शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
7
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
8
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
9
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
10
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
11
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
12
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
13
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
14
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
15
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
16
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
17
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
18
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
19
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
20
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. आरक्षणाची २७ ला सुनावणी

By admin | Updated: October 20, 2016 00:09 IST

बाबासाहेब मुळीक : सोडत पुन्हा काढा, विभागीय आयुक्तांकडे अपील, अनेक मतदारसंघांवर अन्याय

सांगली : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण रचना आणि आरक्षण सोडतीमध्ये चुका झाल्या असून, भौगोलिक क्षेत्र, पूर्वीच्या आरक्षणाचा विचार केल्याचे दिसत नाही. खुल्या प्रवर्गातून महिलांचे आरक्षण काढता, केवळ २०१२ च्या आरक्षणाचा विचार केल्यामुळे अनेक मतदारसंघ वारंवार खुलेच राहिले आहेत. येथील आरक्षण सोडत पुन्हा काढण्याची गरज आहे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. विभागीय आयुक्तांनी हरकतींवर दि. २७ आॅक्टोबररोजी सुनावणी ठेवली आहे. अ‍ॅड. मुळीक म्हणाले की, सर्व जिल्ह्यात व्यावहारिकदृष्ट्या जिथेपर्यंत शक्य आहे, तिथेपर्यंत मतदारसंघांत समान लोकसंख्या ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु, खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघाची लोकसंख्या ३८ हजार ४८९ व शिराळ्याची ३६ हजार ८११ अशी झाली आहे. त्यामुळे या दोन तालुक्यावर अन्याय झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या तालुक्यावरील अन्याय दूर करण्यासाठी २०१२ च्या निवडणुकीवेळी असणारी सदस्यसंख्या ठेवण्याची गरज आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. खानापूर तालुक्यात चार, शिराळा- पाच, मिरज- दहा आणि वाळवा तालुक्यात दहा अशी सदस्यसंख्या ठेवल्यास, लोकसंख्या व सदस्यसंख्या बरोबर होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी खानापूर तालुक्यात तीनऐवजी चार, शिराळा- चारऐवजी पाच आणि वाळवा- अकराऐवजी दहा अशी सदस्यसंख्या निश्चित करावी. याशिवाय जि.प. गटाचे आरक्षण पुन्हा काढण्यात यावे, अशी निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आयोगाने दि. २७ आॅक्टोबर रोजी सुनावणीसाठी पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडून चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. (प्रतिनिधी)आरक्षण सोडत : मोहिते यांचीही तक्रारखुल्या प्रवर्गातून महिलांचे आरक्षण काढताना प्रशासनाकडून चुका झाल्या आहेत. त्यांनी खुल्या ३७ जिल्हा परिषद गटातूनच १८ महिलांचे आरक्षण काढण्याची गरज होती. परंतु, प्रशासनाने आरक्षण सोडतीमध्ये २०१२ मध्ये जेथे खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे, त्या ठिकाणी महिला आरक्षण टाकल्यामुळे अनेक मतदार संघांवर अन्याय झाला आहे. २०१२ च्या पूर्वी २००७ मध्ये खुला गटाचे आरक्षण पडले असून, त्यापूर्वीही तो मतदारसंघ खुलाच राहिला आहे. या मुद्द्यावर सदस्य सुरेश मोहिते यांनी तक्रार केली आहे..'आरक्षणाची मागणीखानापूर, शिराळा आणि वाळवा या तालुक्यातील लोकसंख्या व सदस्य संख्येनुसार बरोबर होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यातून सदस्यसंख्या नक्की करावी, अशी मगणी जि.प. गटाच्या आरक्षणाची करण्यात आली आहे.