शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘निरुपयोगी’ कालवे भर टाकून मुजविले

By admin | Updated: December 7, 2015 00:31 IST

कवठेमहांकाळ पूर्व भागातील प्रकार : दोन वर्षे उलटूनही पाणी नसल्याने संताप

हणमंत देसाई --रांजणी --कवठेमहांकाळ पूर्व भागातील रांजणी, अग्रण, लोणारवाडी, पिंपळवाडी, अलकूड (एस), नांगोळे, कोकळे, बसाप्पाचीवाडी परिसरात दोन वर्षापूर्वी खोदलेले म्हैसाळ योजनेचे पोटकालवे शेतकऱ्यांसाठी ‘असून अडचण’ ठरत आहेत. योजना सुरू करण्याबाबतच्या तांत्रिक अडचणी, लोकप्रतिनिधींची उदासीनता, अधिकाऱ्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव यामुळे पाण्याअभावी निरूपयोगी ठरत असलेले कालवे शेतकरी भर टाकून मुजवताना दिसत आहेत.माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी विशेष प्रयत्न करून पूर्व भागातील रांजणी, अग्रण, लोणारवाडी, पिंपळवाडी, अलकूड (एस), नांगोळे, कोकळे, बसाप्पाचीवाडी या गावांसाठी पोटकालव्यांची कामे मार्गी लावली. आर. आर. पाटील यांनी तर दोन वर्षापूर्वी ‘तालुक्यातील हा शेवटचा दुष्काळ’ अशी ग्वाही देत नांगोळे ते रांजणी रेल्वे फाटक असा पाच किलोमीटरचा मुख्य कालवा व या सहा गावांसाठी सुमारे २५ किलोमीटरच्या पोटकालव्यांची कामे तातडीने मार्गी लावली. यासाठी सुमारे २० कोटी रूपये खर्च झाले. मात्र त्यानंतर दोन वर्षे उलटूनही आजअखेर पाटबंधारे विभागाने पाणी सोडून कालव्यांची साधी चाचणीही घेतली नाही.पोटकालव्यांमध्ये अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे तुकडे पडले आहेत. शेतीच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी अनेकांना एक ते दीड किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. ‘पाणी मिळणार’ या आशेने दुष्काळाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांनी कालव्यासाठी जमीन देताना फारसे आढेवेढे घेतले नाहीत. पण दोन वर्षे उलटूनही पाणी तर नाहीच, शिवाय जमीनही गेली. तसेच एकाच शेताचे दोन तुकडे कसताना होणारी तारांबळ, याला वैतागून अनेक ठिकाणी शेतकरी भर टाकून कालवे मुजविताना दिसत आहेत. या योजनेमुळे रांजणीतील ८०५ हेक्टर, अग्रण धुळगाव येथील ६६६ हेक्टर, लोणारवाडीतील १०१ हेक्टर, पिंपळवाडी येथील १२१ हेक्टर, अलकूड एस येथील ११९ हेक्टर, तर नांगोळे येथील ७६.३१ हेक्टर अशी सुमारे दोन हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. याशिवाय या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायमस्वरूपी निकालात काढण्यास मदत होणार आहे. पण कालव्यांच्या खुदाईनंतर पाटबंधारे विभागाकडून पुढील कामांबाबत कोणतीच हालचाल झालेली नाही. अस्तरीकरण तर दूरच, पाणी सोडून साधी चाचणीही केली गेली नाही. तातडीने हालचाली न झाल्यास दोन वर्षापूर्वी खोदलेले कालवे पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा खोदावे लागतील, अशी स्थिती आहे.‘टेंभू’ही अर्धवट : भरीव निधीची गरजकेवळ म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे येथील सर्व शेती सिंचनाखाली येऊ शकणार नाही. यासाठी टेंभू योजनेची प्रलंबित कामेही पूर्ण होणे गरजेचे आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात टेंभू योजनेची ४१ किलोमीटरची कामे प्रस्तावित आहेत. यापैकी केवळ ५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. सध्या ५ ते १७ किलोमीटरच्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच नागजपर्यंत पाणी देता येईल, असे पाटबंधारेचे अधिकारी सांगत असले तरी, पुढील २५ किलोमीटरच्या टप्प्यासाठी भरीव निधीची तरतूद गरजेची आहे. पाणीपट्टी भरण्याची शेतकऱ्यांची तयारीम्हैसाळ योजनेच्या पाणीपट्टीचा, वीज बिलाचा प्रश्न वारंवार चर्चेत येतो. वेळेवर, पूर्ण क्षमतेने पाणी मिळावे, पाणीपट्टी भरण्याची आमची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे. योजनेची अनेक कामे अपूर्ण आहेत. टंचाई निधीतून वीजबिल भरून योजना सुरू करावी, अशी मागणी होत आहे.