शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

दहावीचा जिल्ह्याचा निकाल ९२.४१%

By admin | Updated: June 13, 2017 23:42 IST

दहावीचा जिल्ह्याचा निकाल ९२.४१%

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ९२.४१ टक्के लागला. उत्तीर्णांमध्ये मुलींचे सर्वाधिक ९४.८६ टक्के प्रमाण असून गतवर्षीच्या तुलनेत ते चार टक्के अधिक आहे. बारावीनंतर दहावीमध्येही कडेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारत सर्वाधिक ९६.४७ टक्के निकालाची नोंद केली, तर सर्वात कमी निकाल जत तालुक्याचा ८९.१६ टक्के इतका लागला. जिल्ह्यातील १४४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. मागील पंधरा दिवसांपासून दहावीच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मंगळवारी आॅनलाईन निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मागील काही वर्षांपासून बारावी आणि दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालातही कडेगाव तालुक्याने बाजी मारली. तालुक्याचा सर्वाधिक ९६.४७ टक्के निकाल लागला. जत तालुक्याचा निकाल ८९.१६, आटपाडी ९४.२८, कवठेमहांकाळ ९४.९६, खानापूर ९४.५६, मिरज ९१.३१, पलूस ९४.२६, सांगली शहर ९०.५७, शिराळा ९५.२७, तासगाव ९०.५३ आणि वाळवा तालुक्याचा निकाल ९३.७१ टक्के लागला. जिल्ह्यातील एक हजार ७३८ पुनर्परीक्षार्थींपैकी ५५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.१४४ शाळांचा शंभर टक्के निकालजिल्ह्यातील १४४ शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात महापालिका हद्दीतील सर्वाधिक २२ शाळांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यातील १२, जतमधील १०, कडेगाव १३, कवठेमहांकाळ ९, खानापूर १६, मिरज १२, पलूस ९, शिराळा १६, तासगाव ६ आणि वाळवा तालुक्यातील १९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.२४ जूनला गुणपत्रिका हातीविद्यार्थ्यांना २४ जूनला संबंधित विद्यालयामध्ये गुणपत्रिका मिळणार आहे. तसेच १८ जुलैपासून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने कळविले आहे. दहावीचा निकाल लागल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. साधारणत: २५ जूनपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. निकालाची टक्केवारी वाढली असल्याने प्रवेशासाठी चढाओढ होणार आहे.