शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

जि. प. अध्यक्षांकडून शिक्षण विभागाची झाडाझडती

By admin | Updated: June 28, 2016 23:37 IST

फायली अडवल्यास कारवाई : रणजित पाटील यांच्याकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना इशारा

सांगली : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रभारी अध्यक्ष रणजित पाटील यांनी मंगळवारी झाडाझडती घेतली. आठ दिवसात सर्व फायली पूर्ण केल्या पाहिजेत. अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. शिक्षणचे दोन कर्मचारी आणि वित्त विभागाचा एक कर्मचारी गैरहजर राहिल्याचे त्यांच्या भेटीत निदर्शनास आले.जिल्हा परिषद शिक्षण विभाग गेल्या दोन वर्षांपासून वादग्रस्त बनला आहे. नियमानुसार असलेल्या फायलींनाही या विभागातून मंजुरी मिळत नाही. शिक्षकांना सन्मानाची वागणूकही कर्मचारी देत नसल्याच्या तक्रारी आहेत. कर्मचाऱ्यांच्या गैरकारभाराला अंकुश लावण्याऐवजी त्याचे समर्थनही काही अधिकारी करीत आहेत. यामुळे विभागातील सावळा गोंधळ वाढला आहे. काही लोकप्रतिनिधीही शिक्षकांची लूट करू लागले आहेत. यामुळे शिक्षण विभाग राज्यभर बदनाम झाला आहे. या शिक्षण विभागाचे सभापतीपद आणि आता जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्षपद रणजित पाटील यांच्याकडे आहे. शिक्षण विभागातील गैरकारभार शंभर टक्के थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांनी कठोर निर्णय घेतले आहेत. शिक्षण विभागास मंगळवारी त्यांनी सकाळी साडेदहा वाजता अचानक भेट देऊन कर्मचारी, अधिकारी कार्यालयात आहेत का? याचा शोध घेतला. यावेळी दोन कर्मचारी गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याचबरोबर कामानिमित्त शिक्षकांनीही मोठी गर्दी कार्यालयात केल्याचेही निदर्शनास आले. यावरून त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पंचनामा केला. शिक्षकांची कार्यालयात फाईल आल्यानंतर आठ दिवसात ती पूर्ण करून त्यांच्या हातात मिळाली पाहिजे. फायली पेंडिंग राहिल्यास दोषी कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा रणजित पाटील यांनी दिला आहे. त्यांच्या भेटीमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली होती. कागदपत्रे व्यवस्थित ठेवून फायली पूर्ण करण्यासाठी दिवसभर कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते.शिक्षण विभागाबरोबरच त्यांनी जिल्हा परिषदेतील वित्त विभागासही भेट देऊन पाहणी केली. येथे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. एक कर्मचारी कार्यालयात येऊन कामासाठी बाहेर गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी करण्याची सूचना रणजित पाटील यांनी खातेप्रमुखांना दिली. (प्रतिनिधी)शिक्षण विभागातील ठाणेदारांना हलविलेशिक्षण विभागातील गैरकारभाराला आळा घालण्यासाठी तेथील एकाच टेबलला अनेक वर्षे चिकटून बसलेल्या ठाणेदारांना रणजित पाटील यांनी हलविले. त्यामुळे शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. बदल केलेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी काम न केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.