शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
4
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
5
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
6
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
7
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
8
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
9
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
10
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
11
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
12
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
13
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
14
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
15
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
16
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
17
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
18
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
19
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
20
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स

जि. प.च्या मनमानीने शाळा अडचणीत

By admin | Updated: August 8, 2016 23:39 IST

स्वाती लांडगे : शाळांऐवजी शिक्षकांच्या सोयीने नियुक्तीचे धोरण नुकसानीचे

तासगाव : तासगाव तालुक्यातील तब्बल १६ शाळांत अपुरे शिक्षक असल्यामुळे शाळांसह विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. तालुक्यातील ४७ शाळांत जागा रिक्त असून, पंचायत समितीकडून १६ शाळांत तातडीने शिक्षकांची गरज होती. तशी जिल्हा परिषदेकडे मागणी केली आहे. जिल्हा परिषद स्तरावरून शाळांची सोय पाहण्याऐवजी शिक्षकांची सोय पाहून थेट शाळेत नेमणुका दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मनमानीनेच तालुक्यातील शाळा अडचणीत आल्याचा आरोप पंचायत समितीच्या सभापती स्वाती लांडगे यांनी केला.त्या पुढे म्हणाल्या, तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्तापूर्ण कामगिरी आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत शाळेत पटसंख्या वाढत आहे. मात्र यावेळी झालेल्या प्रशासकीय आणि विनंती बदली प्रक्रियेत अनेक शाळांत शिक्षकांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेतून नियुक्ती दिलेले सहा शिक्षक अद्याप हजर झालेले नाहीत, तर बदली होऊन अन्य तालुक्यातून आणि परजिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांची जिल्हा परिषदेकडून थेट शाळेवर नियुक्ती करण्यात आली आहे.तालुक्यातील ४७ शाळांत ५५ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यापैकी १६ शाळांत शिक्षकांची प्राधान्याने गरज आहे. या बहुतांश शाळांचा डोलारा एकाच शिक्षकावर अवलंबून आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. त्यामुळे प्राधान्याने शिक्षकांची आवश्यकता असलेल्या शाळांची यादी जिल्हा परिषदेला सादर करण्यात आली होती. मात्र जिल्हा परिषदेकडून, विशेषत: शिक्षण समिती आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या नेमणुकीचे धोरण चुकीच्या पध्दतीने राबविले आहे. जिल्हा परिषदेतून कोणत्या शाळेवर शिक्षक द्यायचा, याचा निर्णय घेतला जातो. अशा पध्दतीने नियुक्ती देताना शाळेची गरज पाहण्याऐवजी शिक्षकाची सोय पाहिली जात आहे. शिक्षकांची नियुक्ती पंचायत समितीमार्फत झाली असती, तर या शाळांचा प्रश्न निर्माण झाला नसता, अशी टीका लांडगे यांनी केली. (वार्ताहर)...तर विद्यार्थ्यांसह : झेडपीत ठिय्यातालुक्यातील प्राधान्याने गरज असलेल्या शाळांना शिक्षक मिळावा, यासाठी पालक आणि गावातील लोकप्रतिनधींकडून पंचायत समितीकडे सातत्याने मागणी केली जात आहे. लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या धोरणांमुळे आमचे पंचायत समितीचे काम पोस्टमनप्रमाणे झाले आहे. येत्या आठ दिवसांत तातडीच्या शाळांतून शिक्षकांची नेमणूक केली नाही, तर संबंधित शाळांतील विद्यार्थी आणि पालकांना घेऊन जिल्हा परिषदेसमोरच ठिय्या मारणार असल्याचा इशाराही यावेळी सभापती लांडगे यांनी दिला.