शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत गेला दीड हजार जणांचा बळी

By admin | Updated: July 22, 2016 00:03 IST

साडेतीन हजार अपघात : सुरक्षेच्या उपाययोजना कुचकामी; कागदावरच असलेले वाहतूक नियम प्रत्यक्षात राबविण्याची गरज

सचिन लाड -- सांगली --महामार्गावर बेदरकार आणि बेशिस्त वाहतुकीचे सातत्याने बळी जात असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात साडेतीन हजार अपघातात एक हजार ५१३ जणांचा बळी गेला आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील जिल्ह्यातील कणेगाव ते कासेगाव ही २८ किलोमीटरची हद्द येते. मिरज-पंढरपूर असे दोन राष्ट्रीय, तर सांगली ते तासगाव, मिरज-विजापूर, वसगडेमार्गे कऱ्हाड, सांगली ते पेठ, सांगली ते कोल्हापूर असे पाच राज्य महामार्ग आहेत. याठिकाणी उपाययोजना करूनही अपघाताला आळा बसलेला नाही.मालिका सुरूच वाहनचालकांमध्ये ओव्हरटेक करून पुढे जाण्याची घाई आणि वेगाची नशा, या दोन प्रमुख गोष्टी अपघात होण्यास कारणीभूत आहेत. गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यात प्रत्येकवर्षी अपघातांच्या संख्येत वाढच होत आली आहे. २०१३ मध्ये सांगली-तासगाव रस्त्यावरील चिंतामणीनगर रेल्वे पुलावर भरधाव सुमोने समोरुन रिक्षाला धडक दिली. सांगली-कोल्हापूर रस्त्यावरही सातत्याने अपघात होतात. मिरज-पंढरपूर, म्हैसाळ या मार्गावरही अपघात होतात.मानवी चुकाच कारणीभूतजिल्ह्यात २०१३ मध्ये २६० जणांचा अपघातामध्ये बळी गेला. २०१२ मध्ये ३१४ जणांचा बळी गेला होता. यातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक अपघात हे मानवी चुकांमुळे झालेले आहेत. अपघाताची ६४ ठिकाणेतत्कालीन पोलिसप्रमुख सावंत यांनी जिल्ह्यात अपघाताच्या ठिकाणांचा सर्व्हे केला होता. या सर्व्हेतून जिल्ह्यात अपघाताची ६४ ठिकाणे असल्याचे आढळून आले होते.