शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत गेला दीड हजार जणांचा बळी

By admin | Updated: July 22, 2016 00:03 IST

साडेतीन हजार अपघात : सुरक्षेच्या उपाययोजना कुचकामी; कागदावरच असलेले वाहतूक नियम प्रत्यक्षात राबविण्याची गरज

सचिन लाड -- सांगली --महामार्गावर बेदरकार आणि बेशिस्त वाहतुकीचे सातत्याने बळी जात असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात साडेतीन हजार अपघातात एक हजार ५१३ जणांचा बळी गेला आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील जिल्ह्यातील कणेगाव ते कासेगाव ही २८ किलोमीटरची हद्द येते. मिरज-पंढरपूर असे दोन राष्ट्रीय, तर सांगली ते तासगाव, मिरज-विजापूर, वसगडेमार्गे कऱ्हाड, सांगली ते पेठ, सांगली ते कोल्हापूर असे पाच राज्य महामार्ग आहेत. याठिकाणी उपाययोजना करूनही अपघाताला आळा बसलेला नाही.मालिका सुरूच वाहनचालकांमध्ये ओव्हरटेक करून पुढे जाण्याची घाई आणि वेगाची नशा, या दोन प्रमुख गोष्टी अपघात होण्यास कारणीभूत आहेत. गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यात प्रत्येकवर्षी अपघातांच्या संख्येत वाढच होत आली आहे. २०१३ मध्ये सांगली-तासगाव रस्त्यावरील चिंतामणीनगर रेल्वे पुलावर भरधाव सुमोने समोरुन रिक्षाला धडक दिली. सांगली-कोल्हापूर रस्त्यावरही सातत्याने अपघात होतात. मिरज-पंढरपूर, म्हैसाळ या मार्गावरही अपघात होतात.मानवी चुकाच कारणीभूतजिल्ह्यात २०१३ मध्ये २६० जणांचा अपघातामध्ये बळी गेला. २०१२ मध्ये ३१४ जणांचा बळी गेला होता. यातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक अपघात हे मानवी चुकांमुळे झालेले आहेत. अपघाताची ६४ ठिकाणेतत्कालीन पोलिसप्रमुख सावंत यांनी जिल्ह्यात अपघाताच्या ठिकाणांचा सर्व्हे केला होता. या सर्व्हेतून जिल्ह्यात अपघाताची ६४ ठिकाणे असल्याचे आढळून आले होते.