शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा जिल्ह्याचा निकाल ९२.४१%

By admin | Updated: June 13, 2017 23:42 IST

दहावीचा जिल्ह्याचा निकाल ९२.४१%

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ९२.४१ टक्के लागला. उत्तीर्णांमध्ये मुलींचे सर्वाधिक ९४.८६ टक्के प्रमाण असून गतवर्षीच्या तुलनेत ते चार टक्के अधिक आहे. बारावीनंतर दहावीमध्येही कडेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारत सर्वाधिक ९६.४७ टक्के निकालाची नोंद केली, तर सर्वात कमी निकाल जत तालुक्याचा ८९.१६ टक्के इतका लागला. जिल्ह्यातील १४४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. मागील पंधरा दिवसांपासून दहावीच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मंगळवारी आॅनलाईन निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मागील काही वर्षांपासून बारावी आणि दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालातही कडेगाव तालुक्याने बाजी मारली. तालुक्याचा सर्वाधिक ९६.४७ टक्के निकाल लागला. जत तालुक्याचा निकाल ८९.१६, आटपाडी ९४.२८, कवठेमहांकाळ ९४.९६, खानापूर ९४.५६, मिरज ९१.३१, पलूस ९४.२६, सांगली शहर ९०.५७, शिराळा ९५.२७, तासगाव ९०.५३ आणि वाळवा तालुक्याचा निकाल ९३.७१ टक्के लागला. जिल्ह्यातील एक हजार ७३८ पुनर्परीक्षार्थींपैकी ५५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.१४४ शाळांचा शंभर टक्के निकालजिल्ह्यातील १४४ शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात महापालिका हद्दीतील सर्वाधिक २२ शाळांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यातील १२, जतमधील १०, कडेगाव १३, कवठेमहांकाळ ९, खानापूर १६, मिरज १२, पलूस ९, शिराळा १६, तासगाव ६ आणि वाळवा तालुक्यातील १९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.२४ जूनला गुणपत्रिका हातीविद्यार्थ्यांना २४ जूनला संबंधित विद्यालयामध्ये गुणपत्रिका मिळणार आहे. तसेच १८ जुलैपासून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने कळविले आहे. दहावीचा निकाल लागल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. साधारणत: २५ जूनपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. निकालाची टक्केवारी वाढली असल्याने प्रवेशासाठी चढाओढ होणार आहे.