शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अडीच हजार रिक्षांचे परवाने होणार रद्द!

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

रिक्षाचालकांचा कानाडोळा : मुदत १६ नोव्हेंबरपर्यंत, सुट्टीमुळे नूतनीकरणासाठी मिळणार सहा दिवसच

सचिन लाड -सांगली मुदत ओलांडून गेलेल्या रिक्षा परवान्यांच्या नूतनीकरणासाठी परिवहन आयुक्तांनी दीड महिन्याची मुदत देऊनही रिक्षाचालकांनी त्यास ठेंगा दाखविला आहे. नूतनीकरणाची मुदत १६ नोव्हेंबरपर्यंत असली तरी, यामध्ये दुसरा शनिवार, दोन रविवार व दिवाळीची सुट्टी असल्याने केवळ सहा दिवस रिक्षाचालकांना मिळणार आहेत. आतापर्यंत तीस रिक्षाचालक नूतनीकरणास पुढे आले आहेत. रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रश्नी मौन धारण केले आहे. त्यामुळे नूतनीकरणास मुदत मिळूनही अडीच हजार परवाने बंद रद्द होण्याची चिन्हे आहेत.राज्यातील अनेक रिक्षा परवाने मुदतीत नूतनीकरण न झाल्याने ते बाद झाले आहेत. रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हे परवाने नूतनीकरण करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार परिवहन आयुक्तांनी दि. १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधित चालकांनी परवाने नूतनीकरण करून घेण्याचा आदेश काढला होता; पण यासाठी वीस ते तीस हजार रुपये दंड आकारण्याचाही आदेश दिला होता. चालकांनी याप्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला होता. तीस हजार रुपये दंड हा मुंबई महानगर क्षेत्रासाठी होता. अन्य जिल्ह्यात दंड आकारण्याचा पूर्वीचा जो नियम होता, तोच नियम यामध्ये लागू करावा, असे परिवहन आयुक्तांनी आदेशात म्हटले होते. पण आदेश नेमका काय आहे, हे संघटनांच्या प्रतिनिधींना न समजल्याने त्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी परवाना नूतनीकरणासाठी प्रत्येक दिवसाला २० रुपये ते दोन हजारापर्यंत दंड आहे. २० ते ३० हजार रुपये दंड नाही, हे चालकांनी लक्षात घ्यावे. नूतनीकरणास ही शेवटची संधी असल्याने चालकांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले होते; पण तरीही याकडे दुर्लक्ष होत आहे.नूतनीकरणास चालकांना प्रतिसाद न मिळाल्याने परिवहन आयुक्तांनी पुन्हा १५ दिवसांची मुदत दिली. १५ नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन केले होते. तरीही चालकांना प्रतिसाद नाही. केवळ ३० चालकांनी अर्ज सादर केले आहेत. उर्वरित दोन हजार ४७० चालक अद्याप आले नाहीत. १६ नोव्हेंबरची मुदत असली तरी, यामध्ये शनिवार, रविवार व दिवाळीची सुट्टी असल्याने आरटीओ कार्यालय बंद राहणार नाही. चालकांना नूतनीकरणास बुधवारपासून केवळ सहा दिवस मिळणार आहेत. या सहा दिवसांत चालक न आल्यास हे परवाने रद्द होणार आहेत.नवी शक्कल : नूतनीकरण नाही, तर परवाना नाही!ज्यांचे परवाने नूतनीकरण करायचे आहेत, त्यापोटी चालकांना शासनाचा कर भरावा लागणार आहे. कराची ही रक्कम पाच हजारांपासून ते वीस हजारांपर्यंत जाते. त्यामुळे ते पुढे येत नाहीत. शासनाने भविष्यात परवाने खुले केले तर, ते मोफत मिळतात, मग आता पैसे कशाला भरायचे, असा ते विचार करीत आहेत. पण त्यावरही शासनाने शक्कल लढविली आहे. परवाने नूतनीकरणाची मुदत संपल्यानंतर दि. १६ ते २३ नोव्हेंबरपर्यंत परवाने रद्द करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. शासनाने नवीन परवाने सोडत पद्धतीने देण्याची घोषणा केली तर, ज्या चालकांनी नूतनीकरण करून घेतले नव्हते, त्यांना परवाना न देण्याचा निर्णय घेतला आहे.