आरटीओ कार्यालय बंद राहणार नाही. चालकांना नूतनीकरणास बुधवारपासून केवळ सहा दिवस मिळणार आहेत. या सहा दिवसांत चालक न आल्यास हे परवाने रद्द होणार आहेत.नवी शक्कल : नूतनीकरण नाही, तर परवाना नाही!ज्यांचे परवाने नूतनीकरण करायचे आहेत, त्यापोटी चालकांना शासनाचा कर भरावा लागणार आहे. कराची ही रक्कम पाच हजारांपासून ते वीस हजारांपर्यंत जाते. त्यामुळे ते पुढे येत नाहीत. शासनाने भविष्यात परवाने खुले केले तर, ते मोफत मिळतात, मग आता पैसे कशाला भरायचे, असा ते विचार करीत आहेत. पण त्यावरही शासनाने शक्कल लढविली आहे. परवाने नूतनीकरणाची मुदत संपल्यानंतर दि. १६ ते २३ नोव्हेंबरपर्यंत परवाने रद्द करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. शासनाने नवीन परवाने सोडत पद्धतीने देण्याची घोषणा केली तर, ज्या चालकांनी नूतनीकरण करून घेतले नव्हते, त्यांना परवाना न देण्याचा निर्णय घेतला आहे.