शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दहावीचा जिल्ह्याचा निकाल ९२.४१%

By admin | Updated: June 13, 2017 23:42 IST

दहावीचा जिल्ह्याचा निकाल ९२.४१%

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ९२.४१ टक्के लागला. उत्तीर्णांमध्ये मुलींचे सर्वाधिक ९४.८६ टक्के प्रमाण असून गतवर्षीच्या तुलनेत ते चार टक्के अधिक आहे. बारावीनंतर दहावीमध्येही कडेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारत सर्वाधिक ९६.४७ टक्के निकालाची नोंद केली, तर सर्वात कमी निकाल जत तालुक्याचा ८९.१६ टक्के इतका लागला. जिल्ह्यातील १४४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. मागील पंधरा दिवसांपासून दहावीच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मंगळवारी आॅनलाईन निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मागील काही वर्षांपासून बारावी आणि दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालातही कडेगाव तालुक्याने बाजी मारली. तालुक्याचा सर्वाधिक ९६.४७ टक्के निकाल लागला. जत तालुक्याचा निकाल ८९.१६, आटपाडी ९४.२८, कवठेमहांकाळ ९४.९६, खानापूर ९४.५६, मिरज ९१.३१, पलूस ९४.२६, सांगली शहर ९०.५७, शिराळा ९५.२७, तासगाव ९०.५३ आणि वाळवा तालुक्याचा निकाल ९३.७१ टक्के लागला. जिल्ह्यातील एक हजार ७३८ पुनर्परीक्षार्थींपैकी ५५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.१४४ शाळांचा शंभर टक्के निकालजिल्ह्यातील १४४ शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात महापालिका हद्दीतील सर्वाधिक २२ शाळांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यातील १२, जतमधील १०, कडेगाव १३, कवठेमहांकाळ ९, खानापूर १६, मिरज १२, पलूस ९, शिराळा १६, तासगाव ६ आणि वाळवा तालुक्यातील १९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.२४ जूनला गुणपत्रिका हातीविद्यार्थ्यांना २४ जूनला संबंधित विद्यालयामध्ये गुणपत्रिका मिळणार आहे. तसेच १८ जुलैपासून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने कळविले आहे. दहावीचा निकाल लागल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. साधारणत: २५ जूनपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. निकालाची टक्केवारी वाढली असल्याने प्रवेशासाठी चढाओढ होणार आहे.