शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

जि. प. आरक्षणाची २७ ला सुनावणी

By admin | Updated: October 20, 2016 00:09 IST

बाबासाहेब मुळीक : सोडत पुन्हा काढा, विभागीय आयुक्तांकडे अपील, अनेक मतदारसंघांवर अन्याय

सांगली : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण रचना आणि आरक्षण सोडतीमध्ये चुका झाल्या असून, भौगोलिक क्षेत्र, पूर्वीच्या आरक्षणाचा विचार केल्याचे दिसत नाही. खुल्या प्रवर्गातून महिलांचे आरक्षण काढता, केवळ २०१२ च्या आरक्षणाचा विचार केल्यामुळे अनेक मतदारसंघ वारंवार खुलेच राहिले आहेत. येथील आरक्षण सोडत पुन्हा काढण्याची गरज आहे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. विभागीय आयुक्तांनी हरकतींवर दि. २७ आॅक्टोबररोजी सुनावणी ठेवली आहे. अ‍ॅड. मुळीक म्हणाले की, सर्व जिल्ह्यात व्यावहारिकदृष्ट्या जिथेपर्यंत शक्य आहे, तिथेपर्यंत मतदारसंघांत समान लोकसंख्या ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु, खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघाची लोकसंख्या ३८ हजार ४८९ व शिराळ्याची ३६ हजार ८११ अशी झाली आहे. त्यामुळे या दोन तालुक्यावर अन्याय झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या तालुक्यावरील अन्याय दूर करण्यासाठी २०१२ च्या निवडणुकीवेळी असणारी सदस्यसंख्या ठेवण्याची गरज आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. खानापूर तालुक्यात चार, शिराळा- पाच, मिरज- दहा आणि वाळवा तालुक्यात दहा अशी सदस्यसंख्या ठेवल्यास, लोकसंख्या व सदस्यसंख्या बरोबर होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी खानापूर तालुक्यात तीनऐवजी चार, शिराळा- चारऐवजी पाच आणि वाळवा- अकराऐवजी दहा अशी सदस्यसंख्या निश्चित करावी. याशिवाय जि.प. गटाचे आरक्षण पुन्हा काढण्यात यावे, अशी निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आयोगाने दि. २७ आॅक्टोबर रोजी सुनावणीसाठी पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडून चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. (प्रतिनिधी)आरक्षण सोडत : मोहिते यांचीही तक्रारखुल्या प्रवर्गातून महिलांचे आरक्षण काढताना प्रशासनाकडून चुका झाल्या आहेत. त्यांनी खुल्या ३७ जिल्हा परिषद गटातूनच १८ महिलांचे आरक्षण काढण्याची गरज होती. परंतु, प्रशासनाने आरक्षण सोडतीमध्ये २०१२ मध्ये जेथे खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे, त्या ठिकाणी महिला आरक्षण टाकल्यामुळे अनेक मतदार संघांवर अन्याय झाला आहे. २०१२ च्या पूर्वी २००७ मध्ये खुला गटाचे आरक्षण पडले असून, त्यापूर्वीही तो मतदारसंघ खुलाच राहिला आहे. या मुद्द्यावर सदस्य सुरेश मोहिते यांनी तक्रार केली आहे..'आरक्षणाची मागणीखानापूर, शिराळा आणि वाळवा या तालुक्यातील लोकसंख्या व सदस्य संख्येनुसार बरोबर होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यातून सदस्यसंख्या नक्की करावी, अशी मगणी जि.प. गटाच्या आरक्षणाची करण्यात आली आहे.