शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जत तालुक्यातील ४२ गावांचे पेढे वाटप

By admin | Updated: July 9, 2015 23:35 IST

आंदोलन स्थगित : राज्य शासनाकडून मागण्या मान्य; सांगलीत जल्लोष

सांगली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून सुरू असलेल्या जत तालुक्यातील ४२ गावांच्या शेतकऱ्यांचे आंदोलन गुरुवारी सकाळी स्थगित करण्यात आले. मागण्या मान्य झाल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जल्लोष केला. पेढे वाटून व गुलालाची उधळून करून आनंद व्यक्त करण्यात आला.जत पूर्व भागातील उमदीसह ४२ गावांचा म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समावेश करून शेतीला पाणी द्यावे, अन्यथा सरकारने कर्नाटकात जाण्याचे नाहरकत पत्र द्यावे, या मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन सोमवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू होते. पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, उपाध्यक्ष अनिल शिंदे, दावल शेख आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. मुंबईमध्ये बुधवारी सायंकाळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये या गावांचा शेतीचा पाणीप्रश्न मिटविण्यासाठी ३२ कोटी रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. तसे लेखी पत्रही आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. त्यानंतर सांगलीत सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी संजय तेली, मल्लिकार्जुन सुरगोंड, बसाप्पा कोल्याळ, हरीष शेटे, राजू चव्हाण, मल्लाप्पा सालुटगी, सुनील पवार, लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी सचिन पवार, एस. आर. घोलप आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आभारपत्रही सादर...गुरुवारी सकाळी मुंबईत गेलेले कार्यकर्ते सांगलीत आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना शासनाचे पत्र दाखविले. याचवेळी शासनाचे आभार मानणारे पत्र आंदोलनकर्त्यांकडून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना देण्यात आले. यानंतर एकच जल्लोष करण्यात आला.