शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘मनरेगा’तून जिल्ह्याला सात कोटी

By admin | Updated: May 7, 2016 00:55 IST

जिल्ह्यात १५०० विकासकामे : जत तालुक्याला सर्वाधिक पाच कोटींचा निधी

युनूस शेख --इस्लामपूर -सांगली जिल्ह्यात गतवर्षी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून झालेल्या विविध प्रकारच्या १५०७ कामांचा ६ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. तालुकानिहाय निधीसुध्दा पंचायत समित्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. जतला सर्वाधिक पाच कोटींचा, तर वाळवा तालुक्याला ३६ लाख ३४ हजारांचा निधी मिळाला.केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयातर्फे मनरेगा ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली जाते. रोजगाराची हमी देतानाच त्यातून वैयक्तिक आणि सार्वजनिक विकासाची कामे मार्गी लावली जातात. मनरेगातर्फे रस्ते, पशु-पक्षी, जनावरांचे गोठे, वैयक्तिक विहिरी, कंपोस्ट खत निर्मिती, शौचालय बांधणी, शोषखड्डे, इंदिरा आवास घरकुले अशा प्रकारची कामे केली जातात.गतवर्षी जत तालुक्यात सर्वाधिक ५२४ विकासकामे झाली. शिराळ्यात २३९, खानापूरमध्ये २०३, कडेगावात १८८, तासगाव १००, मिरज ८३, वाळवा ५८, कवठेमहांकाळ ४४ आणि आटपाडी व पलूस तालुक्यात प्रत्येकी ३४ विकासकामे झाली आहेत.या योजनेतून अनेक शेतकऱ्यांनी गाय, म्हैस, शेळी, कोंबड्या पालनाचे व्यवसाय हाती घेतले आहेत. महात्मा गांधींनी शेळीला गरिबाची गाय-कामधेून असे म्हटले आहे. जनावरांचा सांभाळ करणाऱ्या पालकांच्या संसारातील दारिद्र्य कमी करण्याचा प्रयत्न जनावरांकडून होतो. आपल्या पालकाचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यातही त्यांचा मोठा सहभाग राहतो. त्यामुळे अशा शेळी पालन, गाय-म्हैशींचे गोठे, कोंबड्या पालन असे कुटिर उद्योग हे निश्चितच समाज विकासाचे प्रतीक ठरते.या योजनेंतर्गत कामे होत असतानाच अचानक काही महिन्यांपूर्वी शासनाने निधी देणे बंद केले होते. त्यामुळे या योजनेतून होणारी विकासकामे ठप्प झाली होती. तसेच निधीअभावी नव्या प्रस्तावांना मंजुरी देणे शक्य नव्हते. मात्र ग्रामविकास मंत्रालयाच्या अखत्यारितील मनरेगाच्या आयुक्तांनी दोनच दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेला निधी पुन्हा देण्यात येत असल्याचे लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासनाला कळवले आहे. तसेच गतवर्षातील विविध कामांसाठीचा ६ कोटी ६८ लाखांचा निधीही वर्ग केला. त्यानंतर हा निधी प्रत्येक तालुक्याच्या मागणीनुसार संबंधित पंचायत समिती प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला आहे. या निधीचा योग्य वापर होण्याची गरज आहे.राज्य शासनाने यावर्षीच्या अर्थसंकल्पात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी तब्बल १२ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे या योजनेतून पुढील वर्षभरात मोठ्या प्रमाणात कामे होतील. या योजनेतून वाळवा तालुक्यातसुध्दा गतीने प्रस्ताव मंजूर करुन लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देऊ.- अमोल पवार,सहायक कार्यक्रम अधिकारी, मनरेगा