शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जि. प.च्या मनमानीने शाळा अडचणीत

By admin | Updated: August 8, 2016 23:39 IST

स्वाती लांडगे : शाळांऐवजी शिक्षकांच्या सोयीने नियुक्तीचे धोरण नुकसानीचे

तासगाव : तासगाव तालुक्यातील तब्बल १६ शाळांत अपुरे शिक्षक असल्यामुळे शाळांसह विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. तालुक्यातील ४७ शाळांत जागा रिक्त असून, पंचायत समितीकडून १६ शाळांत तातडीने शिक्षकांची गरज होती. तशी जिल्हा परिषदेकडे मागणी केली आहे. जिल्हा परिषद स्तरावरून शाळांची सोय पाहण्याऐवजी शिक्षकांची सोय पाहून थेट शाळेत नेमणुका दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मनमानीनेच तालुक्यातील शाळा अडचणीत आल्याचा आरोप पंचायत समितीच्या सभापती स्वाती लांडगे यांनी केला.त्या पुढे म्हणाल्या, तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्तापूर्ण कामगिरी आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत शाळेत पटसंख्या वाढत आहे. मात्र यावेळी झालेल्या प्रशासकीय आणि विनंती बदली प्रक्रियेत अनेक शाळांत शिक्षकांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेतून नियुक्ती दिलेले सहा शिक्षक अद्याप हजर झालेले नाहीत, तर बदली होऊन अन्य तालुक्यातून आणि परजिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांची जिल्हा परिषदेकडून थेट शाळेवर नियुक्ती करण्यात आली आहे.तालुक्यातील ४७ शाळांत ५५ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यापैकी १६ शाळांत शिक्षकांची प्राधान्याने गरज आहे. या बहुतांश शाळांचा डोलारा एकाच शिक्षकावर अवलंबून आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. त्यामुळे प्राधान्याने शिक्षकांची आवश्यकता असलेल्या शाळांची यादी जिल्हा परिषदेला सादर करण्यात आली होती. मात्र जिल्हा परिषदेकडून, विशेषत: शिक्षण समिती आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या नेमणुकीचे धोरण चुकीच्या पध्दतीने राबविले आहे. जिल्हा परिषदेतून कोणत्या शाळेवर शिक्षक द्यायचा, याचा निर्णय घेतला जातो. अशा पध्दतीने नियुक्ती देताना शाळेची गरज पाहण्याऐवजी शिक्षकाची सोय पाहिली जात आहे. शिक्षकांची नियुक्ती पंचायत समितीमार्फत झाली असती, तर या शाळांचा प्रश्न निर्माण झाला नसता, अशी टीका लांडगे यांनी केली. (वार्ताहर)...तर विद्यार्थ्यांसह : झेडपीत ठिय्यातालुक्यातील प्राधान्याने गरज असलेल्या शाळांना शिक्षक मिळावा, यासाठी पालक आणि गावातील लोकप्रतिनधींकडून पंचायत समितीकडे सातत्याने मागणी केली जात आहे. लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या धोरणांमुळे आमचे पंचायत समितीचे काम पोस्टमनप्रमाणे झाले आहे. येत्या आठ दिवसांत तातडीच्या शाळांतून शिक्षकांची नेमणूक केली नाही, तर संबंधित शाळांतील विद्यार्थी आणि पालकांना घेऊन जिल्हा परिषदेसमोरच ठिय्या मारणार असल्याचा इशाराही यावेळी सभापती लांडगे यांनी दिला.