शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा
4
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
5
अरे देवा! ट्रेनमधून चोरीला गेल्या भाजपा नेत्याच्या आईच्या अस्थी; चोराला रंगेहाथ पकडलं अन्...
6
स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास NASA नं मनाई का केलीय, अंतराळात प्रेग्नेंट झाल्यास काय होईल?
7
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
8
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
9
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
10
Deep Amavasya 2025 : दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा!
11
गुरुपुष्यामृतयोग: सद्गुरू सेवा शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा; पूर्ण पुण्य मिळवा
12
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
13
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
14
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
15
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
18
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
19
गुन्हेगारांचे चेहरे स्केचमधून जिवंत करणारे आर्टिस्ट बनले ‘महाराज’, धमक्या, कुटुंबाच्या काळजीमुळे सोडली मुंबई 
20
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का

‘ब्रेक द चेन’साठी जिल्हा प्रशासन रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST

सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने सोमवारी रात्री आठपासून लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली. ...

सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने सोमवारी रात्री आठपासून लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली. शासनाने जारी केलेल्या नियमावलीबाबत मात्र, संभ्रमच अधिक दिसून आला. तरीही ‘वीकएंड लॉकडाऊन’ आणि इतर दिवशी निर्बंधासाठी सोमवारी दिवसभर प्रशासनाकडून नियोजन सुरू होते. रात्री आठनंतर रस्त्यावर उतरत पोलिसांनी संचारबंदीबाबत नागरिकांना माहिती दिली.

राज्य शासनाने सोमवार रात्रीपासून रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी आदेश लागू करत इतर वेळेतही कडक निर्बंध लागू केले आहेत. शनिवारी व रविवारी पूर्णत: लॉकडाऊन असणार आहे. याबाबतचे आदेश आल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच प्रशासनाने नियोजन सुरू केले. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत कडक अंमलबजावणीचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत दिवसभर जमावबंदी तर रात्री संचारबंदीसह कोणती दुकाने चालू राहणार, कोणती पूर्णत: बंद राहणार याबाबतच्या सूचना दिल्या.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सायंकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये येणाऱ्या नागरिकांची नोंद ठेवण्याबराेबरच पोलीस कर्मचाऱ्यांनीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, रात्री आठनंतर कोणीही बाहेर पडणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.

सोमवारी रात्री आठनंतर पोलिसांनी शहरात निर्बंधाबाबत सूचना देण्यास सुरुवात केली. संचारबंदीचा पहिलाच दिवस असल्याने प्रमुख चौकात थांबून पोलीस सूचना देत होते.

चौकट

संभ्रमच अधिक

शासनाने रात्रीच्या संचारबंदीसह इतर वेळेत जमावबंदीचे आदेश दिले याबरोबरच कोणती दुकाने, व्यवसाय सुरू राहतील व कोणते पूर्णत: बंद राहतील याबाबतही सूचना दिल्या आहेत. तरीही नागरिकांत मोठा संभ्रम होता. त्यामुळे प्रशासनाने याबाबत खुलासा करण्याची मागणी करण्यात आली.

कोट

जिल्ह्यात निर्बंधांची कडक अंमलबजावणी होणार आहे. प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना नागरिकांनीही सहकार्य करावे. अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडणे टाळावे. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

कोट

शासनाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे जिल्ह्यात पालन करण्यात येणार आहे. रात्रीच्या संचारबंदीची अंमलबजावणी कडक करण्यात येणार आहे. नागरिकांना त्रास न देता सर्व नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.

दीक्षित गेडाम, पोलीस अधीक्षक