शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दहशतवाद्यांवरील हल्ल्यानंतर साखर वाटप

By admin | Updated: September 30, 2016 01:29 IST

भारतीय सैन्याच्या या कृतीच्या समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मारुती चौकात गुरुवारी सायंकाळी आनंद व्यक्त केला

सांगली : पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्यानंतर सांगलीच्या मारुती चौकात आणि राजवाडा चौकात गुरुवारी सायंकाळी साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. राष्ट्रप्रेमी नागरिकांच्यावतीने यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भारतीय सैन्याच्या या कृतीच्या समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मारुती चौकात गुरुवारी सायंकाळी आनंद व्यक्त केला. ‘हमसे जो टकरायेगा मिट्टी में मिल जायेगा’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ ‘भारत माता की जय’, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सचिन पवार म्हणाले की, पाकिस्तान वारंवार आतंकवादी पाठवून भारतविरोधी कारवाया करीत आहे. याला भारतीय सैन्याने आज चोख उत्तर दिले आहे. यापुढील काळात पुन्हा पाकिस्तानने असा प्रयत्न केला तर, भारतीय सैन्य त्यास चांगलेच प्रत्युत्तर देईल, याची खात्री आहे. यावेळी अंकुश जाधव, श्रीधर कदम, विशाल चव्हाण, अजित कबाडे, मंगेश तांदळे, महेश स्वामी, राजेंद्र शहापुरे, प्रकाश निकम उपस्थित होते. मनसेच्यावतीनेही माजी आमदार नितीन शिंदे, स्वाती शिंदे यांनी राजवाडा चौकात साखर वाटप केले. (प्रतिनिधी)